Subscribe:

Ads 468x60px

Tuesday, May 29, 2012

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.०५.२०१२)

खराखुरा एकमेव सद्‍गुरु आहे तो ओळखायचा कसा? ...तो जोपर्यंत स्वत:ला कर्माच्या अटळ सिध्दांताशी बांधून घेत नाही तोपर्यंत मानवाला त्याच्याशी बांधून घेता येत नाही. 

जे डोळस असून त्याला समोर असूनही बघू शकत नाहीत ते खरे आंधळे. ज्या डोळ्यात गुरुची image नाही तो मांसाचा गोळाच आहे. गुरुकडे बघणे ही देखील एक सेवाच आहे, त्याच्याकडे बघता बघता प्रेम दाटून आले की त्याचे गुण आपोआप आठवू लागतात.

तो एकदा का अवतरीत झाला की त्याच्या अस्तित्वामुळे अख्खी पृथ्वीच गुरुक्षेत्रम्‌ होते. तुम्ही मग जगाच्या पाठीवर कुठेही असा तुम्ही त्याचे नाव घेत असाल तर तुम्ही गुरुक्षेत्रम्‌मध्येच असता.

गुरुक्षेत्रम्‌ म्हणजे काय? तुमची त्याच्याकडे पाहणारी एकमेव दृष्टी. तुम्ही त्याच्याकडे पाहणे हेच तुम्हांला सर्व समर्थं सर्वार्थसमर्थं बनवते. 



Read more on .... 


http://www.manasamarthyadata.com/thursday_excerpts.php?id=41&lang=4

Saturday, May 5, 2012

सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०३.०५.२०१२)

॥ हरि ॐ ॥

                                 श्री गुरुक्षेत्रम मंत्र आपण बघत आहोत.. 
                                    ॐ ऎं र्‍हीं क्लीं चामुण्डायै विच्चे...

माझ्या लहानपणी एका कीर्तनकाराच्या घरी ऎकलेली एक गोष्ट आठवते. एका गावात एक शंकराचे देऊळ होते. एक दिवस सकाळी जेव्हा सगळे गावकरी देवळात जातात तेव्हा देवळातील शिवलिंग गायब झालेले असते. हे शिवलिंग स्वयंभू होते म्हणजेच जमिनीतून वर आलेले होते त्यामुळे कोणी चोरून न्यावे तर तसा खड्डा खणलेला पण दिसत नव्हता.

सगळीकडे शोधाशोध सुरू होते, पहिल्या दिवशी कोणाला वाईट वाटते, कोण उपवास करते, कोण नवस करते.
दुसर्‍या दिवशी पण तसेच तिसर्‍या दिवशी पण शोधाशोध चालूच, असे करता करता १०-१५ दिवस जातात.
असे देवाशिवाय देऊळ किती दिवस ठेवायचे असा गावकर्‍यांना प्रश्न पडतो शेवटी सगळे एकत्र येतात व एका मूर्तिकाराला सांगून नवीन शिवलिंग बनवायचे एकमताने ठरते. असे नवीन शिवलिंग बनवून झाल्यावर त्याची गावकरी वाजत गाजत गावात मिरवणूक काढतात व त्याची प्राणप्रतिष्ठापना त्या देवळात करतात.

पुढे मग त्या दिवसापासून पुन्हा त्या देवळात आधीसारखेच सर्व पूजा उपचार सुरू झाले. एवढी गोष्ट सांगून झाल्यावर कीर्तनकार बुवा थांबायचे व लोकांना प्रश्न विचारायचे की, पहिला देव कुठे गेला? ह्याविषयी गावातील लोकांचा विचार ४ दिवसात संपला. पहिला देव गेल्यानंतर मंदिर रिकामे कसे ठेवायचे म्हणून लगेच दुसर्‍या दिवसापासून नवीन देवासाठी विचार सुरू झाला. वाजत गाजत सर्वांनी नवीन देव मंदिरात आणून बसवला मग तेव्हा त्या पहिल्या देवाला काय वाटले असेल?

कीर्तनकार बुवांच्या ह्या प्रश्नाने ऎकणारे सर्वजण अंतर्मुख व्हायचे. प्राणप्रतिष्ठा करून नवीन देव बसवला पण पहिल्या मूर्तीचे काय झाले? हा प्रश्न कोणालाच पडत नाही. काही जण ह्यावर म्हणत, "देवाच्या मूर्तीत कसा फरक असणार? दोन्हीही एकच." ह्याचा अर्थ काय?
म्हणजेच माणसाला काय हवे आहे तर माणसाला त्याच्या सोयीनुसार देव हवा असतो. मंदिरात त्याची जी जागा आहे त्याच जागेवर त्याने बसायला हवे. इतरत्र त्याने कुठे जाता कामा नये. आम्ही ज्या जागेवर ठेवणार त्याच जागेवर तू बसायला हवे मग आम्ही तुझे सगळे लाड करू, तुला नवैद्य देऊ तुला नवस करू पण जर तू तुझी मंदिरातील जागा सोडणार असशील तर मात्र तुला आम्ही लगेच replace करू.

माणसाला देव कसा हवा तर आम्ही जे जे काही मागू ते ते सगळे पुरवणारा. त्याने त्याची मंदिरातील जागा सोडलेली आम्हांला चालत नाही. पण आम्हांला जर काही problem असेल तर मात्र त्याने धावून यावे. मग कीर्तनकार बुवांनी विचारले, "देव तुमच्या मदतीला मूर्तीतून धावून येतो ना?’ त्यावर गावकरी म्हणाले, "देव शिवलोकातून नाहीतर विष्णूलोकातून धावत येतो, आम्हाला तिथे जाता येत नाही म्हणून आम्ही देऊळ बांधतो.’

त्या कीर्तनकार बुवांनी ४-५ गावात हीच गोष्ट सांगितली पण कुठेही त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले. मी(प.पू.बापू) त्यांना विचारले तुम्ही प्रत्येक गावात हाच एक प्रश्न का विचारता? त्यावर कीर्तनकार बुवांनी सांगितले, "मला माझा देव शोधायचा आहे. माझ्या मंदिरातील जो देव हरवला आहे तोच मला जसा होता तसा अखंड हवा आहे, ही जी गोष्ट मी सांगतो ती माझी स्वत:चीच आहे.” मी विचारले, "पण तो कधी हरवला? "किर्तनकार बुवा म्हणाले, "ज्या क्षणी मी पहिल्यांदा रडलो तेव्हा म्हणजे मी जन्माला आलो तेव्हा, त्याला कसे शोधायचे ते मला कळत नाही, बाहेर कुठेही तो सापडत नाही आणि सापडलाच तर त्याला आत कसे घालायचे ते मला माहीत नाही, मला माझ्या देवाला शोधायचे आहे"

मी म्हणालो, "मी पण येतो तुमच्या सोबत", कीर्तन कार बुवा म्हणाले, "ठीक आहे".
पुढच्या गावात जाण्याआधी मी म्हणालो, "आपण ह्या गोष्टीत थोडा बदल करूया, पहिला देव हरवल्यावर जेव्हा नवीन देवाची वाजत गाजत प्राणप्रतिष्ठा होते. त्यानंतर महाशिवारात्रीच्या दिवशी पहिला देव प्रगटतो, मग बघूया लोकं काय उत्तर देतात" कीर्तनकार बुवा म्हणले, "ठीक आहे" मग पुढच्या गावात गेल्यावर ठरल्याप्रमाणे गोष्टीत बदल करून सांगतात व गावकर्‍यांना प्रश्न करतात अशावेळी काय करायचे?" कुणालाच ह्याचे उत्तर देता येत नाही, अशी १०-१२ गावे फिरतात त्यांना उत्तर मिळत नाही, शेवटी मी म्हणालो आपण एका गावात जाऊन मूर्ती चोरूया व नंतर नवीन देव आणणार तेव्हा परत पहिली मूर्ती ठेवू.

त्याप्रमाणे पुढच्या गावात जाऊन देवळातील मूर्ती चोरली... देवळात मूर्ती नाही हे पाहून दुसर्‍या दिवसापासून गावकर्‍यांची शोधाशोध सुरू झाली शेवटी नवीन मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा केली गेली. पुढे मग त्या दिवसापासुन पुन्हा त्या देवळात आधीसारखेच सर्व पूजा उपचार सुरू झाले. महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही पहिली मूर्ती देवळात रात्री आणून ठेवली... दुसर्‍या दिवशी आधीची मूर्ती पण देवळात पाहून सगळ्यांना प्रश्न पडला आता काय करायचे?

कारण आधीची मूर्ती ही स्वयंभू होती व नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झालेली होती, मग एकजण म्हणाला नवीन मूर्तीचे विसर्जन करूया कारण आधीची स्वयंभू आहे म्हणजे अधिक महत्त्वाची आहे. जास्त powerful आहे.
म्हणजे आम्हांला देव कसा हवा विसर्जन करता येईल असा...

मग सर्वानुमते नवीन मूर्तीचे विसर्जन करुन आधीच्या स्वयंभू मूर्तीचे परत विधीवत पुजन सुरु होते. हे पाहुन मी कीर्तनकार बुवांना सांगितले, "ह्या आधीच्या मूर्तीला थोडा छेद दिसतोय" त्यावर कीर्तनकार बुवा म्हणाले, "अरे बापरे म्हणजे मूर्ती खंडित दिसते!! आणि खंडित मूर्ती देवळात कशी ठेवायची? "हे ऎकून तेथील एकजण म्हणाला" खंडित मूर्ती देवळात ठेवता येणार नाही ह्याचे विसर्जन करूया"
मग परत तिथे नवीन मूर्ती आणून तिची प्राण प्रतिष्ठापना केली गेली.

ह्याचा अर्थ काय तर देवाची मूर्ती आम्हांला पाहिजे तेव्हा स्वयंभू हवी असते, पाहिजे तेव्हा ती प्राणप्रतिष्ठापना केलेली चालते, आणि पाहिजे तेव्हा विसर्जन करता आली पाहिजे. आम्हांला देव कसा असावा तर त्याने मंदिरात बसावे आम्ही जे काही पुस्तकात ग्रंथात सांगितलेले आहे त्याप्रमाणे जे काही उपचार करू, त्याला देऊ ते त्याने स्वीकारायला हवे. आम्हांला पाहिजे तेव्हा त्याने आमच्या संकंटाचा परिहार करायला हवा, आम्ही शास्त्रोक्त पध्दतीनुसार ज्या दिशेने सांगू त्याच दिशेने त्याने मंदिरात बसायला हवे, जर आम्हांला त्याच्यात शास्त्रोक्त पध्दतीनुसार काही चुकीचे वाटले तर आम्हांला पाहिजे तेव्हा आम्ही त्याचे विसर्जन करू.

काही दिवसांपूर्वी पूजनासाठी घरात एकाच देवाची एकच मूर्ती असावी असे मी सांगितले होते. कारण तुम्ही जेव्हा त्या देवतेची पूजा करता किंवा स्तोत्र म्हणता तेव्हा ती स्पंदने जरी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली नसली तरी त्या मूर्तीकडून तुम्हांला ती मिळतच असतात. जर एकाच देवाच्या दोन मुर्त्या असतील तर ही स्पंदने divide होतात. म्हणुन पूजनासाठी घरात एकाच देवाची नेहमी एकच मूर्ती असावी.  

आतापर्यंत कुठल्याही देवतेच्या मूर्तीचे डोळे तुम्ही बंद बघितले आहेत का? नाही.. कारण आम्ही जे काही देवावर दहा वेळा पॆसै ओवाळून टाकत असतो ते त्याने बघायला हवे असे आम्हांला वाटते.

