Subscribe:

Saturday, September 17, 2011

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१५.०९.२०११)


!! हरि ॐ!!

    ॐ मंत्राय नम: मध्ये श्रीगुरुक्षेत्रम्‌ मंत्र आपण बघत आहोत. ह्यात सर्वबाधाप्रशमनं म्हणजे काय ते बघितले. आता सर्व पापप्रशमनं व सर्वकोपप्रशमनं ही पुढची दोन पदे आहेत.
    पाप शद्ब आपण लहानपणापासून ऐकतो, ह्याची व्याख्या प्रत्येक ग्रंथात, पुस्तकात वेगवेगळी दिलेली आहे. आम्हांला पाप म्हणजे काय? हे कळत नाही, असं म्हणणारा मनुष्य नक्कीच खोटं बोलतो असे समजावे. कारण, मागे मी (परमपूज्य बापू) सांगितले होते की, ज्याला अन्न व मल ह्यातला फरक कळतो, त्याला पाप व पुण्यातला फरक नक्कीच कळतो. सर्वसामान्य मनुष्य पाप करण्याचा प्रयास कधी करत नाही, त्याची इच्छा असते नेहमी चांगलं करण्याची.
    मराठीत एक म्हण आहे, ‘वडाच्या पूजनाला निघाली आणी येड्याबरोबर पळाली’ म्हणजे काय? तर पतिव्रता बनायला गेली आणि व्यभिचारी झाली. असंच सामान्य माणसाचे होत असते. चांगल बनण्याचा प्रयास करताना नेमकं नको ते घडते.
    नको तेव्हा नको ते केलं असं घडल्यावर मनुष्य कितीही ज्ञानी असला तरी त्याच्या मनात गोंधळ तयार होतो. पूर्वी मुंबईच्या रस्त्यावर रात्री ९ नंतर फिरणारे कुणी नसायचे, आणि आता मुंबई रात्रीचीच जास्त जागी असते. आता तर पुण्यातसुद्धा हिच प्रथा सुरु झाली आहे. हे सगळे बदल कसे घडले?
    इथे बर्‍याच जणांना माहित असेल, ४ ऑक्टोबर १९९९ ला जुईनगरला जेव्हा भूमीपूजन केलं तेव्हा आजूबाजूला शेतं होती स्टेशनवरुन थेट आपली बिल्डिंग दिसायची. २००० च्या मे पासून हळूहळू चित्र बदलले, आता आजूबाजूला सगळ्याच बिल्डिंग झाल्या आहेत. हे झालेले बदल आपण सगळ्यांनी पचवले आपल्या जीवनातले देखील असेच अनेक बदल आपण पचवत असतो.
    हल्ली फास्ट फूडच्या नावाखाली चायनीज खाणार्‍यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, आमच्या मेडिकल बूक्समध्ये  चायनीज फुड सिड्रोम हा विषय आहे. चायनीज बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पदार्थांमध्ये मेंदूला irritate करणारी द्रव्ये असतात. तरी आम्ही ते आवडीने खातो. घरात पोळी भाजी करताना बायकोचे हात दुखतात. आज आम्हाला घरी जेवण बनवायला लाज वाटते.
    बर्‍याचशा पालकांची तक्रार असते की मुलं ऐकत नाहीत. पण ह्यात खरं तर आईबाबांची चूक असते. मुलांना हल्ली आई-वडिल कायम protection मध्ये वाढवतात. जे जे मागेल ते ते आणून देतात त्यामुळे मोठेपणी ह्या मुलांना कुठलीही जबाबदारी टाकली की ते संकट वाटते.
    लग्न ठरवताना मुलीची आई सांगते, ‘मुलीला जेवण बनवता येत नाही’ ह्यात त्या आईचीच चूक आहे. कारण तिने कधी मुलीला शिकवलेलेच नसते. स्त्री पुरुष कितीही समानता असली तरी स्त्रीने तिचे आईपण जपलेच पाहिजे.
    हल्लीच्या मुलांना घर साफ करणे, घरातल्या बिघडलेल्या गोष्टींची रिपेअरी करणे ही कामे माहितच नसतात. एखादा दिवस बायको आजारी असेल तर जेवण बनवायची नवर्‍यांना लाज वाटते.
    आई वडिल मुलांना लहानपणापासून मागेल ते देतात, त्यामुळे त्यांना ‘नाही’ ऐकायची सवय नसते म्हणून ही मुलं मोठेपणी agressive होतात. घरात मुलांसमोर जर नवरा-बायको भांडत असतील तर मुलांवर काय संस्कार होणार? भांडण असावं नवरा-बायकोमध्ये पण ते मुलांसमोर कधीच करु नका.
    घरात निर्णय घेताना आई-वडिलांनी एकमेकांशी विचार-विनिमय जरुर करावा. मुलांना आईच्या नजरेचा धाक असायलाच हवा तसेच ‘बाबांना सांगू का?’ असं म्हटल्यावर जी मुलं सळसळा कापतात, ती मुलं कधीच बिघडत नाहीत.
    स्त्रीने सासू-सासर्‍यांशी कितीही पटत नसेल तरी ते मुलांसमोर कधीही बोलू नका हल्ली स्त्रिया नवर्‍याला सगळ्यांसमोर काहीही बोलतात. हे ही पूर्णपणे चूक आहे.
