Subscribe:

Thursday, November 10, 2011

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०३.११.२०११)


  • ॥ हरी ओम॥
    आषाढ पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा ह्या पौर्णिमा वेगळ्या नावाने ओळखल्या जातात. आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा, अश्विन पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखल्या जातात.
     
    ह्या त्रिपुरारीच्या आईचं नाव महिषासूरमर्दिनी आहे, ज्याला तिने मारला त्या नावाने ओळखली जाते त्याप्रमाणे ह्याने त्रिपुरासुराचा नाश केला म्हणून त्रिपुरारी म्हणतात.
     
    साध्या गोष्टीत छान शोधणं, छान बनवणं म्हणजे चिंतन. मूल जेवत का नाही ह्याबद्दल आई विचार करते म्हणजे चिंतन करते. नंतर ती लहान मुलाला कुठले पदार्थ आवडतात ह्याचा शोध घेते आणि मग निरनिराळ्या भाज्या भातांमध्ये, पराठ्यामध्ये घालून मुलाला आवडेल असं खायला बनवते हा तीचा अभ्यास म्हणजे सराव असतो. साड्या घेताना बायका चांगल्या साड्या कुठल्या, कुठल्या साड्या माझ्या मैत्रिणीकडे नाहीयेत ह्याचं चिंतन करतात, नंतर त्या साड्या कुठल्या दुकानात कमीत कमी किंमतीत मिळतात ह्याचा शोध घेतात आणि नंतर ते कितीही लांब असलं तरी त्या ठिकाणी जाऊन साडी घेतात अशा प्रकारे आपल्या आयुष्यात चिंतन, शोध आणि अभ्यास आपोआप चालूच असतो.
     
    आधी चिंतन नंतर शोध नंतर अभ्यास म्हणजे पुरुषार्थ त्यानंतर यश मिळते यशानंतर तृप्ती येते तृप्तीतून शांती मिळते. स्मशान शांती नव्हे समाधानकारक शांती मिळते. आम्हांला यश मिळालं तरी तृप्ती आणि शांती मिळतेच असं नाही. कारण आमच चिंतन, शोध आणि अभ्यास ठरवून केलेला नसतो. नित्य कर्म असो, नैमित्तिक कर्म असो प्रत्येक कर्मात चिंतन, शोध, अभ्यास सुरुच असतो. वाईट माणसांचा मुद्दामहून प्रतिस्पर्धकांबद्दल चिंतन, शोध आणि अभ्यास करत असतात. चिंतन, शोध, अभ्यास ह्या तीन गोष्टी चांगल्या मार्गाने, पवित्र मार्गाने, परमेश्वराचं स्मरण करुन केल्या तर पुढील यश, तृप्ती आणि शांती ही मिळते.
     
    मातृवात्सल्यविन्दानम्‌ मध्ये घडणारी सगळी युद्ध ही शरीरातील नऊच्या नऊ चक्रात चालू असतात आणि प्रत्येक पातळीवर देवीचा, दैवी शक्तीचा म्हणजेच तुमचा विजय होतो आणि तुम्हाला अपयश देणार्‍या गोष्टींचा पराजय होतो. लढणं हा देवी तत्त्वाचा प्रमुख गुणधर्म आहे म्हणून लढाईसाठी लागणारी ताकद मातृवात्सल्यविन्दानम्‌ पासून मिळते. चिंतन, शोध आणि अभ्यास ह्या गोष्टी शिव बाणाने वापराव्या लागतात. शिव म्हणजे पवित्र मार्गाने. त्रिपुरारीला एका रेषेत येऊ न देण्याची जी शक्ती होती तिचा नाश शिवगंगागौरी व किरातरुद्रांनी केला.
     
    त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस प्रत्येक मनुष्याला चिंतन, शोध व अभ्यास ह्याच्यातून जास्तीत जास्त यश, तृप्ती, शांती मिळवून देतो. ह्या दिवशी जो कोणी चांगल बनण्यासाठी चांगला प्रयास, चांगल चिंतन करेल त्यांना मी यश देईन असा परमशिवाचा वर आहे. त्याने वरदान दिलं नाही तरी भक्तांना problem  येतो आणि दिलं तरी ही भक्तांनाच problem  येतो कारण तो वर इतर कसे वापरतात depend असतं. जे शुभमार्गीय आहेत त्यांचे संकल्प पूर्ण होण्याची शक्ती वाढते, जीवनातलं नैराश्य, अशांती झटकून टाकण्यासाठी ह्या दिवसासारखा दिवस नाही. ह्या दिवशी परमशिव, पार्वती, किरातरुद्र आणि शिवगंगागौरी हे चारही जणं प्रत्येक श्रध्दावानांसाठी चिंतन, शोध आणि अभ्यास त्याचबरोबर यश, तृप्ती आणि शांती ह्यांचा balance करण्यासाठी टपलेले असतात. 
     