लक्षात ठेवा आम्हांला जसा पाहिजे तसा देव होणे हे बापजन्मात शक्य नाही.
आम्हांला पाहिजे तसे तो बोलणार आमच्या विचारांनुसार तो वागणार, असा आम्हांला पाहिजे तसा देव होणे कदापि शक्य नाही.
विचार करा तुमच्या विचारांच्या मर्यादा किती असणार? त्याची ताकद किती असणार? जर तुम्हांला तुमच्या विचारांनुसार देव हवा असेल तर त्याची ताकद तुमच्या विचारांनुसार मर्यादित असणार म्हणजे किती कमी असणार?
बघा रावणाने काय वर मागितला... मला देवाकडून मृत्यू नको, राक्षसांकडून नको, अप्सरांकडून नको, प्राण्याकडून नको अग्नी ने नको, शस्त्राने मृत्यू नको, रात्री नको दिवसा नको, त्याने त्याच्या विचाराच्या कुवतीनुसार सर्व संभाव्य गोष्टींकडून मृत्यू नको म्हणून मागितले, हिरण्यकश्यपुने देखील तसेच मागितले होते... पण तरीही देव त्याच्या कल्पनेच्या पलीकडेच राहीला. देव त्याच्या साठी अर्धा मानव अर्धा प्राणी असा नरसिंह अवतार घेऊन स्तंभातून प्रगटला, शस्त्र नको म्हणून हाताच्या बोटांनी त्याला फाडले, रक्त जमीनीवर पडता कामा नये असा त्याने वर मागितला होता म्हणून त्याचे रक्त प्राशन केले,

रावण व हिरण्यकश्यपुने दोघेही उच्च शिक्षण घेतलेले होते... पण काय झाले शेवटी?
देवाला तुमच्या विचारांमध्ये का घालायला बघता? देव जसा आहे तसा स्वीकारा.
"कुठेही जा काहीही करा, तुमच्या इंत्यंभूत कृतीच्या खबरा मज निरंतरा लागतील"

तुम्ही म्हणता ना देव नवसाला पावला पाहिजे मान्य आहे. देवाची आरती, पूजा केलीच पाहिजे पण एक प्रश्न तुम्हांला विचारतो, जेव्हा सृष्टी उत्त्पन्न झाली तेव्हा त्या देवाची आरती करायला कोण होते, कुठलाही जीव होता का तेव्हा? आणि जेव्हा तो अडीच हजार वर्षानंतर येणार आहे सर्व काही नष्ट करण्यासाठी तेव्हा 
"देवा तू प्रलय करू नकोस " असे तुम्ही म्हटले तरी तो तुमचे ऐकणार आहे का? नाही.

म्ह्णून ही कीर्तनकार बुवांची गोष्ट मला आवडते. देव मला पाहिजे तसा हवा असा हट्ट कधी करू नका कारण असे झाले तर त्याची ताकद अतिशय कमी असणार.

ग्रंथराजमध्ये आपण वाचले की जीवात्मा व परमात्मा म्हणजे काय?
जेव्हा परमात्मा एक मनुष्य बनवतो तेव्हा त्याच्या पाप-पुण्याचा हिशोब करीत नाही. तो प्रत्येक मनुष्य बनवताना त्याच्याकडे त्याच्या आईने दिलेल्या प्रत्येक गुणांचे बीज त्याच्यात टाकतोच. फक्त प्रत्येकाच्या भक्तीनुसार, पाप पुण्याच्या हिशोबानुसार त्याचे percentage कमी-जास्त असते.

त्याची इच्छा काय आहे?  तर प्रत्येक मनुष्याने मी जे दिलेले गुणधर्म आहेत ते वाढवत माझ्या आईच्या मांडीवर जाऊन बसावे. ह्याचा अर्थ प्रतिपरमात्मा बनण्याचा विचार करावा असा नाही तर तो जसा त्याच्या आईच्या चरणांशी बसला आहे तसेच प्रत्येक मनुष्याने त्याच्या ह्या बापाच्या चरणाशी असावे.
त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे जे काही जीवत्म्याला दिले आहे ते ते त्याने त्याच्या capacity नुसार वाढवावे.

जेव्हा आम्ही आमच्या मनानुसार देवाला मागतो तेव्हा आमच्याकडे त्याची ताकद कमी येत असते.

परमात्म्याकडून कितीही घेतले तरी ते कमी होत नाही ते अक्षय्य असते. जेव्हा तो आहे तसा आम्ही त्याला स्वीकारले तर त्याला जे द्यायचे आहे ते तो ते बरोबर देतो.
तू जे इच्छिसी तेची घडो... नाही तकरार राघवा.

समजा एका मनुष्याने मशीनच्या सहाय्याने १००० टन वजन उचलले पण तो पृथ्वीला उचलू शकतो का? बापजन्मात ते कोणाला शक्य होणार नाही.

म्हणजेच ह्यावरून कळेल की युगानुयुगे ज्याने पृथ्वीला अधांतरी तोलून धरले आहे त्याची ताकद किती असणार? तुम्ही त्याला मोजू शकता का?

नारदाने त्याला तोलले होते पण ते राधेच्या एका तुळशी पत्राने.
जेव्हा आम्ही देवाला आमच्या देवाला तराजूत बसवून तोलायला बघतो तेव्हा जेवढी आमची ताकद तेवढाच आमचा देव आमच्यासाठी असतो.

हरिला तोलण्याचा प्रयत्न करू नका इथे फक्त प्रेम करा, विश्वास ठेवा.

देवाला तराजूत ठेवायला गेलात आणि म्हणालात रामाने ही चूक केली. कृष्णाने ही चूक केली की समजायचे देव आमच्या मदतीला नाही.

माझा देव हा उचितच आहे ही भावना नसेल तर देव कधीच कळणार नाही आणि फळणारही नाही.

आपल्या कुलदेवते बद्दल आपल्याला काय माहीत असते. पण भीतीपोटी आम्ही वर्षानुवर्षे जे जे कोण काय सांगितील वयस्कर मंडळी ते ते घाबरून कुलदेवता कोपू नये म्हणून करत असतो.

परमात्मा हा कधीच भीती वाढवत नाही तर तो तुमची भीती घालवत असतो. म्हणून त्याला तराजूत घालून मोजू नका. तरीही तुम्हांला जर मोजायचे असेल तर मी तर म्हणेन मोजून पहाच त्याला कारण शेवटी त्या तराजूला हलवायचे कसे हेही त्याच्याच हातात आहे. त्यामुळे तुम्हांला full challange आहे ह्यासाठी.
माझ्यावर प्रेम करत असाल तर खरंखुरं सांगतो असे केले तर तुमच्याच अंगाशी येईल.

रावण व हिरण्यकश्यपु दोघेही चारही वेद, उपनिषदे शिकलेले होते, रावण शिवाचे नामसंकिर्तन अतिशय उत्तम करायचा पण काय उपयोग? शेवटी त्याची दुर्दशा का झाली? कारण तो तराजू घेऊन बसला.

इथेच आपल्या समोर त्रिविक्रमनिलयं येते. 
आमच्या प्राणमय, मनोमय व भौतिक देहावर ह्या त्रिविक्रमाचे साम्राज्य असते.
तुम्ही जे काही विचार करत असता त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय विचार करत नाही अशा स्थितीतही तो सर्व काही जाणत असतो.
तुमच्या गाडीचा accident होणार असतो, तुम्ही बेसावध असता अशा वेळी तुमच्या गाडीचे टायर कसे पंक्चर करायचे ते तोच जाणतो.

इथे तो आमच्या त्रिविध देहाचा स्वामी आहे म्हणून तो सर्व जाणतो असा विचार करणे म्हणजे सुद्धा त्याला तराजूत तोलणेच होय.
माझ्या देवाला सगळं कळतं हा भक्ताचा तराजू असतो.
माझा का? हा प्रश्न जिथे संपतो तेव्हा तिथे देव उभा असतो. जिथे का? हा प्रश्न आहे तिथे देव नाही. जोपर्यंत तराजू घेऊन फिरता तोपर्यंत माझ्या देहात, माझ्या मंदिरात देव नसतो. का? संपला की देव मंदिरात येऊन बसला म्हणून समजा.
आम्ही नोकरी का करतो? पैसे पाहिजेत म्हणून. पैसे का पाहिजेत? हा का? कधीच संपत नाही.
आम्ही जन्माला का आलो? आईबाबांनी जन्माला घातले म्हणून. ते का जन्माला आले? त्यांच्या आईबाबांनी जन्माला घातले म्हणून. ते का जन्माला आले? त्यांच्या आईबाबांनी जन्माला घातले म्हणून. ते का जन्माला आले?

असे किती का तुम्ही मोजणार? असा का कधीच संपणार नाही. असं का? करत आमचा माणसापासून माकडापर्यंत पुर्नप्रवास सुरु होतो.
जोपर्यंत का आहे तोपर्यंत देव नाही, मंदिरातील देव हरवला तर परत बसवायचा का? हा का प्रश्न संपवला की देव मंदिरात येऊन बसतोच.

माझ्या देवाला सगळं कळतं हा भाव हवा.

तो तुमच्या मर्यादेनुसार नाही तर त्याच्या कुवतीनुसार कार्य करत असतो आणि हेच त्रिविक्रमनिलयं.

हे सद्गुरु तत्त्व तुमच्या अंत:करणात येऊन राहते ते तीन विक्रम बनून

१) तो आहे म्हणजे जसा मी आहे हे खरं आहे तसाच तो आहे हे ही खरं आहे
२) तो माझा आहे व मी त्याचा आहे
३) तिसरा विक्रम ह्यालाच अंतिम विक्रम म्हणतात तो का आहे? चे विसर्जन.
त्याच्या बाबतीत सर्व का? चे विसर्जन म्हणजे अंतिम विक्रम

मनात का? आला की समजायचे मंदिरातला देव चोरीला गेला. जिकडे का? हा शब्द नाही तिथेच तो हरिहर सद्गुरु येऊन राहतो.
त्याच्यातला प्रत्येक गुण त्याने तुम्हांला दिला आहे म्हणून तुम्ही त्याचे सख्खे नातेवाईक आहात. हा एकमेव असा आहे की ज्याने सगळ्यांना त्याची पूर्ण बीजे दिली आहेत.

राजांनो आज का? ह्या प्रश्नाला तिलांजली देऊ या. त्याच्या बाबतीत कधीच का? हा प्रश्न विचारू नका.
परशुरा्माला त्याच्या पित्याने जमदग्नीने म्हणजेच त्याच्या गुरुने आईचे मुंडके उडव अशी आज्ञा केली त्याने कसलाही विचार न करता कुठलाही प्रश्न न विचारता तसे केले. परशुराम अतिशय मातृभक्त. परत जेव्हा त्याच्या पित्याने वर मागण्यास सांगितला तेव्हा माझ्या आईला जिवंत करा हाच वर त्याने मागितला.

आज मी तुम्हांला सांगतो राजांनो माझ्या आईला तुमच्या मनात जिवंत करा. तिचे मुंडके प्रत्येक जन्मात ऊडवले जाते ते थांबले पाहिजे.

का? हा प्रश्न म्हणजे रेणुकामातेची मुंडके उडवण्याची सांकेतिक कथा. ही आमच्या जीवनाच्या प्रत्येक स्तरावर कार्य करत असते.
रेणुकामाता म्हणजे आमच्यातील स्तंभनशक्ती. का? हा प्रश्न आला की हीचे मुंडके उडते तिने कधी तिच्या आयुष्यात का? उच्चारला नव्हता तरीही रेणुकामातेला हा शाप का? तर आश्रमाजवळ जलविहार करणार्‍या राजाला क्रीडा करताना त्याच्या प्रेयसीने असे करु नको म्हणून सांगितले. त्याने का? प्रश्न विचारला त्याची प्रेयसी म्हणाली हे योग्य नाही. परत त्याने का प्रश्न विचारला. ही पवित्र जागा आहे. त्याने पुन्हा का विचारले. त्याच्या तीन वेळा का? हे तीन का? प्रश्न रेणुका मातेने ऐकले तोपर्यंत ती तेथे थांबली म्हणून तिचे मुंडके उडाले. आमच्याकडे परशुरामाची ताकद नाही तिला परत जिवंत करण्याची.