    family prays together, stays together  जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते, ते नेहमी एकत्र राहते.दिवसातून एकदा तरी थोडावेळ का होईना सर्व कुटुंबाने एकत्र प्रार्थना करायला हवी. हल्ली privacy च्या नावाखाली सगळं हातच राखून असते.
    आजच्या काळात लग्नात बघा, जेवणाच्या वेळात सगळी मंडळी येतात. अक्षता टाकल्या की सगळे जेवणाकडे धुम ठोकतात. तसेच तिरडीवर ठेवताना पण हल्ली पाच माणसं पण येत नाहीत. एवढी आमची माणुसकी आज मेली आहे.
    स्त्रियांच्या झिम्मा-फुगडीच्या खेळात एक गाणं आहे, ‘गरे बाई गरे, फणसाचे गरे, खाईल त्याची म्हातारी मरे, मेली तर मेली कटकट गेली, उद्या मरायची ती आजच मरे’ बघा, खेळातल्या गाण्यात म्हातारीच्या मरणाची इच्छा असं का?
    कुटुंबात वयस्कर व्यक्ती असणं खूप आवश्यक असतं. भारताला एकत्र कुटुंबपद्धती मुळेच बळ प्राप्त झाले आहे. पूर्वी संस्थानांचे एकत्र विलिनीकरण केल्याने भारत तयार झाला. म्हणून ह्याला आधी भारतवर्ष (हिंदुस्थान) म्हटले जायचे. ह्याच मातीत तुम्ही जन्मल्यामुळे तेच भारतमातेचे genes तुमच्यात आहेत.
    म्हणून कितीही पापे तुमच्याकडून घडली तरी तुम्हांला मार्ग मिळू शकतो. तुम्ही टिकून राहू शकता बाकीच्यांचे मला माहित नाही. त्यामुळे बाकीच्यांची मी (परमपूज्य बापू) गॅरंटी देऊ शकत नाही.
    जो माझ्यावर (परमपूज्य बापू) प्रेम करतो, त्याची मी काळजी घेतो. भारताची जी ही २५०० वर्षाची genes आहेत ती तुम्हां प्रत्येकात आहेत व ही genes (गुणसुत्रे) तुमच्यात कशी वाढवायची हे arrange करणारा मी कॅटरर आहे. मी डॉक्टरकी करतो, रोगांवर उपचार करतो, म्हणजे मी डॉक्टर आहे, मी नवीन गोष्टी घडवतो, construction  घडवतो म्हणजे मी इंजिनीअरही आहे. कॅटररही आहे, तुम्ही केलेला कचरा मी साफ करतो म्हणजे मी भंगीही आहे. तुमची पापं धुण्याचं मी काम करतो म्हणजे मी धोबीपण आहे. मी बलविद्या शिकवतो म्हणजे मी शिक्षकही आहे. किर्तनरंगात मी नाटके, नृत्ये ह्यांचे दिग्दर्शन केले होते, म्हणजे मी डायरेक्टर पण आहे.
    ह्यासोबत मी सगळीकडे फिरत असतो. तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या घरात मी फिरतो, म्हणजे मी भटक्यापण आहे. म्हणजे मी (परमपूज्य बापू) किती धंदे करतो बघा!
    ह्यासोबत मी उत्तम शिकारसुद्धा करतो. मला शिकार करायची असेल तर मी फक्त मि.किरातरुद्रांना सांगतो, ते शिकारी आहेत. त्यांच्याकडून मीही शिकलो. माझा नेम अगदी अचूक आहे. आपल्याकडे म्हण आहे, १२ गावचं पाणी प्यायला आहे. पण मी (परमपूज्य बापू) १२ लाखं गावचं पाणी प्यायलो आहे.
    तुमच्या भौतिक, मनोमय देहाची मी काळजी घेतो. जर तुम्ही माझ्यावर खरोखर प्रेम करता, तर एकच कृपा करा, ते म्हणजे, ‘चिंता करायची सोडून द्या.’ तुम्ही एवढ्या कायम चिंता करता की, बापरे बाप!    ‘तुम्ही काळजी करायचं सोडून द्या, त्याऐवजी काळजी घ्या.’
    तुमच्या सततच्या चिंता करण्यामुळे ज्याची तुम्ही चिंता करता त्याची मूर्ती तुमच्या मनात कोरली जाते. त्यामुळे ‘भक्ति-भावापासून’ दूर जाता. म्हणून एवढचं कायम लक्षात ठेवा. ‘माझा बापू आहे....आहेच’.
    आजपासून एक वाक्य कायम मनात ठेवा, ‘‘आमचा बापू हळूहळू आमच्यासाठी सगळं काही नीट करत आहे.” हे नुसतं वाक्य नाही, हा बापूचा मंत्र आहे हे लक्षात ठेवा. ह्यातले हळूहळू म्हणजे जाच्यासाठी जो speed  आवश्यक आहे, तो speed.
    हे वाक्य आजपासून मनापासून चिंतन करा. तुमच्या सगळ्या चिंता आपोआप दूर होतील तुम्ही हे वाक्य विसरलात तर माझ्या (परमपूज्य बापू) डोक्याला चिंता वाढतात. 
    मला द्यायचं असेल तर तुमचं पाप द्या, त्याबदल्यात तुम्हांला कधीच दुप्पट पाप मिळणार नाही.

"एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरु ऐसा"

    माझं काम सोपं व्हावं म्हणून मी तुम्हांला सांगतोय. हे वाक्य (बापूमंत्र) प्रत्येकजण आपापल्या भाषेत म्हणू शकतात. पण माझ्यावर (परमपूज्य बापू) प्रेम करणार्‍या प्रत्येकाच्या मनात हे वाक्य (बापूमंत्र) रुजलं पाहिजे. हे वाक्य म्हणजे बीज आहे, ह्याचा मनात वृक्ष व्हायला पाहिजे.
    हे वाक्य म्हणजेच बापूंचा खरा मंत्र आहे. चण्डिकाकुलाची व्याख्या तुम्हांला प्रत्यक्षमधून सांगितली. गुरुक्षेत्रम्‌चा लाभ जास्तीत जास्त घ्या. तिथे दर्शन घ्या, अर्पण करा. गुरुक्षेत्रम्‌ ही अशी जागा आहे की कुठल्याही श्रद्धावानाने केलेली प्रार्थना ही त्या षटकोनात येते व त्या त्या भक्ताच्या प्रारब्धानुसार चण्डिकाकुल कार्यरत होते म्हणून गुरुक्षेत्रम्‌शी नातं जास्तीत जास्त जवळ घट्ट करा. हा बापूंचा मंत्र जास्तीत जास्त जवळ केला तर, तुमच्या चिंतेलाच चिंता करावी लागेल.