    मला चांगलं बनायचं आहे असा संकल्प करा, मी जे काही चांगलं करत नाही ते चांगलं करण्यासाठी चांगले संकल्प करा. १०० संकल्प करा ९९ विसरलात तरी एक तरी लक्षात राहील. त्या त्रिपुरारीचं कुठलही नाव घेत घेत आपल्या जीवनाचं चिंतन करा. कमीत कमी त्याच्या नामाचं, त्याच्या गुणांच चिंतन करायला पाहिजे. maximum त्याचं चित्र, त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणता आली पाहिजे.
     
    ह्या दिवशी जो कोणी परमात्मात्रयीचं स्मरण करतो, परमात्म्याचं नाम, भजन, चिंतन सुरु करतो स्वत:साठी केलेलं चिंतन परमात्म्याच्या चिंतनाशी जोडतो त्याला यश मिळतं अशी योजना मोठ्या आईने केलेली आहे. हा दिवस वर्षातून एकदाच येतो.
     
    ह्यावर्षी ह्या दिवशी आपण किरातरुद्राचं पूजन करणार आहोत. ह्या पूजनासाठी किरातरुद्राची सुंदर मूर्ती तयार केली गेली आहे जी पूजनानंतर विसर्जन केली जाईल.
     
    ह्या पूजनासाठी पोस्टकार्ड सारखे तीन पेपर दिले जातील त्यावर ठिपक्यांनी किरातरुद्राची आयुधे काढलेली असतील - शृंगी, धनुष्यबाण आणि त्रिशूल.
     
    प्रथम मंगलाचरण होईल नंतर ही आयुधं हळद व पाणी ह्यांच्या सह्याय्याने कागदावर उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूच्या बोटाने (अनामिकाने) चित्र काढायचं ते ताम्हणात आधी शृंगी त्यावर धनुष्य आणि बाण आणि त्यावर त्रिशूलचा कागद ठेवायचा. मग दुसरे स्तोत्र म्हटलं जाईल त्यावेळी सफेद फुलं अर्पण करायची नंतर विशेष नामाचं पठण होईल तेव्हा त्यावर बिल्व पत्र अर्पण करायचं. सगळी स्तोत्रं माझ्या (परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या) आवाजात आहेत. त्यानंतर किरातरुद्राला प्रिय असणारा नैवेद्य अर्पण करायचा आहे. सुक्या खोबर्‍याची वाटी आणि एका पिशवीत यवाचं पीठ असेल. ते अर्पण करायचं.
     
    ते तीन कागद आणि अर्पण केलेला नैवेद्य आपल्याबरोबर घेऊन जायचा. घरी जाताना पूजनाचे १००% व्ह्यायब्रेशन्स्‌ आपण बरोबर घेऊन जाऊ शकत नाहीत म्हणून ह्या कागदांबरोबर १०८% व्ह्यायब्रेशन्स्‌ बरोबर घेऊन जाऊ शकतो. हे कागद कमीत एक रात्र आणि जास्तीत जास्त सात दिवस तुमच्या घरी ठेवू शकता त्यानंतर ते कागद पाण्यात विसर्जन करावेत किंवा तुळस, केळी किंवा औदुंबराच्या झाडाखालील मातीत पुरावेत म्हणजेच भूमातेला अर्पण करावेत. घरातील कोणी व्यक्तीने किंवा मित्रमंडळींमधील कोणी पूजन केलेले नसेल तर ज्या व्यक्तीने हे पूजन केले आहे त्या व्यक्तीने ते कागद त्यांच्या मस्तकाला लावावेत त्यामुळे त्यांनाही पूजनाचे व्हायब्रेशन्स्‌ मिळू शकतील.
     