तुमच्या मनात जर परमात्म्याला कायम ठेवायचे असेल तर त्याच्या आईचे मुंडके उडवणे थांबवा... मग त्या कीर्तनकाराला ही गोष्ट सांगावी लागणार नाही.

आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण आजच्या तिथीला हजारो वर्षांपूर्वी रेणुका मातेचे मुंडके उडवले गेले होते व परत जोडले गेले होते. म्हणून आजच्या दिवशीच हा का? थांबवा... खूप झाले तराजू घेऊन तोलणे ह्यापुढे नको. आता प्रेमाने आपण गुरुक्षेत्रम मंत्र म्हणूया.

॥ हरि ॐ ॥

Friday, April 27, 2012

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२६.०४.२०१२)

                                                                        हरी ॐ

               ॐ ऎं र्‍र्ही क्लीं चामुण्डायै विच्चे त्रिविक्रमनिलयं श्रीगुरुक्षेत्रम
                         त्रिविक्रम निलयं  आपण बघत आहोत .
विक्रम म्हणजे काय तर साधासुधा अर्थ म्हणजे पराक्रम. ह्याचाच अर्थ मानवाच्या त्रिविध पातळ्यांवर जो विलक्षण पराक्रमी आहे तो त्रिविक्रम.
आपण बघतो भूगोल दररोज बदलत जातो, जिथे आधी चाळी होत्या तिथे आज मॉल बनले आहेत .जो भाग पूर्वी ओसाड पडून होता तिथे आज टॉवर बनले आहेत. आपण जिथे १० वर्षापूर्वी रहायचो ते ठिकाण आज ऒळखता ही येत नाही, एवढे बदल घडलेले असतात.
 मुंबईचेच उदाहरण घेतले तर आपल्याला कळेल, मुंबईत आधी ७ बेटे होती आता त्यांची नावेही कुणाला माहीत नसणार .इंग्रजांना ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारासाठी ही बेटे योग्य वाटली मग इथे व्यापार सुरू झाला. बघता बघता १७ व्या १८ व्या शतकात कुणाच्याही खिजगणतीत नसलेले हे मुंबई बेट अवघ्या १०० वर्षात प्रचंड वाढले. 
१८३० ते १९०० सालापर्यंत मुंबईचा ठराविक भागच विकसित झाला होता. दादर हे तेव्हा जंगल म्हटले जायचे. साईसच्चरितात आपण वाचतो ठाणे जिल्ह्यातील वांद्रे गावी म्हणजे आज जे आपण बांदरा बघतो ते पूर्वी ठाणे जिल्ह्यात होते. आज मुंबई जिल्हा दहिसरपर्यंत पसरला आहे. समजा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा कालखंड ह्या काळात असेल तर त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात किती बदल बघितले असतील? पण म्हणून त्या व्यक्तीच्या आयुष्यात बदल झाला असे म्हणता येईल का? बाह्य जगातील बदलाचा परिणाम मानवावर कसा होत असतो? तर एकाच क्षणाला वेगवेगळ्या व्यक्तीच्या वयानुसार, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्याला ते बदल वेगवेगळ्या प्रमाणात जाणवत असतात .
समजा १९०७ साली दोन व्यक्ती आहेत त्यातील एक सुरुवातीपासुन मुंबईत आहे व दुसरी व्यक्ती त्याच वर्षी गावातून मुंबईत आली आहे. इथे एकाच साली दोघेही मुंबईत आहेत पण गावातून मुंबईत येणार्‍या व्यक्तीसाठी मुंबईचा बदल खूप मोठा असतो.
आता इथे शहराच्या जागी आपण आपले जीवन घेऊय़ा व व्यक्ती म्हणून आपण स्वत: असे केल्यावर जो स्वत:च्या जीवनातील होणारा बदल पेलू शकतो तो यशस्वी होतो तर जो हा स्वत:च्या जीवनातील बदल पेलू शकत नाही तो अयशस्वी होतो, हे आपल्या लक्षात येईल.
मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तो तिच्या आयुष्यात तसेच ती ज्या घरात जाणार त्यांच्या आयुष्यातला फार मोठा बदल असतो. इथे त्या लग्न होणर्‍या मुलीची व तिच्या सासूची हा बदल स्वीकारण्याची तयारी असणे आवश्यक असते. जर त्या मुलीला कोणी आधीच सांगितले की तू सुरुवातीलाच वेगळी रहा नाहीतर सासू त्रास देईल व हाच विचार मनात ठेवून त्या मुलीने लग्न केले तसेच सासूनेदेखील ही आल्यावर आपली सत्ता जाणार असा विचार मनात ठेवला तर इथे त्या नवीन लग्न होऊन येणार्‍या मुलीची व तिच्या सासूची लग्नानंतर एकत्र कुटुंब राहण्यासाठी आवश्यक असणारा बदल स्वीकारण्याची तयारी नसते व त्यामुळे मग वाद निर्माण होत राहतात. 

बरेचजण दादांकडे येऊन सांगत असतात की , अमुक व्यवसाय केला त्यात यश नाही आले म्हणून मग नोकरी केली त्यातही यश नाही त्यामुळे दुसरा व्यवसाय निवडला त्यातही अपयशच आले. मग ज्योतिषाकडे धाव घेतली त्याने सांगितलेले  उपाय केले तरी ही अजून यश नाही.  

असे का होते ? ह्यासाठी यश कसे येते हे आधी आपल्याला माहिती पाहिजे . 
तर मी ---माझा देव ----माझे यश हा यशाचा त्रिकोण आहे 
व मी माझा नसणे ---- मी माझ्या देवाचा नसणे ----माझे अपयश हा अपयशाचा त्रिकोण आहे.  
ह्याचा अर्थ असा नाही की मी नुसते भजन केले की माझे काम होणारच. हा मूर्खपणा आहे.
इथे मी नोकरी करेन - व्यवसाय करेन , संसार करेन जे काही करेन ते देवाचे नाव घेऊन करेन , देवासाठी करेन. 
देवासाठी करेन म्हणजे काय ? तर आपल्याकडे दोन वर्षापासून चण्डिका प्रपत्ती सुरु झाली तेव्हा मी मस्करीत म्हटले होते की स्त्रियांचे प्रपत्तीविषयी अनेक प्रश्न होते तर पुरुषांचा एकही प्रश्न नाही. खरंतर ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या, असे असणे म्हणजे एकदम दोन टोकाच्या भूमिका झाल्या.

स्त्रियांनी त्यावेळी प्रपत्ती कशी केली तर भीत-भीत. म्हणजे प्रपत्ती करताना काही चुकले तर? ही कायम मनात भीती. त्यामुले प्रपत्ती करताना बापू माझा आहे ही भावनाच नाहीशी झाली. 
तर पुरुषांची बापू माझा आहे ही भावना एवढी strong  झाली होती की त्यामुळे मी बापूंचा आहे ही भावनाच त्यातून गेली, त्यामुळे काही ठिकाणी त्रिविक्रमाचा फोटो उलटाही ठेवला गेला, म्हणजेच इथे मी बापुंचा आहे व त्यासाठी जे करणार ते अधिक चांगले व्हावे ह्यासाठी त्यांचे प्रयास कमी पडले. 

पुरुषांचा  बर्‍याच वेळा attitude  कसा असतो तर डोक्याला ताप नको म्हणून नुसते उरकले जाते. पंचशील मध्ये  distinction  स्त्रियांनाच जास्त असतात ह्याचे कारणही हेच आहे. 
पंचशीलच्या बाबतीत मी मागे सांगितले होते की मार्कांचे कुठेही  comparision  नको कारण तुलना आली की आपली प्रगती थांबते. पंचशील परिक्षा मी का द्यायला हवी ? तर माझ्या बापुला आवडते म्हणून आपापल्या  capacity  नुसार पंचशील परीक्षा मला देता आली पाहिजे. 

जर खरंखुरं यश हवे असेल तर सद्गुरु माझा आहे हा दृढ भाव हवा व मी सद्गुरुचा आहे म्हणून सतत परिश्रम हवेत. करा श्रम गाळा घाम ..

साधं उदाहरण घेऊया.. घरात गणपती आणताना एखादी स्त्री कितीही  expert  असली तरी गणपतीचे औक्षण करताना ती ताटातील प्रत्येक गोष्ट २-३ वेळा चाचपून बघत राहील . इथे ओवाळायचे कसे ह्या बाबतीत पण कायम संभ्रम असतो, उजवीकडून डावीकडे की डावीकडून उजवीकडे मग पूर्ण ओवाळायचे की अर्धेच ओवाळायचे असे प्रश्न कायम आमच्या मनात असतात . हे एव्हढे प्रश्न मनात का निर्माण होतात कारण एकच "भीती". साध्या औक्षणाची गोष्ट.. पण हे मी नीट कुठलाही संभ्रम न ठेवता केले तर चांगलेच होणार आहे. माझं औक्षण चांगले व्हावे यासाठी जर मी ह्याचा नीट अभ्यास केला व घरातील एखाद्या वयस्कर स्त्रीस विचारुन ह्याविषयी व्यवस्थित लिहून ठेवले तर असे संभ्रम येणारच नाहीत . 

पण स्त्रिया हे करत नाहीत कारण तिचा ego.  मला एखादी गोष्ट कळत नाही हे कुठल्याही स्त्रीला दुसर्‍यांना सांगायचे नसते. ह्यामुळेच स्त्रियांचा घात होत असतो. पुरुषांनाही हीच गोष्ट लागू आहे आपल्या दरवर्षी होणार्‍या सणांना कशी पूजा केली जाते हे जर आपण एकदाच घरातील वयस्कर स्त्रीस विचारून लिहून ठेवले तर मग दरवेळी पूजा करताना मनात भीती वाटणार नाही. 

घरात अनेक वेळा पादुका पूजन होते त्यावेळीही जर पूजनाच्या वेळी काय काय करायचे हे जर आधीच नीट लिहून ठेवले तर मनात संभ्रम राहत नाही. पण ह्याचा अर्थ हा नाही की सगळे माहीत आहे म्हणून पूजा म्हणजे शारीरिक कवायत नको. इथे जरी ३० वेळा पादुका पूजन केले असले तरी ३१ व्या वेळी देखील पूजन करताना ते प्रथमच करत आहोत असाच भाव, प्रेम तिथे हवे. 

जेवणापूर्वी मी अन्नग्रहण समये म्हणायला सांगितले आहे. मी अनेकवेळा बघतो लोकांचे की अन्नग्रहण समये म्हणण्याऎवजी अन्नपूर्णे सदापूर्णे... अनसुयो अत्रिसंभुतो असे काही पण म्हणणे चालू असते. ही खरी गोष्ट आहे. म्हणजे आपण नक्की काय म्हणत आहोत ह्याचेही भान नसते. 

आपण जेव्हा नवीन बूट किंवा चप्पल घेतो तेव्हा भीती काय असते की ही नवीन चप्पल आपल्याला लागेल तेव्हा मग आपण काय करतो जिथे चप्पल लागू शकेल अशा जागी पट्टी लावतो. आपण तिथे चपलेचा जो भाग लागतो तो भाग का्पून टाकतो का? किंवा जिथे आपल्या पायाला चप्पल लागते तो पायाचा भाग कापून टाकतो का? नाही. कारण सवयीने आपल्याला माहिती असते की चपलेचा shape  बदलतो. 