!! हरि ॐ !!
 प्रवचनानंतर परमपूज्य बापूंनी एक सूचना केली -
    आपण इथे ‘रामोराजमणि’ म्हणतो, त्यात बर्‍याच जणांकडून ‘भझे’ म्हटले जाते. ते ‘भझे’ नाही तर ‘भजे’ आहे. चुकून चूक झाली तर काही पाप लागत नाही पण ह्यापुढे म्हणताना लक्षात ठेवायचे ‘रामं रमेशं भजे’.
!! हरि ॐ!!

Wednesday, September 14, 2011

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०८.०९.२०११)


                                         !! हरि ॐ!!

    ‘ॐ मंत्राय नम:’ गुरुक्षेत्रम् मंत्राविषयी बघत आपण पुढे चाललो आहोत. १३ पदांचा हा मंत्र आहे. १३ हा अतिशय शुभ अंक आहे. माझा (परमपूज्य बापू) आणि नंदाचा विवाह १३ मे ह्याचदिवशी झाला. पौरसचा जन्म ही १३ एप्रिलचाच. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्रही १३ आकडी. १३ अंक हा कधीच अशुभ होऊ शकत नाही. श्रद्धावंतांसाठी अतिशय लकी आकडा आहे.

    गुरुक्षेत्रम्‌मंत्राच्या १३ पदांपैकी पहिले पद आपण बघितले, ‘सर्वबाधाप्रशमनं’ प्रत्यक्षच्या अग्रलेखांमधून चण्डिका कुल समजून घेतले, त्यांची स्कंदातील स्थाने बघितली.
    गुरुक्षेत्रम्‌ मंत्रातील पहिले पद ‘सर्वबाधाप्रशमनं’ व त्यापुढे ‘सर्वपापप्रशमनं’ व ‘सर्वकोपप्रशमनं’ ही पदे येतात. हे आधीच लक्षात ठेवून मी (परमपूज्य बापू) काही महिन्यांपूर्वीच कामाला लागलो व माझ्या १०८ मेकअपमनना पण कामाला लावले. माझे मेकअपमन कुठल्या रुपात तुमच्या समोर येतील तुम्हांला कळणारही नाही, त्यांनी मग सगळीकडे जाऊन बघितले कोण गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणतो, कोण दुसर्‍यांनी केलेल्या लड्या स्वत:च्या नावावर जमा करतो. हे सगळं बघितल्यावर माझ्या लक्षांत आलं की, माझ्यावर प्रेम करणा‍र्‍या श्रद्धावंताच्या उपासना नीट होत नाहीत. कायिक, वाचिक, मानसिक अनेक चुका त्यांच्याकडून घडत आहेत. मग मी (परमपूज्य बापू) विचार केला की, माझं ह्या गुरुमंत्रासोबत असणारे अभयवचन खरं ठरावं, ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्रिपुरारि पौर्णिमेला किरातरुद्र येणार आहे, मग त्यासाठी माझ्या बाळांची तयारी कितपत आहे, हे आवश्यक आहे.

    ह्यासाठी मी (परमपूज्य बापू) अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, प्रत्येकाने ‘श्रीराम’ म्हणा.
    ह्या अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते शुभंकरा नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच रामनवमीपर्यंत मी स्वत: माझ्या माय चण्डिकेची घोर तपश्चर्या करणार आहे.कारण, माझ्यावर प्रेम करणार्‍या श्रद्धावंताच्या चुका, पापे जास्तीत जास्त dilute  करुन, त्यांना क्षमा मिळावी, अशी माझी इच्छा आहे. यासाठी माझ्या आईची उपासना करुन गुरुक्षेत्रम्‌ मंत्राचे सामर्थ्य प्रत्येकाला प्राप्त होईल, अशी यंत्रणा निर्माण करणार आहे.