    खोबरे जेवणात वापरावं व्हेज-नॉनव्हेज कशातही वापरा मला(परमपूज्य बापूंना) फरक पडत नाही. यवाच्या पिठात दूध व पिठी साखर मिक्स करुन ते प्रसाद म्हणून द्यावा.
     
    त्यानंतर मार्गशिर्ष महिन्यात गुरुक्षेत्रम्‌मध्ये किरातरुद्र आणि शिवगंगागौरी ह्यांची स्थापना करण्यात येणार आहे. त्यावेळी आपल्या गुरुक्षेत्रम्‌च्या उदीमध्ये जी गोविद्यापिठम्‌ मध्ये तयार होते त्या उदीत मी(परमपूज्य अनिरुद्ध बापू) करत असलेल्या यज्ञाचे भस्म मिक्स केले जाते. त्यातच आता परशूरामाला किरातरुद्राकडून मिळालेले भस्म मिसळण्यात येणार आहे. हे भस्म म्हणजे माझी (परमपूज्य बापूंची) रेणूका माता सती गेली त्यावेळी तिच्या चितेचे भस्म जे दत्तात्रेयांनी किरातरुद्राकडून परशूरामाला दिले होते ते आहे. त्याच बरोबर उदीच्या बाजूला एका पात्रात हळद ठेवली जाईल ही हळद म्हणजे रेणूका माती सती जाताना  तिच्या मळवटातील तीने जी हळद काढून दिली होती ती परशूरामाला शिवगंगागौरी कडून मिळाली होती ती हळद गुरुक्षेत्रम्‌मध्ये ठेवण्यात येईल आणि ती पूर्णपणे विनामूल्य असेल. ह्या मी(परमपूज्य बापू) माझ्या गोष्टी तुम्हाला देतोय ह्या विकून दिल्या जात नाहीत. मी(परमपूज्य बापू) माझ्या आईबापाला विकू शकत नाही.
     
    ही हळद घरातील कुठल्याही मंगलकार्याला, पूजनाला वापरु शकता, हळदी-कुंकवाच्या समारंभासाठी वापरु शकता, शत्रू घरी आला तरी शत्रुला लावू शकता (पुरुषांनाही हळद लावतात), लग्नकार्यातील हळदी समारंभात वापरु शकता, कोणी तुमच्यावर ब्लॅक मॅजिक केलेलं असेलं आणि तुम्ही ही हळद लावलेली असेल तर ते ब्लॅक मॅजिक ज्याने केलेयं त्याच्यावरच उलटेल. अशी ही हळद आणि हे भस्म ह्या जन्मात आम्हाला प्राप्त झालयं मग ह्याचा पूर्ण उपयोग करुन घ्या.
     
    त्रिपुरारी पौर्णिमा १० तारखेला असली तरी आपण ती १२ तारखेला साजरी करणार आहोत म्हणून आपल्यासाठी अनिरुद्ध पौर्णिमा १२ तारीखच चंद्राचं चंद्र बघून घेईल मी (परमपूज्य बापू) सांगितलेल्या तारखेला आपली अनिरुद्ध पौर्णिमा असेल. त्यामुळे आता पासूनच उत्सवाला तयारी करा.
     
    ॥ हरि ॐ॥
     

Tuesday, October 4, 2011

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२२.०९.२०११)


॥ हरि ॐ ॥
   

" सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणि नमोस्तुते
॥"

    ‘सर्व मंगल’ ह्याचा मराठीत अर्थ ‘सर्वच्या सर्व’ असा होतो. परंतु संस्कृतमध्ये ह्याचा अर्थ वेगळा आहे. सर्व मंगल म्हणजे qualitatively & quantitatively १०८% मंगलाला मंगल बनवणारे. १०८ ही सनातन हिंदू धर्मानुसार पूर्ण संख्या आहे. मानवी देहातही एकूण १०८ उर्जा केंद्रे असतात. म्हणून जपमाळही १०८ चीच बनलेली असते.


    एखादी गोष्ट मुळात मंगल असेल पण ती प्रत्येकासाठी मंगलच असेल नाही. उदा. देवाचा प्रसाद खाऊनही काही जणांना अपचनाचा त्रास होतो.मग देवाचा प्रसाद त्यासाठी मंगल नव्हता का? म्हणजेच कुठल्याही मंगल गोष्टीचा तुमच्यावर प्रभावही मंगलच व्हावा लागतो.
    समजा डायबेटिसच्या पेशंटने १२० मोदक खाल्ले तर त्याच्यासाठी मंगल होतील का? नक्कीच नाही. म्हणून ही ‘सर्व मंगल मांगल्ये’ असणारी आदिमाता कशी आहे? ही नुसते चांगले देत नाही तर त्या चांगल्याचा प्रभाव आमच्यासाठी चांगलाच देते. मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक घटना, कृतीमध्ये ही मंगलच परिणाम घडवून आणते.