म्हणजेच आपण जी गोष्ट वापरतो त्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे की त्यात rapidly  बदल होत असतात. 

ही जशी चप्पलेची गोष्ट सवयीने आपल्या मनाच्या वहीवर कोरली गेली आहे तसेच औक्षणाच्या बाबतीत किंवा पूजेच्या बाबतीत असलेल्या गोष्टी आपल्या मनाच्या वहीवर कोरल्या का जात नाहीत? 

ही खरी गोष्ट आहे की ज्यात व्यक्तीचा भाव गुंतलेला असतो, त्याची सुरक्षितता गुंतलेली असते तिथे काहीही करताना त्याची त्रेधातिरपीट उडते. त्याचे मन त्या गोष्टीत एवढे गुंतलेले असते की तिथे मनाला दुसर्‍या कुठल्याही गोष्टीचा विचार करायला जागा नसते, त्याच्यासमोर सगळं विसरायला होते. 
देवाच्या चरणांकडे बघताना, त्याच्या चेहर्‍याकडॆ बघताना त्याच्याकडे मागायला विसरणे ही चांगली गोष्ट आहे, असे जेव्हा घडते तेव्हा तोच मग जे आपल्यासाठी उचित असते ते स्वत:हून पुरवतो. जेव्हा त्याच्याकडॆ बघताना मागणं लक्षात ठेवून आपण मागत बसतो तेव्हा तो ते उशिरा पुरवत असतो. 

संत मीराबाईने त्याच्या नामात गुंग होऊन विषाचे प्राशन केले तरी ते तिच्यासाठी अमृत बनले. इथे चुकीचा अर्थ घ्यायचा नाही, आपल्याला practical  जगात वावरायचे आहे. उद्या तुम्ही मीरेप्रमाणे वेष करून फिरलात तर त्यामुळे काही तुम्हाला कोणी मीरा म्हणणार नाही, तिथे तुम्हांला वेडेच म्हणणार. तुम्ही जर असे विष प्यायला गेलात तर ते त्या विषाच्या गुणधर्मानुसारच काम करणार.    

आमच्या  आयुष्यात आंम्हाला जर कुठलीही गोष्ट यशस्वी करायची असेल तर त्यासाठी आंम्हाला त्याची आधी तयारी करता आली पाहीजे .

समजा माझ्या मित्राने जमीनी घेतल्या व त्यात केलेल्या व्यवसायात त्याला यश मिळाले म्हणून मी ही जमिनी घेतल्या व त्याच्यासारखेच करायला गेलो तर मला यश मिळेल का? कारण इथे मित्राचे परिश्रम, कष्ट मला दिसू शकत नाहीत. आपण फक्त फळ बघतो व फळ बघून शेती करता येत नाही.
मागे मी शेती करायला सांगितली होती तेव्हा काहीजणांनी तांदूळ पेरले होते. तांदूळ पेरून शेती होईल का? म्हणजे आम्हांला माहिती पाहिजे की आम्हांला फळ कशातून मिळेल. 

आम्ही केळी खातो. केळ्यामध्ये बी असते ना? पण हे बी लावले तर झाड येते का? नाही त्यासाठी केळीचे झाडच आणून लावावे लागते. 
आपण कांदा खातो ह्या कांद्याच्या बिया असतात ना? कुणाला माहिती आहे कांद्याच्या बिया कश्या असतात?
कुणाला नाही... सगळे नर्मदेतले गोटे आहेत.
कांद्याच्या ज्या पाती असतात त्यातून मधुनच एक देठ लांब वाढतो त्याला पोंगाडा म्हणतात. त्याला सफेद फुले येतात नंतर हीच फुले सुकल्यावर त्याच्या काळ्या बिया तयार होतात. 
कांद्याच्या बिया cultivate करून पेरल्या तर अमाप पीक येते. पण कांद्याला बघून कांद्याचे बीज दिसते का? नाही. आमचा एक मित्र कांद्याची शेती करून यशस्वी होतो म्हणून मीही काहीही अभ्यास न करता कांद्याची शेती करायला गेलो तर मलाही त्याच्यासारखे यश मिळणार का? नाही. 
जेव्हा आम्ही कुठलीही गॊष्ट करण्यापूर्वी त्याच्या आधीची एक stage  व त्याच्यापुढची एक stage ह्याचा पूर्णपणे अभ्यास करतो तेव्हाच आम्हांला यश मिळते. असा उचित दिशेने प्रवास होण्यासाठी देव आमचा आहे हा प्रथम दृढ विश्वास  हवा. यशाचा त्रिकोण प्रत्येकाला हवाहवासा असतो मग तरीही अपयश का येते? आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्याचा आणि त्रिविक्रमाचा काय संबंध ? 

आपण सुरुवातीला मुंबई शहराच्या उदाहरणात बघितले की आपल्या अवतीभोवती कसे बदल होत असतात. ह्याच प्रकारे कुठलाही व्यवसाय करताना वेळ - काळानुसार त्यात होणारे बदल जाणण्याची व ते झेपवण्याची तयारी आमची असायला हवी.  
काही कारणामुळे मार्केटमध्ये बदल झाला तरी मी तेव्हा काय करणार हे मला माहिती पाहीजे. सृष्टीमध्ये होणारे तसेच माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये होणारे बदल पेलण्याची तयारी माझी आहे की नाही हे मनुष्याला आपोआप कळत असते, 

आमच्या आजूबाजूच्या परीस्थितीत होणारे बदल ओळखायचे कसे? ह्या बदलातील माझ्यासाठी चांगले किती वा वाईट किती? हे ओळखण्याची शक्ती आमच्यामध्ये असतेच, जो काही बदल घडतो ते त्यातून चांगले काय व वाईट काय हे कळल्यावर चांगल्याचा उपयोग कसा करुन घ्यायचा व वाईटाचा त्रास कसा होऊ द्यायचा नाही ही शक्ती आमच्यात उपजत असते. हीच माणसाची स्वसंरक्षणाची सहज प्रेरणा आहे. हे ज्ञान प्रत्येकाला जन्मजात असते. मला कशामुळे त्रास होतो व कशाने नाही हे तुमचे तुम्हांलाच चांगलं कळत असते. 

हीच ती ह्या त्रिविक्रमाची तुम्हांला मिळालेली सर्वांत मोठी देणगी आहे. पण ही देणगी मनुष्य जोपर्यंत श्रद्धवान आहे तोपर्यंतच उपयोगी आहे जेव्हा मनुष्य श्रद्धाहीन बनतो तेव्हा ही देणगी निरुपयोगी बनते. 

आपण ग्रंथराजात बघितले आहे की मंदोदरी ही रावणाची पत्नी म्हणजे स्वसंरक्षणाची प्रेरणा आहे. जोपर्यंत रावणाने सीतेस पळवून आणले नव्हते तोपर्यंत रावणाला काहीही धोका नव्हता.  
परंतु जेव्हा त्याने सीतेस तिने आपली पत्नी बनावे ह्यासाठी धमकावायला सुरुवात केली तेव्हा मंदोदरीचा  तिच्या पातिव्रत्यावरचा विश्वास कमकुवत झाला तेव्हाच मग पुढे लंका जळाली व रावणाचाही विनाश झाला. 
ही मंदोदरी आमच्याही जीवनात असतेच, 
मला कशाने त्रास होत असतो व कशाने त्रास होत नाही ही ओळखण्याची ताकद आम्हाला त्रिविक्रमाकडून मिळत असते. 

जेव्हा माझी मनाच्या, प्राणाच्या व शरीराच्या ह्या तीन्ही पातळ्यांवर स्वसंरक्षणाची भावना सजग असते तेव्हाच मनुष्य सुरक्षित असतो.

आज leprosy  आजार प्रत्येकाला माहीत असेल. ह्यात शरीराच्या संवेदना जातात. शरीराचे व प्राणाचे नाते असते त्यामुळे ह्याचे परिणाम प्राणांवरही होत असतात. ह्यात शारीरिक पातळीवरची व प्राणांच्या पातळीवरची इजा कळत नाही म्हणून ह्याला महारोग म्हणतात . जेव्हा हीच इजा मनाच्या पातळीवरही जाते तेव्हा मनु़ष्य कोमात जातो . 

माणूस जेव्हा दारु पितो तेव्हा त्याला कशाचेही भान नसते. Medical science  मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, alcohol is a cerebral depressent . दारु माणसाला जिवंतपणी जनावर बनवते, जिवंतपणी तो बेशुध्द असतो त्याचे मनही बेशुद्ध असते. दारुमुळे त्याच्यातला पशू जागृत होतो. म्हणून उद्या कुणी अश्या व्यक्तीला मारायला जाईल तर ते योग्य नाही. ह्याचा कुणीही चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. दारु पिणे हे माझ्या (प.पू.बापू) दृष्टीने एक आजार आहे. 
दारु पिणे एकदम थांबवणे ही देखील एक injury  च असते. alcohol withdrawal मध्ये आकडीही येऊ शकते.
दारु सोडवायची कशी हे डॉक्टरच सांगू शकतो. तो त्या माणसाला तिन्ही पातळीवर मदत करु पाहतो. प्राणाच्या शरीराच्या पातळीवर औषधाच्या मदतीने तो दारु सोडण्यास रुग्णाला मदत करु शकतो. पण मनाच्या पातळीवर मात्र तो काम करु शकत नाही.
परमात्मा मात्र बुद्धीच्या माध्यमातून मनाला सतत उचित दिशेने घेऊन जात असतो . बाबा साइसच्चरीतात सांगतात..."कृतांताच्या दाढेतून काढीन निजभक्ता ओढून.." 

तुम्हांला होणारा कुठलाही रोग हा आधी मनाच्या पातळीवर होतो व मग शरीराच्या पातळीवर होत असतो. 

आम्हांला आमच्या जीवनात अपयशाचा त्रिकोण यशामध्ये बदलायचा असेल तर त्यासाठी त्याच्या technique चा अभ्यास  करून त्यानुसार प्रयास करावे लागतात व ह्यासाठी जी ताकद लागते ती सद्गुरु कथा श्रवणामधून मिळत असते . 

आम्ही एक किलो केळी आमच्या पैशाने विकत घेतली व ती खाताना सालींसाठी पण पैसे दिले आहेत म्हणून साली पण खाल्ल्या तर चालणार का? त्याने काय होणार? पचनाला त्रासच होणार.. आम्हांला लोकं लोभी म्हणणार. लोभामुळेच मनुष्य मुर्ख बनतो. एका किलो मध्ये केळ्यासोबत सालींचेही वजन आले म्हणून ती खाणे योग्य नाहीच .
तुम्हांला त्याने कर्म स्वातंत्र्य दिले आहे म्हणून कसेही वागून चालणार नाही. जेव्हा मी कर्म स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतो म्हणजे मी केळी सालीसोबत खातो. व केळ्याची साल ही बाहेर असली तरी त्यावरुन घसरायला होते व शरीरात असली तरी ती घसरवतेच
आज आपण त्रिविक्रम निलयं बघितले... पुढच्यावेळी आपण त्रिविक्रमाचे कार्य कसे असते ते बघणार आहोत 

Friday, April 20, 2012

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१९.०४.२०१२)


हरी ॐ
  
 
गुरुक्षेत्रम मंत्र गेल्या ७ दिवसात किती जणांनी किती वेळा म्हटला मला माहीत नाही. मी तुम्हांला सांगितले होते count ठेवू नका.

परंतु आपली सृष्टीच अशी आहे की ह्यात प्रत्येक गोष्टीचे एक account ठेवायची व्यवस्था आहे.