    ह्या सहा महिन्याच्या काळात मी गुरुवारी प्रवचन करेनच असे नाही, मला वाटले तर मी बोलेन, नाहीतर नाही बोलणार. कदाचित दर गुरुवारी येणारही नाही. पण मी गुरुक्षेत्रम्‌ मध्ये नक्की रोज खाली येईन. एकदा येईन की १० वेळा येईन मला (परमपूज्य बापू)  माहीत नाही.
    मी (परमपूज्य बापू) basically ह्या सहा महिन्याच्या काळात संपूर्ण procen मध्ये मुक्तावस्था स्विकारणार आहे. कारण मी माझ्या बाळांची परिस्थिती बघतोय. कुठे बॉम्बस्फोट होतोय, भूकंपही होतोय. प्रत्येकाच्या जीवनातही अनेक संकटे येतच आहेत, सगळीच गणितं बिघडत चालली आहेत.
    परव दिवशी घरात बोलत होतो, तेव्हा कळले की, मोदक ४०० रुपये किलो झाले आहेत.१९७० साली ८ ते १० रुपये साधे मोदक असायचे, आज तेच ४०० रुपये किलो झाले आहेत. आज आमची परिस्थिती काय होत चालली आहे? सकाळी घराबाहेर पडलो की परत घरी सुखरुप येईपर्यंत चिंता लागून असते. मुलगा-मुलगी कितीही चांगले असले तरी बाहेर जाऊन ते बिघडणार नाही ना? ही चिंता सतत पालकांना असते.

    ह्या सगळ्या गोष्टींना माझ्या परिवारात तरी आळा बसला पाहिजे. मी संत नाही, मी partial आहे. जे माझ्यावर प्रेम करतात, त्या प्रत्येकासाठी मी partial आहे. मला पापांची घृणा आहे पण पापियाची नाही. जोपर्यंत पापी सुधारायला बघतो, तोपर्यंत मी त्याच्यावर प्रेम करतो.
    आजच्या स्थितीत आपल्याला चांगल्या प्रकारे भक्ति व सेवा करता आली पाहिजे. 
    मला (परमपूज्य बापू) प्रत्येक बाळाला, तो कितीही दलदलीत रुतला असेल व त्याचं माझ्यावर प्रेम असेल तर मला तिथे येऊन हात देता आला पहिजे. यासाठीच मला माझ्या आई चण्डिकेची तपश्चर्या करायची आहे.

    ही तपश्चर्या प्रामुख्याने तीन प्रकारे होणार आहे -

१) आदिमाता चण्डिकेच्या ब्रह्मत्रिपुरसुंदरी स्वरुपाची उपासना

२) माझ्या (परमपूज्य बापू) गुरुंनी दिलेली बलातिबला उपासना
३) सावित्री उपनिषदानुसार सावित्री स्वरुपाची उपासना


    ही उपासना अश्विन शुद्ध नवरात्रीच्या अर्थात अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते चैत्र नवरात्रीच्या अर्थात शुंभकरा नवरात्रीच्या नवव्या दिवसापर्यंत म्हणजेच रामनवमीपर्यंत चालणार आहे. ह्या काळात मी स्वत:ला कुठलेही बंधन ठेवणार नाही पूर्णपणे उन्मुक्त अवस्थेत मी स्वत:ला ठेवेन.
    कारण मला माझ्या बाळांच्या घडणार्‍या चुका दिसतात, अशावेळी मी शांत बसू शकत नाही. मी माझ्या मार्गाने पुढे चालणारच आहे. तुम्ही म्हणाल, ‘अशावेळी बापू आम्ही काय करायचे?’ तर, जेवढे जमेल तेवढी उपासना करा. कमीतकमी दिवसातून १ वेळा विश्वाच्या कल्याणासाठी हनुमानचलिसा अर्पण करा. तेव्हा म्हणायच, ‘बापू, विश्वकल्याणासाठी ही हनुमानचलिसा समर्पित.’
    स्वत:ला घ्या काळात पापी समजून दोष देऊ नका, स्वत:ला कमी लेखू नका. कारण माझा बापू माझ्यासाठी बसला आहे. जो मला कधीच टाकणार नाही, ह्या गोष्टीवर ठाम विश्वास ठेवा.