आज scientist सांगतात की अमुक अमुक वर्षापुर्वी असे असे झाले. म्हणजे काळाचे count कुठेतरी ठेवले जाते. पुर्वी हा count ओळखता यायचा नाही पण आता हा count मानव ठेवू शकतो. कुठलाही count ठेवायला ते मापणारी यंत्रे असावी लागतात.

आपल्याला माहीत आहे पृथ्वी, सुर्य युगानुयुगे सृष्टीत फिरत आहेत. मग त्यांचा speed कुठे कमी झाला का की वाढला का? नाही. ह्याचाच अर्थ  ह्या सृष्टीच्या अंर्तगत अशी काही यंत्रणा असली पाहिजे की घडणार्‍या घटनांचा count आपोआप ठेवला जातो चा speed राखणारी कुठली तरी यंत्रणा असणार.म्हणजेच सृष्टीत घडणार्‍या गोष्टींचा count ठेवण्य़ाची यंत्रणा आपोआपच घडत असते.

मग मानव म्हणुन आम्ही नेहमी करत असलेल्या गोष्टींचा count आम्ही ठेवतो का? कुणीतरी एक चित्रगुप्त असतो असे म्हणतात जो तुमच्या सगळ्या गोष्टींचा count ठेवतो... मला (प.पू.बापू) माहीत नाही.

दुसरा आहे तो यमराज.. तो मलाच पाहुन घाबरेल म्हणेल, हा कोण दुसरा रेडा आला. ह्यातील गंमतीचा भाग सोडुन द्या.
    
आपण घरी नेहमी account ठेवतो अमुक एक बिल भरले, एव्हढे पैसे दिले. देवाचा जप केला तो ही जपमाळेने मोजता येतो आता त्याचेही counter आले आहेत, त्यामुळे आपण count करु शकतो. पण आजच्या दिवसात माझ्या मनात किती विचार आले ह्याचा count ठेवता येतो का? मी दिवभरात किती बोललो ह्याचा count ठेवू शकतो का? मग माझे हे विचार, हे शब्द असेच विरुन जात असतात का? तर नाही.

आज physics आपल्याला सांगते की mass व energy ह्यांचे प्रमाण constant आहे.

म्हणजे जर आम्ही बोलतो हा एक पदार्थ आहे तर त्याचे कुठल्यातरी शक्तीत रुपांतर होतच असणार. कुठलीही गोष्ट नाश पावत नाही मग आमचे  विचार, आमचे शब्द नाश पावत असतात का? नाही.

आमचे कुठलेही विचार, कुठलेही शब्द नाश पावत नसतात.

लक्षात घ्या, एक मनुष्य A म्हणुन जन्माला आला आहे, तेव्हा त्याने जे विचार केले तो जे बोलला ते सर्व तोच मनुष्य जेव्हा B म्हणुन जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याने आधी A म्हणुन जे काही विचार केले आहेत ते त्याच्या पर्यंत येतात व पुढे तोच मनुष्य जेव्हा C म्हणुन जन्माला येतो तेव्हा त्याने आधी A म्हणुन व B म्हणुन जे काही विचार केले आहेत जे काही बोलला ते सर्व शब्द प्रत्येक वेळी त्याच्या जन्माच्या क्षणापासुन त्याच्या कडे यायला बघतात. म्हणजेच हे सर्व विचार व शब्द हे त्याच्या space(अवकाशात) मध्येच असतात.

मग हे शब्द व विचार मनुष्याकडे कसे येतात तर त्याच्या वयाची जी अवस्था असते त्यानुसार. म्हणजेच A नावाचा मनुष्य ५ व्या वर्षी जे काही बोलला जे काही त्याने विचार केले ते सर्व तोच जेव्हा B म्हणुन जन्माला येतो तेव्हा त्याच्या वयाच्या ५ व्या वर्षी त्याच्याकडे येतात. हाच मनुष्य जेव्हा C म्हणुन जन्माला येतो तेव्हा A म्हणुन ५ व्या वर्षी त्याने केलेले विचार,शब्द व B  म्हणुन ५ व्या वर्षी त्याने केलेले विचार व शब्द हे C च्या वयाच्या ५ व्या वर्षी त्याच्याकडे येत असतात.
  
आजपर्यंत इथे प्रत्येकाचे किमान ३७२ जन्म झाले आहेत म्हणजेच प्रत्येक क्षणी एकाच वेळी ३७२ जन्माचे विचार व शब्द आमच्याकडे येत असतात. आम्ही नेहमी confusion मध्ये का असतो? मनुष्य एव्हढा परावलंबी का बनतो? कारण प्रत्येक क्षणी आधीच्या जन्माच्या त्या क्षणाचे विचार व शब्द तुमच्यावर येऊन आदळत असतात. त्यामुळे आम्हांला कुठलाही निर्णय confidently घेता येत नाही. मनात सदैव आमच्या द्विधा मन: स्थिती असते.
 
समजा एखाद्या मुलाला arrange marrigae करायचे आहे व एकाच दिवशी ३० मुलीं मध्ये त्याला एकच मुलगी निवडायची आहे व सगळयाजणी गुणांमध्ये व दिसण्यामध्ये similar आहेत मग निवड कशी करणार ?

प्रत्येकी विषयी विचार करताना त्यातील एकच निवडताना confusion होणार, इथे ३० ही जणी निवडायच्या असतील तर प्रश्न नाही. बरेच जण इथे मनापासुन हसताना दिसताहेत.

पुर्वीच्या काळी राजकुमारींसाठी स्वयंवर असायचे, तेव्हा एक "पण"(अट) ठेवला जायचा तो "पण" जो जिंकेल त्याच्याशी राजकुमारीचे लग्न होत असे.

आपल्याला ही आपल्या जीवनात असे स्वयंवर करता आले पाहीजे, ह्याचा अर्थ हा नाही की उद्यापासुन तुम्ही राजकुमारी-राजकुमारांसारखे वेष घालुन फिरा, शब्दश: अर्थ घ्यायचा नाही त्याच्या मागचा अर्थ/concept इथे आपल्याला समजायला हवा.

लक्षात घ्या आपला निर्णय हे स्वयंवर आहे व आपल्या  मनातील असंख्य विचार हे राजे आहेत. अश्या स्वंयवरासाठी एक "पण" ठेवला आहे तर त्यातील एक राजा तो "पण" जिंकणार. ह्यासाठी "पण" हा उचित असला पाहीजे.

समजा एखाद्याने पण ठेवला की त्याला कॅब्रे डान्स करणारी बायको हवी तर हा पण उचित नाही, इथे पावित्र्य हे प्रमाण नाही.

द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी पण काय होता आठवा. छताकडॆ फिरणार्‍या माश्याच्या डोळ्याचा अचुक वेध पाण्यात प्रतिबिंबाकडे बघुन घ्यायचा होता.

ह्या पणामधुन काय लक्षात येते तर इथे हा स्वयंवराच्या वेळी आमंत्रण फक्त राजांनाच होते. ह्यात भाग घेणारा हा expert धनुर्धर असला पाहिजे, त्याला ज्या गोष्टी दिसत नाहीत त्याचा वेध घेता आला पाहीजे. पाण्यात प्रतिबिंब बघतोय. म्हणजे प्रतिबिंब कसे असते हे त्याला ओळखता आले पाहीजे कारण प्रतिबिंब हे फसवं असते ह्यात प्रतिमा उलटी दिसत असते left चं right दिसतं आणि right चं left. दिसत. अशी व्यक्ती जेव्हढी पाण्याच्या जवळ जाणार तेव्हाढा त्या व्यक्तीचा श्वास पाण्यावर आपटुन पाणी हलेल तरंग उमटतील व प्रतिमा धुसर दिसेल, त्यामुळे पण जिंकणे कठीण जाईल म्हणजेच ह्यासाठी त्याचा श्वासावर control असयला हवा. त्याचे concentration देखील excellent हवे कारण मासा सतत फिरतो आहे म्हणजे त्याला गतीचेही ज्ञान हवे.व त्यानुसार बाणाची व माश्याची गती समजुन त्याला बाण सोडता आला पाहीजे. जो मनुष्य हे करु शकेल तो नक्कीच स्थिरबुद्धी व कर्तबगार असला पाहीजे.

म्हणजे बघा किती गोष्टी ह्या एका पणात द्रौपदीने मांडल्या होत्या म्हणुन तिला अर्जुन मिळाला... The Best.

तुम्हांला आता प्रश्न पडेल की बापू आम्ही आमच्या जीवनात कुठला पण लावायचा? आणि मुख्य म्हणजे पण decide कसा करणार? खरा problem आपला इथेच असतो .

कारण प्रत्येक क्षणी आमच्या वर आधीच्या जन्माचे विचार येऊन आदळणार व त्यामुळे आमचा काहीच निश्चय होऊ शकणार नाही. आणि ह्यातुन माणसाची सुटका नाही... सगळे नाही म्हणताहेत... मग संपले प्रवचन चला घरी जाऊया आता.. बरोबर

लक्षात ठेवा आपण आपले  प्रश्न सोडवायचेच म्हणुन जन्माला आलो आहोत. गुरुक्षेत्रम‍ मंत्रातील हा जो त्रिविक्रम आहे त्याच्या घरात जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्या आधीच्या कुठल्याही जन्मातील कुठलेही विचार किंवा शब्द हे तुमच्यावर येऊन आदळत नाहीत. त्यांचा स्पर्श ही तुम्हांला होऊ शकत नाही.

म्हणजे आता पण करणे अधिक सोपे आहे आम्हांला जास्तीत जास्त वेळ त्रिविक्रम निलयं मध्ये बसता आले पाहीजे .

त्रिविक्रम म्हणजे जो तुमचा भुतकाळ, वर्तमान काळ व भविष्य काळ ह्यांना स्वत:च्या पराक्रमाने काबुत ठेवतो तो. तुमच्या प्राणमय, मनोमय आणि भौतिक देहावर ज्याचा विक्रम चालतो तो. तुमचा आधीच जन्म, आताचा जन्म व पुढचा जन्म ह्या तिन्हीवर कार्य करतो तो त्रिविक्रम. तुमच्या मन, प्राण व प्रज्ञेला ताकद देणारा हा त्रिविक्रम.

हरिहराचं एकरुपत्व म्हणजे त्रिविक्रम. निर्णय शक्ती व निरिक्षण शक्ती ह्याचे एकरुपत्व म्हणजे त्रिविक्रम.

आपण उदाहरण पाहुया. रस्त्याने तुम्ही चालला आहात, वाटेत केळ्याची साल दिसतेय साल समोर दिसताच कळते सालीवर पाय ठेवू नये. निरिक्षण शक्ती आणि निर्णय शक्ती एकरुप झाले की हे घडत.

म्हणजे इथे निर्णय शक्ती हीच निरीक्षण शक्ती बनलेली असते तर निरीक्षण शक्ती हीच निर्णय शक्ती बनते. म्हणजे नक्की  काय? तर हे समजणे फार सोपे आहे. समजा समोर साप दिसला की आपण असे म्हणत बसतो का? की,

१) हा साप आहे २) हा मला चावु शकतो ३) आता तु घाबर ४) व इथुन पळ काढ. नाही तर आपण काय करतो तर साप दिसला रे दिसला की  direct  तिथुन पळतो. जो अनुभवी असेल तो त्याला पुढे काठीने मारेल. हे जे आहे साप दिसल्याबरोबर direct तिथुन पळणे ह्याचा अर्थ इथे निर्णय शक्ती हीच निरीक्षण शक्ती बनते तर निरीक्षण शक्ती हीच निर्णय शक्ती बनते.

असेच दुसरे उदाहरण मित्राच्या घरी गेलात व त्याने दारुची बाटली काढली तर ती बाटली बघितल्याबरोबर साप दिसल्याप्रमाणे तिथुन लगेच बाहेर पडले पाहीजे. म्हणजेच इथे निरीक्षण शक्ती हीच निर्णय शक्ती झाली पाहिजे. जेव्हा असे घडते तेव्हा कधीच घाबरण्याचे कारण उरत नाही.

त्रिविक्रामाच्या घरात राहीले की आपला प्रश्न कसा सुटतो ते आपण पाहीले आता ह्याच्या घरात राहायचे कसे ते पाहुया.

ह्याच्या घरात राहण्यासाठी आधी ह्याचे घर शोधावे लागेल. हा राहतो कुठे हे मला माहीत असले पाहीजे.

ह्याला शोधणार कुठे कारण हा तर स्वत:च भटक्या आहे, हा कधी अंतरिक्षात असतो तर कधी पृथ्वीवर ऋषी सांगतात हा तर चराचरात व्यापुन आहे मग ह्याला शोधणार कसे ?

समजा साईप्रसाद बिल्डिंग, रुम नं१३, शिरगाव असा पत्ता असेल तर ह्यातील रुम नं.,घराचे/बिल्डिंगचे नाव, गावाचे नाव किती ठीकाणी common  असेल. उदा. शिरगाव घेतले तर फक्त महाराष्ट्रात २७ शिरगाव आहेत, त्यात प्रत्येक ठीकाणी साईप्रसाद बिल्डिंग, रुम नं१३ असतील बरोबर.

म्हणजे आले confusion... पत्ता शोधताना ह्या सगळ्या ठीकाणी आपल्याला फिरायला हवे नेहमी अश्यावेळी जे आपल्याला हवे असते ते सगळ्यात शेवटी मिळते. ह्यासाठी त्या पत्त्यावर जो राहतो त्याच्या नावासकट सगळी माहीती असली पाहीजे .

ह्या पत्याच्या ज्या ७ महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व गुरुक्षेत्रम मंत्राच्या .

"ॐ ऎं र्‍हीं क्लीं चामुण्डायै विच्चे-त्रिविक्रमनिलयं-श्रीगुरुक्षेत्रम्‌"
 ह्या पदामध्ये आहेत.

१) ॐ - म्हणजेच प्रणव प्राणाचा प्राण. हा प्राणयुक्त मंत्र आहे. चैतन्य युक्त. हा अचेतन, निष्प्राण अपवित्र मंत्र असुच शकत नाही. ह्या मंत्रात पुर्ण पावित्र्य, पुर्ण शुध्दता आहे.

२) ऎं - हे महासरस्वतीचे बीज आहे, तुमच्या प्रज्ञेला बळ देणारी ताकत, स्पंदन, बुद्धीचा विकास म्हणजे ऎं

३) र्‍हीं - हे महालक्ष्मीचे बीज आहे. महालक्ष्मी म्हणजेच मन तुमच्या मनाला सौंदर्य देणारी, त्याचे चित्त बनवणारी, मनाचा सांभाळ करणारी  शक्ती.

४) क्लीं - म्हणजे महाकाली. काळ व्यय करण्याची शक्ती. तुमची संरक्षक शक्ती, काळ उपयोगात आणणारी शक्ती म्हणजे महाकाली... तुमचा सर्वांत.. best body guard. म्हणजेच जेव्हा साक्षात महाकाली तुमची रक्षक बनून फिरत असेल कुणाची हिम्मत होईल का तुम्हाला काही करण्याची?

५) चामुण्डायै - तुमच्या आयुष्यातील  blocks  अडथळे दुर करणारी शक्ती

 ६) विच्चे - म्हणजे संपुर्णता, परमेश्वराला आवडेल असे जीवन घडवणारी शक्ती.

 ७) त्रिविक्रम्‌ - ह्या विश्वातील सद्गगुरुतत्त्व.


जेव्हा  सद्गगुरुतत्त्व तत्वाचे प्रेम मान्य करुन प्राणांचा प्राण स्वीकारुन आपली बुद्धी त्यानुसार वागवुन "त्या" च्या रुपाचे सौंदर्यं मनाला आवडु लागते  तेव्हा  सर्व अडथळे दुर करुन मनुष्याचे जीवन परमेश्वराला आवडु लागेल अशी साधन सामुग्री पुरवली जाते आणि हे  जिथे आहे तिथे त्रिविक्रम आहेच.

बापू एव्हढं सगळं आम्ही कसं करणार असा तुमचा प्रश्न असेल तर ह्या पुढचे पद त्यावर उत्तर आहे .

"‍सर्वसमर्थ, सर्वार्थसमर्थ श्री गुरुक्षेत्रम्‌"

ह्या ७ stages मध्ये जर तुमची capacity कमी पडत असेल तर तिथे तुम्हांला सर्वसमर्थ बनवणारे गुरुक्षेत्रम आहे. फक्त तुम्ही मनाचा एकदा असा निश्चय केला तरी जरी तुमचे गुरुक्षेत्रम मंत्र म्हणताना लक्ष नसेल तरी तुम्ही आपोआप सर्वसमर्थ बनलेले असता.

हा मझ्या गुरुने दिलेला मंत्र आहे हा सर्वस्वी माझे कल्याण करणाराच आहे, मला सर्वसमर्थ बनवणारा आहे .

समजा मी एखाद्या हॉटेल  मध्ये गेलो व मला तिथे चांगले जेवण मिळाले तर त्याचे कारण माझ्याकडे असणारा हा गुरुमंत्रच आहे म्हणून .

ह्या सात दिवसात का हा मंत्र म्हणायला सांगितला? तर जेव्हढी अशांतता असते तेव्हढं निर्णय घेणे कठीण जाते. आणि आता हा अशांततेचा काळ सुरु होतोय अगदी उद्यापसुन हा कठीण काळ सुरु होतोय. जे काही घडणार आहे तेव्हा शांतता देणारा हा गुरुमंत्रच आहे. हे लक्षात ठेवा.

मला बरं वाटत नसेल तर तात्पुरता उपाय म्हणुन मी औषध घेईन, चालायला जाईन, पण हे सगळे secondary आहे ह्यात main आहे तो फक्त गुरुमंत्रच .

ज्यांनी गेल्या ७ दिवसात हा विश्वास ठेवुन गुरुमंत्र म्हटला त्यांच्या मनात हा निश्चय झालेलाच आहे.

ह्यापुढे माझ्या आधीच्या जन्मातील विचार, शब्द ह्यांना गुरुक्षेत्रम मंत्राच्या भिंती छेदुनच यावे लागेल. शक्य आहे का या भिंती छेदणं?  नाही आज तुमच्यासर्व नातेवाईकांना, मित्रांना कळवा तुम्ही आधीच्या सर्व जन्मातील विचारांपासुन, शब्दांपासुन मुक्त झालात. मग फक्त दोन जन्मातील पाप- पुण्य सोडवणं खुप सोप्पे.

आज हे त्रिविक्रम निलयं तुमच्या मनात बांधले गेले आहे. तुमची इच्छा असो वा नसो तुमच्या मनात एकदा ह्या त्रिविक्रमाने घर बांधले की ती जागा तो कधीच सोडुन जाणार नाही. कारण हा जगातला सर्वांत मोठा हुकुमशहा आहे.

अट एकच आहे. आता ९.२५ वाजले आहेत उद्या सकाळी ९.२५ पर्यंत तुम्ही फेर विचार करु शकता. तुम्हांला ह्याची सत्ता नको असल्यास तुम्ही सांगु शकता, "बाबा रे तु मला नकोस." पण ह्या १२ तासात हा हलणार नाही त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तो राहील नाहीतर निघुन जाईल.

ह्या १२ तासात तुम्ही मागे फिरु शकता पण त्यानंतर मात्र बापजन्मात तुम्ही कधी मागे फिरु शकणार नाही, तुम्ही ह्याची सत्त्ता नाकारु शकणार नाही.

ह्या १२ तासानंतर तुम्ही जाल तिथे हा असेल तुमची सोबत हा कधीच सोडणार नाही.

म्हणुन सांगतो कशाला कट्कट मागे लावुन घेता, हा( त्रिविक्रम) एक तर कधी गोड बोलत नाही मग कशाला पाहेजे ह्याची गुलामी?

बघा विचार करा.. उद्या ९.२५ पर्यंत मग मात्र lock किया जायेगा. तुम्ही भोळे आहात, वेडेपणा करु नका, ह्याला नाही म्हणा, मग त्रिविक्रमाचा धोका तुमच्या आयुष्यातुन गेलेला असेल, मीच शिकवले ना तुम्हांला नाही म्हणायला मग निर्णय आताच घ्या. एकदा का तुम्ही नाही शब्द उच्चारले की मग तुम्हांला कोणी विचारायला येणार नाही. काळजी करु नका.

फक्त एकच गोष्ट होईल की तुमचे आकडे तुम्हांला स्वत: लाच मोजावे लागतील. जसे शिशुपालाने मोजले. स्वत:चे आकडे स्वत; ला मोजावे लागण्यासारखे दु:ख नाही... म्हणून विचार करा मझ्या आईने सांगितले आहेत १२ तास... नीट निर्णय घ्या.

All the best .


हरी ॐ

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१२.०४.२०१२)


॥ हरि ॐ ॥
ॐ मंत्राय नम: मध्ये श्री गुरुक्षेत्रम मंत्र आपण बघतोय. पहिली ३ पदे झाली आता ४ थे पद ॐ ऎं र्‍हीं क्लीं चामुण्डायै विच्चॆ त्रिविक्रम निलयं श्री गुरुक्षेत्रम्‌ "
मनुष्य जेव्हा एकटाच चालत असतो‍, त्याच्या आजूबाजूला कोणीही नाही व बरोबरीने ही कुणीही नाही, तो चालतो ती जागाही अत्यंत  safe  आहे. रस्ताही चांगला आहे, सर्व धोके बाजूला केले आहेत, त्याला कामाची घाईही नाही. तर तो कसा चालेल? काही जण आरामात चालतील... काही सोबत कोणीही नाही म्हणून घाबरुन चालतील. 
एका शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला व त्यात त्याने ३००० लोकांचे शुटींग केले, त्या व्यक्तींना माहीत नव्हते की त्यांचे शुटींग होत आहे. 

ह्या एका ग्रुप सोबत दुसरा ग्रुप घेतला ज्यांना कामाची घाई आहे. अश्या लोकांना त्याच safe रस्त्यावरुन अर्धा कि.मी. चालायला सांगितले. तसेच तिसरा ग्रुप असा घेतला की ज्यांना घाईचे काम नाही पण त्यांचा रस्ता गजबजलेला आहे. चौथा ग्रुप असा घेतला त्यांचा रस्ता गजबजलेला आहे व त्यांना घाईचे कामही आहे. 
ह्या चारही ग्रुप ची तुलना केल्यावर असे लक्षात आले की, प्रत्येकाच्या हालचालीत व गतीत फरक आहे. रस्ता safe आहे हे सांगूनही पहिल्या ग्रुप मध्ये काही जण आरामात जातात तर काही जण एकटाच आहे म्हणून घाबरत चालतात. म्हणजेच मनुष्याच्या मनोवृत्तीनुसार प्रत्येकाची वेगवेगळी वर्तणूक दिसून येते.

दुसर्‍या ग्रुपमध्ये गजबलेल्या रस्त्यावरून घाईचे काम असूनही काही जण शांतपणे जातात तर काही जण उगाचच घाईघाईत जातात, कुठेतरी धडपडतात. 
ह्यावरुन निष्कर्ष काय तर रस्ता safe आहे की नाही? काम आहे की नाही? ह्यापेक्षा क्रिया कश्यावर अवलंबून असते तर मन कश्या रितीने response देऊ इच्छीते ह्यावर तुमचं वागणं अवलंबून असतं....काहीही नसताना सुध्दा मनावर परीणाम होत असतो...
काही जण आयुष्यात अमुक अमुक परिस्थिती होती म्हणून असे घडले असा दोष देत बसतात म्हणजेच आजुबाजुच्या परिस्थितीला दोष देऊन मनुष्य स्वत:चा बचाव करत असतो.