    ह्या सहा महिन्याच्या काळात मी २४ x ७ तपश्चर्येत असणार आहे. मी आणि माज़ी आई बस एवढच नातं ह्या काळात असणार आहे. बाकी सगळे संभाळायला तिचे ज्येष्ठ पुत्र दत्तात्रेय व हनुमंत सिद्ध झालेले आहेत. सोबत तुमची नंदाई आणि सुचितमामाही सर्व समर्थपणे सांभाळायला आहेतच.
    ह्या तपश्चर्येतून दोन गोष्टी साधल्या जाणार आहेत त्या म्हणजे - 

१) सर्वांग ब्रह्मस्त्र व 
२)सर्वांग करुणाश्रय


    जे जे चुकीचे वाईट आहे, माझ्यावर प्रेम करणार्‍यांना त्रास देणारे आहे, त्यांच्यासाठी ब्रह्मस्त्र असेल तर जे माझ्यावर (परमपूज्य बापू) प्रेम करतात, भारतावर प्रेम करतात त्यांच्यासाठी सर्वांग करुणाश्रय असेल. ह्या दोन गोष्टी मी स्थिर करुन रामनवमीच्या दिवशी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये स्थापन करणार आहे.
    तिसर्‍या महायुद्धाचे पडघम वाजू लागले आहेत, असं मी मागे म्हटलं होते त्या डाकिणीचा संचार सुरु झाला आहे. आता मला उभं राहायलाच पाहिजे अतिशय शांतपणे.
     ‘सर्वपापप्रशमनं श्रीगुरुक्षेत्रम्‌’ सर्व पापांचा उद्धार ह्यातून होऊ शकतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी होऊ शकतो, मग आम्ही का नाही बदलू शकत? नक्कीच बदलू शकतो.

   खूप मोठी विकासाची संधी ह्या सहा महिन्याच्या काळात अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हांला मिळणार आहे, कारण इथे सोबत माझीही उपासना असेल. मानवी मर्यादा असल्याने तुम्हांला कायम उपासना करायला जमणार नाही, मला मान्य आहे पण माझ्यावर प्रेम करणार्‍या बाळांची ताकद नक्कीच मोठी आहे.
    ह्या काळात मी प्रवचनात बोलणार नाही, पण काही गोष्टी अशा आयोजित करणार आहे, की ज्यामुळे तुमची क्षमता व सामर्थ्य अधिकाअधिक वाढेल. तुम्हांला याचक बनावे लागू नये, यासाठी माझे प्रयास आहेत, हे उपकार नाहीत. आई-वडिल आपल्या बाळांसाठी करतात ते कधी उपकार नसतात.

    माझी theory साधी सोपी आहे, माझं घर पहिले, माझं घर म्हणजे हॅप्पी होम मधले सातव्या मजल्यावरचे घर नव्हे तर माझं घर म्हणजे माझ्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण.
      एखादी उपासना करताना जर उच्चार नीट जमत नसतील, तर ती जबाबदारी माझी, तुमची नाही. बापू समर्थ आहे, तुमचं ओझं बाळगायला.
    जोमदारपणे आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. रामनवमीनंतर परत आधीप्रमाणेच प्रवचन regular सुरु होईल. किंवा त्यात काही changes  असतील तर ते तेव्हा ठरतील.
    निर्धास्त रहा, confident  व्हा आणि सुखाने जगा, एवढीच माझी इच्छा आहे. आज आपण गुरुक्षेत्रम्‌ मंत्र ५ वेळा म्हणणार आहोत.

                                                           !! हरि ॐ!!