कधी कधी एकाच आई वडिलांची दोन मुले असतात.....तेच आई-वडील, तेच संस्कार...पण एक चांगला तर एक मवाली झालेला दिसतो . 
ह्याचाच अर्थ मनुष्याच्या मनाच्याबाहेर जे आहे त्याचा मनुष्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही.
 
इतकी लोकं रस्त्यावरून जात असतात. पण एकाचाच पाय खड्ड्यात पडतो. रस्त्यावर खड्डे नाही पण मनात खड्डे आहेत तर बाहेरच्या खडड्यात पाय पडणारच. बाहेरच्या परिस्थितीचा तुमच्या मनावर कधी परिणाम होतो जेव्हा तुमच्या मनात तशीच परिस्थिती असते तेव्हा. आपल्या जिवनात जे काही घडतं, ते पहिलं आपल्या मनात घडतं.. मग बाहेर घडतं. मनात भिती असेल तर चांगल्या रस्त्यावरून चालताना सुध्दा भिती वाटते.

परिक्षा झाल्यावर रिझल्ट लागेपर्यंतच्या काळात आपण मजा करतो, रिझल्ट आधीच लागलेला असतो आपण fail असतो पण जोपर्यंत तो रिझल्ट माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचा माझ्यावर परिणाम होत नाही. 
काही वर्षांपूर्वीची गोष्ट, S.S.C. ला पहिला आलेल्या मु्लाचा आधी fail म्हणून result आला होता, नंतर परत तपासणी करता तो मुलगा पहिला आल्याचे कळले. पण आधीच्या निकालाच्या tension मुळे ह्या नंतरच्या result चा त्याला काहीच आनंद वाटला नाही.
आमच्या सर्वांच्या जीवनात जे काही घडत असते ते आधी मनात घडते मग बाहेर घडत असते.

वाडील accident मध्ये वारले म्हणजे मुलाच्या मनात तसं होतं का? आम्ही स्थूलात कशाचाही संबंध कशाशीही लावतो. हा काय त्या मुलाचा दोष नाही. वडिलांचा accident ही त्यांच्या जिवनातील घटना आहे. त्यांच्या मनात accident घडला होता म्हणून तसे घडले.

मनात accident होणे म्हणजे काय? आपण अनेकवेळा दचकतो का? कारण अचानकपणे काहीतरी accidently  घडते. अचानक अपघात होऊन ईजा होणे म्हणजे accident . 

जेव्हा अचानकपणे तुमचे मन दुसर्‍या कोणाला तरी ईजा करते तेव्हाच तुमच्या मनात accident  घडतो. 
जेव्हा आपले मन दुसर्‍याला किंवा स्वत:ला अपघात करते तेव्हाच आमच्या जीवनात अपघात होत असतो हे लक्षात घ्या. १०० पैकी ९९ वेळा अपघात हे त्या मानवाने स्वत:च स्वत:ला केलेल्या अपघातामुळे होत असतात.

आम्ही स्वत:ला अपघात कसा करतो?
उद्या रविवार आहे, उद्या सगळे घर साफ करूया...घर साफ करता करता आमच्या मनात विचार येतो, सगळे जण साफ करतातच आहेत तर आपण जरा बाहेर फिरुन येऊया, सगळ्यांचे काम करुन झाले की मग येऊया. इथे घरात सगळे काम करताना आपण फिरुन येणे हा अपघातच आहे. कारण तुम्ही बाहेर फिरायला गेलात, मात्र तुमचे वयस्कर आई- वडिल, पत्नी- मुले सगळे काम करत आहेत म्हणजे इथे तुम्ही तुमच्या responsibility चा केलेला अपघात आहे, ह्यासोबत आई-वडिलांचा अनादर करणे, मुलांची काळजी न घेणे हाही भाग आहेच. 

ह्याने तुमच्या जीवनात काय होणार? तर तुम्ही ज्याच्यावर भरवसा टाकणार ती गोष्ट तुम्हाला दगा देणार.
म्हणजेच जेव्हा तुम्हांला जास्त घाई असेल तेव्हाच तुमच्या गाडीचे टायरच पंक्चर होणार, तुम्हांला ट्राफिक जाम लागणार, तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोचू शकणार नाही तुमचे नुकसान होणार, अश्या प्रकारचे अपघात तुमच्या जीवनात होणार . 

आता एका स्त्रीने समजा ठरवले की मी आजपासून भांडणार नाही, बिल्कुल रागवणार नाही आणि तेव्हाच तिच्या नवर्‍याने ठरवले की घरातली सगळी भांडी पाडायची, घरात सगळा कचरा करायचा. ही कशी रागवत नाही बघूया... तिच्या सासूने ठरवले हीच्या आईला शिव्याच घालायच्या. इथे ह्या दोन्ही व्यक्तींकडून त्यांच्याच मनाला अपघात घडवला जातो कारण त्या स्त्रीची भावना, तिचा हेतू चांगला होता.
दुसर्‍या व्यक्तीच्या चांगल्या निश्चयाच्या आड येणारे वर्तन तुमच्याकडून घडणे म्हणजे तुम्ही त्यांना केलेला अपघातच असतो.
म्हणूनच त्यानुसार तुमच्या जीवनात अपघात घडत असतात. तुमच्या जीवनातील ५०% अपघात हे ह्याच कारणामुळे घडत असतात. 

तुम्ही महिन्यातले २९ दिवस pass नेता मात्र ३० व्या दिवशी तुम्ही pass न्यायला विसरता आणि नेमके तेव्हाच तुम्हाला T.C. पकडतो हा अपघातच आहे.

मनुष्य जेव्हा दुसर्‍याने ३० दिवसांपैकी २९ दिवस चूक केलेली नाहिये अणि १ दिवस केलेली चूक आपण पकडून ठेवतो...तेव्हा ३० व्या दिवशी T.C. तुम्हाला पकडतो. दुसर्‍याने केलेल्या लहानश्या चुकीचा बाऊ करतो तेव्हा तश्याच प्रकारचे अपघात त्याच्या जीवनातही घडतात. २९ दिवस pass नेऊनही ज्या दिवशी तुम्ही pass न्यायला विसरता तेव्हाच T.C. तुम्हाला पकडतो. 

ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही वही-पेन घेऊन तुमचे सगळे अपघात लिहून ठेवा, सतत तापसून पहा. मी तुम्हांला असे कधी सांगणार नाही, मग ह्याला सर्वसाधारण उपाय काय? ह्यासाठी universal antidote काय? तर अत्यंत सोपी गोष्ट आहे .

प्रत्येक मानवाचे मन हे तीन घटकांनी बनलेले असते. बाह्य मन, आंतर मन व विवेक हे मनाचे तीन भाग असतात. मानवाच्या मनाच्या प्रत्येक बिंदुमध्ये ह्या तीन्ही गोष्टी म्हणजे ब्रम्हा, विष्णू व महेश हे वेगवेगळे अस्तित्वात नसतात. ह्या तिघांचेही कार्य एकमेकांना नेहमी पूरकच असते. 

माझ्या मनाचा प्रत्येक बिंदू हा एकाच वेळेला ब्रम्हा, विष्णू व महेश ह्या तिघांच्याही प्रदेशामध्ये आहेच. मग असे असताना मन वाईट का वागते ?

तर ह्याचे उत्तर ग्रंथराज देतो, जेव्हा मानव कल्पना करतो तेव्हा त्याच्या मनावर विष्णूच्या नाभीकमलातून बाहेर पडलेल्या ब्रम्हदेवाचे राज्य असते. असा ब्रम्हदेव ज्याच्या मागे मधु- कैटभ लागलेले आहेत. मधु- कैटभ म्हणजेच स्तुती व निंदा. 
ज्याक्षणी मनाचे वास्तवाचे भान सुटते तेव्हा मन विष्णुचे साहाय्य नसलेल्या ब्रम्हदेवाच्या हातात जाते. कल्पना शक्तीचा उपयोग खरंतर planning करण्यासाठी करायला हवा पण आपण त्याचा उपयोग मनोराज्यासाठी करतो. सर्व कल्पना ह्या शेवटी फलाशा आहेत. ही क्रिया घडू नये, ही सुध्दा आशाच आहे.

कित्येक घरात परिक्षा झाल्यावर मुलं घरी आली की आई वडील त्यांचा पेपर घेऊन बसतात ह्यामुळे मुलांचा confidence कमी होतो. अश्या आई-वडिलांना खरंतर treatment द्यायला हवी. नापास झाल्यावर मुलांना मारणारे आई-वडिल मुर्ख असतात. 
आपल्याला जे जमले नाही ते आपल्या मुलांनी करावे ह्यासाठी पालक मुलांवर जबरदस्ती करतात हे पूर्णपणे चुकीचे आहे. 
परिक्षा झाल्यावर पुढच्या पेपरसाठी मुलांना मदत करा. मुलं जेव्हा अभ्यास करीत नाहीत तेव्हा त्यांना ठॊकून काढणे योग्य आहे पण fail झाल्यावर मारणे बरोबर नाही. 

मुलांच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवता आला पाहीजे, जे आई- वडिल मुलांशी प्रेमाने वागतात त्यांची मुले confident  बनतात तर जे आई-वडिल मुलांवर फक्त ओरडतात त्यांची मुले एकतर भित्री व बावळट बनतात नाहितर मवाली बनतात.

बर्‍याच वेळा अनेक माणसे १०८ वेळा स्तोत्र किंवा एखादा गजर म्हटल्यावर देव दिसला, असे सांगतात. मग आम्ही पण आम्हांला सुद्धा दिसले हे सांगू लागतो, इथे मनोराज्ये सुरु होतात. हे कशाला हवे आहे? 
पण शेजारच्याला दिसले म्हणजे मला पण दिसलेच पाहीजे हा आमचा अट्टाहास असतो .
अख्खाच्या अख्खा देव आपल्या समोर उभा असतो अशी संधी वारंवार मिळते का? मग तेव्हा शांतपणे गजर करायचा सोडून आमचं लक्ष प्रकाश दिसतो की चक्र दिसते ह्याकडॆ असते. त्याला जेव्हा ज्याला दाखवायचे आहे तेव्हा त्याला तो दाखवणारच आहे पण त्यासाठी आम्ही मनोराज्ये करणे चूक आहे. 

मानवाच्या जीवनात जेव्हढ्या कल्पना कमी तेव्हढे accident कमी. म्हणून आपण कल्पना करतो आहे असे वाटले की मनाला थांबवायचे. पण असे करण्यासाठी मानवाकडॆ capacity कमी असते व ही capacity पुरवणारी शक्ती म्हणजे त्रिविक्रम. 

मागेही मी (प. पू. बापू) सांगितले होते की हरि-हराचे एकत्रित रुप, सद्‌गुरुतत्त्वाचे प्रतीक म्हणजे त्रिविक्रम . 
जो कोणी खराखुरा सद्‌गुरु आहे, मग जरी तो ५०० वर्षांपूर्वी झाला असला तरी तो ह्या त्रिविक्रममध्ये आहेच .
हाच मनुष्याला मायेच्या प्रांतातून दुर नेतो. त्रिविक्रम हे प्रतिक पण आहे, चिन्हही आहे त्याच वेळी ही एक विश्वव्यापक आकृती आहे, विराट चैतन्य आहे. ह्या त्रिविक्रमाचे लॉकेट आपण गळयात घालतो, ह्याचे स्मरण आपण गुरुक्षेत्रम्‌ मंत्रात करतो. 
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा accident मधून वाचवायची ताकद सद्‌गुरु तत्त्वाशिवाय अन्य कशातही नाही. 

म्हणून ह्या त्रिविक्रमाला आपलासा करा. ह्याचा फोटो नक्की खिशात ठेवू शकता पण जेव्हा त्रिविक्रमाचे नाव तुम्ही गुरुक्षेत्रम्‌ मंत्रामध्ये घेता तेव्हा त्याचे फळ हे १०८ वेळा ॐ त्रिविक्रमाय नम: असे बोलण्याच्या बरोबरीचे आहे, हे आपल्याला समजायला हवे.

गुरुमंत्र म्हणजे काय तर जो एकदा म्हटल्यावरही मला १०८ वेळा म्हटल्याचे सामर्थ्य प्राप्त होते. जेव्हा मी श्रद्धेने गुरुमंत्र म्हणतो तेव्हा तो माझ्या शरीरातील १०८ केंद्रावरही कार्य करतोच. माझ्या weak केंद्रांना strong बनवण्याचे कार्य हा त्रिविक्रमच करत असतो . 

त्रिविक्रम निलयं ह्यातील निलय म्हणजे काय तर घराचा असा भाग की जो फक्त खास घरातल्यांसाठीच आहे. 
गुरुक्षेत्रम हे कुठल्या विशिष्ट जागेशी संबंधीत नाही. गुरुक्षेत्रम म्हणजे काय हे आम्हांला नीट कळले पाहिजे, हे पाच गोष्टींनी बनलेले आहे ते म्हणजे ती अनसूयेची तसबीर, ती दत्तगुरुंची तसबीर, महिषासुरमर्दिनी, धर्मासन व ह्या चारही गोष्टींवरचा stamp म्हणजे त्रिविक्रम. आज गुरुक्षेत्रम इथे मुंबईत आहे उद्या मला वाटले तर अमेरिकेत नेईन, पाकिस्तानात नेईन, मी मागेही सांगितले आहे पाकिस्तान हा देश मला फार आवडतो ह्यासाठी कोणाचे काही objection असेल तर मला त्याचे काहीही घेणे देणे नाही. 

गुरुक्षेत्रम मंत्र हा मला माझ्या सद्‌गुरुंनी दिलेला मंत्र आहे. जेव्हढा वेळ तुम्ही गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणता त्यावेळी तेव्हढा वेळ ते गुरुक्षेत्रम्‌ तुमच्या मनामध्ये तयार होत असते आणि गुरुक्षेत्रम्‌ आले म्हणजे त्यातील चारही गोष्टी व त्रिविक्रमही आलाच ह्यांच्यासोबत त्या धर्मासनावर बसलेला आमचा मित्रही तेव्हढया वेळेसाठी आमच्या मनामध्ये येतो. पण जर मी १० वेळा म्हटले तरी काही फायदा झाला नाही असा विचार करुन मी हा मंत्र म्हटला तर काहीही उपयोग होणार नाही. 

दिल्लीतल्या घरात दोन जागा असतात एक दिवाण-ए-आम आणि एक दिवाण-ए-खास ह्यातील दिवाण-ए-आम हे सगळ्या लोकांसाठी असते तर दिवाण-ए-खास हे फक्त घरातील खास व्यक्तींसाठी असते.
निलयं म्हणजेच दिवाण-ए-खास . "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी..." 

गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणताना काम, क्रोध ह्यांची मनातील गर्दी हलवायचा प्रयत्न करा.
समजा १०८ वेळा जर पूर्ण म्हणता येत नसेल तर फक्त अंकुर मंत्र १०८ वेळा म्हटला तरी चालेल. 
माझे मन मला गुरुक्षेत्रम्‌ मंत्रासाठी दिवाण-ए-खास बनवायला हवे 

मंत्र म्हणताना एखाद वेळी चुकलो तर tension नको आमचा बापु बसला आहे सांभाळून घ्यायला.

पण असे म्हणताना जर एरव्ही बापूवर विश्वास नसेल तर काहीही उपयोग नाही.
मी (प.पू.बापु) गेल्यावेळी सांगितले मला जेव्हढे आवश्यक तेव्हढेच ऐकू येते, आवश्यक तेव्हढेच दिसते. आमचा बापू कसा आहे तर रोबो आहे, यांत्रिक मानव आहे व त्याची बटणं आमच्या हातात आहेत. त्याची आमच्याकडे पाहण्याची, बोलण्याची बटणं आमच्याच हातात आहेत. जर आम्ही चालण्याचं बटण बंद केले तर तो आमच्याकडे चालत येणार नाही, म्हणजेच बापूने माझ्यकडे चालत यायचे की नाही हे कोण ठरवतो? तर मीच ठरवतो व ह्यालाच कर्म स्वातंत्र्य म्हणतात . 
बापूने आमच्यासाठी काय करायचे हे ठरवणारा रिमोट कंट्रोल कुणाकडॆ आहे तर आमच्याच कडे आहे. पण असे असले तरी तुमच्या संगण्यावरुन तो दुसर्‍याला सजा देणार नाही हे लक्षात ठेवा. 

तुमच्याकडे असलेला रिमोट कसा वापरायचा हे तुम्ही ठरवत नाही. जेव्हा बापूला काहीही समजत नाही असा विचार मनात येतो तेव्हा माझ्याकडच्या रिमोट्चे बटण मी बंद करतो आणि मग बापूला काहीही काळत नाही. 
मी ह्याआधीही अनेक वेळा हे सांगितले आहे की मला काहीही कळत नाही. मी कधी भगवे कपडॆ घालतो का? 

मी दिसायला तुमच्यासारखाच आहे मला काही चार हात किंवा दहा पाय नाहीत, मी कुठेही भाला- धनुष्य घेऊन फिरत नाही... मग अश्या माणसाचे प्रवचन ऐकुन तुम्हांला काय मिळणार आहे? 
आज ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने स्वत:हून प्रेमाने द्यायचे आहे? मी बापूकडे का येतो? माझ्यात आणि बापूत काय फरक आहे?

माझ्या एका student ची गोष्ट इथे सांगतो, मी M.D. साठी त्याला शिकवायला होतो. M.D च्या परिक्षेसाठी lucky म्हणून माझा एप्रन व स्टेथोस्कोप तो घेऊन गेला होता. परिक्षा झाल्यावर मी तिथेच त्याच्या रूम बाहेर उभा होतो. हा जेव्हा परिक्षेवरुन आला तेव्हा त्याने आल्या आल्या तो अप्रन व स्टेथोस्कोप समोरच्या खुर्चीवर ठेवला व तिथे मी आहे असे समजुन म्हणाला, "Dr.A.D.Joshi, I passed my exams, we both are equal. you also M.D and i am also M.D..Sir now no more firing please."
मी तिथेच उभा राहुन हे ऐकत होतो. इथे ह्या मुलाचा बालभाव होता त्या क्षणासाठी त्याचा शिक्षक त्याचा मित्र झाला होता व तो त्यास मी पास झालो आहे सर, आता मला तुम्ही ओरडायचे नाही, हे कौतुकाने सांगत होता.

हाच मुलगा त्याच्या लग्नाच्या वेळी सकाळी माझ्या दादरच्या घरी आशीर्वाद घेण्यासाठी आला व परत लग्नानंतरही बायकोसोबत आशीर्वाद घेण्यासाठी आला. त्याच्यासाठी मंदिरातील देव नंतर होते आधी सरांना नमस्कार हा त्याचा भाव होता. 
आमचा बापू काय करतो तर बापू शरीराची व मनाची treatment करतो, 
पण अश्या treatment पेक्षा रोग होऊच नये म्हणून काय करता येईल हे मला जास्त आवडते. 
आज बापूमध्ये काय एव्हढे special आहे हे विचार करायची वेळ आली आहे. 
मी मागेच सांगितले की ह्यापुढे अनेक भुकंप येतील, खालची माती वर येईल, जमिनीतील बाहेर येईल, बाहेरचं जमिनीत जाईल, समुद्र किनारा सोडून आत येईल, मोठी संकटे येतील ह्या धर्तीवर आमची श्रद्धा बळकट असायला हवी. आम्हांला compitant, potent होता आले पाहिजे. 
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मी सांगितले होते,
"एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऎसा.." 
हे वर्ष अत्यंत महत्वाचे आहे. कारण ह्या वर्षाच्या आधीच्या परिस्थीतीत व ह्या वर्षाच्या नंतरच्या परिस्थीतीत जमीन-अस्मानाचा फरक असणार आहे.

बापू तर आमच्या सारखाच आहे(?) असा विचार करुन आम्ही पाऊल पुढे टाकायचे की नाही हे ठरवायचे आहे. हे तुम्हांला खिजवण्यासाठी नाही बोलत आहे तर तुमच्याच मनात गुणसंकिर्तन घडावे म्हणून सांगत आहे . 

हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे उद्यापासुन पुढच्या गुरुवारपर्यंत वेड लागल्यासारखा गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणा, वेळ-काळाचे सोवळं-ओवळ्याचे भान नसले तरी चालेल.

कारण ह्या सात दिवसांमध्ये मी माझ्या तपश्चर्येचा संकल्प खेळवतोय. मी जी तपश्चर्या केली त्याचा संकल्प मी ह्या सात दिवसात मुक्तपणे खेळवतोय. ह्या काळात जो कोणी हा अनिरुद्ध माझा आहे असे म्हणून मन:पूर्वक गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणेल (सांघिक पणे नाही तर एकट्याने) त्यांना मी promise करतो की त्यांच्या मनाचा ५१% भाग हा १०८% त्रिविक्रमाच्या ठशाखाली येणारच. ५१% ही majority आहे हे लक्षात घ्या. म्हणजे इथे सत्ता कोणाची असणार आहे तर चण्डिकाकुलाची. 

माझ्या तपश्चर्येचा संकल्पच हा आहे " अवघाचि संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक" प्रत्येकाला मनाचे सामर्थ्य मिळावे म्हणुन मला जे तपश्चर्येमधुन ब्रम्हास्त्र मिळाले आहे ते मी प्रेरित केले आहे .

एक ध्यानात ठेवा मंत्र म्हणताना तुलना करु नका, तुम्ही जेव्हढं जास्त कराल तेव्हढ माझ काम सोप्प. मी कमीत कमी ५१% सांगितले आहे... अधिक केले जास्त मिळणार नाही असे म्हटले नाही, ते मिळणारच आहे आलं लक्षामध्ये.

ह्या सात दिवसात स्वत:च्या मनामध्ये कायमचं त्रिविक्रमनिलय तयार करण्याची संधी प्रत्येकाला आहे. आज इथून निघताना सुरुवात करा... बापू आम्हांला आवडतो की नाही? आवडतो तर का आवडतो? आवडत नाही तर का आवडत नाही ? ह्याचा विचार हा मंत्र म्हणताना करा. 
मला जरी कुणीही कितीही शिव्या घातल्या तरी ह्या सात दिवसात जर त्याने हा मंत्र म्हटला तर त्यालाही ह्याचे सामर्थ्य मिळणारच आहे. 

आता तुमच्या सोबत मी मंत्र म्हणतोय म्हणजे सुरुवात झाली आहे. जेव्हा आपण पुढच्या गुरुवारी इथे हा मंत्र म्हणणार तेव्हा ह्याचा last minute असेल. आपल्या मित्रांना, नातेवाईकांनाही कळवा.

आमचा बापू आमच्यासाठी काय आहे हे तुम्ही ठरवायचे आहे. मी तुमचा रोबो आहे .
॥ हरि ॐ ॥