             मी जर chemical engineer आहे व माझ्या ज्ञानाचा उपयोग मी बॉम्ब बनविण्यासाठी केला तर मी मंगल मनुष्य आहे का?
          तसेच मी जर डॉक्टर आहे व माझ्या ज्ञानाचा उपयोग मनुष्याला मारण्यासाठी केला तर डॉक्टर मंगल होणार का? नक्कीच नाही.
          परंतु, ती आदिमाता जे देते, त्याचा प्रभावही प्रत्येकासाठी मंगलच होत असतो. म्हणूनच ती आदिमाता, शिवा म्हणजेच सर्व मंगल. शिव म्हणजे परमपवित्र. आम्ही कितीही अपवित्र असू तरी ती आदिमाता एवढी पवित्र आहे की, ती आम्हाला नेहमी पवित्रच करते. अशी ही माझी (परमपूज्य बापू) आई, अनंत ब्रह्मांडाची आई. 
ती जेव्हा निर्गुण निराकार रुपात असते तेव्हा तिला आदिती म्हणतात. तीच स्पंदरुपाने असते, तेव्हा तिलाच गायत्री म्हणतात.

            गेल्या गुरुवारी सांगितले की मी तपश्चर्येला बसणार आहे.आज त्याविषयीच मी (परमपूज्य बापू) बोलणार आहे.  ह्या काळात मी जे काही हवन, जप, प्राणायाम करणार आहे, ते सगळ माझ्या बालोन्मत्त अवस्थेत करणार आहे.

मी बालोन्मत्त अवस्था स्विकारणार आहे, म्हणजे स्वत:चा ‘स्व’ माझ्या (परमपूज्य बापू) आईच्या स्वाधीन करणार आहे. ते म्हणजे सत्ययुगापासून ह्या उपासनेच्या क्षणापर्यंत माझ्या (परमपूज्य बापू) प्रत्येक जन्माचा, प्रत्येक क्षण, माझं (परमपूज्य बापू) प्रत्येक कार्य, कृती, विचार, आचार, प्रत्येक घटना ह्यांची मी आहुती देणार आहे.    तसेच, माझ्या प्रत्येक जन्मात, ह्या जन्मातही वय वर्षे ५५ पर्यंतच्या काळात ज्या ज्या व्यक्तींनी माझ्यावर प्रेम केले, त्या सर्वांचे प्रत्येक जन्म, प्रत्येक विचार, प्रत्येक कृती व घटना मी (परमपूज्य बापू) माझ्या प्रत्येक आहुती बरोबर अर्पण करणार आहे.    फक्त यासाठी, माझ्या आईची अट एकच ज्याप्रमाणात विश्वास त्याप्रमाणात फळ. हा संकल्प घेऊन मी हवन सुरु करणार आहे.

    ह्या हवनाच्या वेळी अतिशय सुंदर गोष्ट माझ्यासमोर असणार आहे ते म्हणजे ‘प्रत्यक्ष संपूर्ण स्कंदचिन्ह’. हेस्कंदचिन्ह गुरुक्षेत्रम्‌मध्ये हवनकुंडाच्या समोर असणार आहे. मी पूर्णवेळ तिथे असेनच असे नाही. कदाचित पूर्ण दिवसही एखाद दिवशी बसेन किंवा एक तासही बसेन.
    ह्या होमाची रचना वेदोक्त आहे, ह्यात माझं असं काही नाही. फक्त आई माझी आहे. आज ऋग्वेद, यजुर्वेद वेदांमधील ह्या यज्ञाशी संदार्भेत उल्लेख आपण बघणार आहोत.

    ॠग्वेदात ९व्या मंडलात ६४ व्या सूक्ताने ह्या यज्ञाचा आरंभ होणार आहे, त्यात सांगितले आहे की, ‘मी एक सामान्य मनुष्य आहे, ह्या आमच्या यज्ञात स्तुती ऐकणार्‍या देवता कोणत्या? कोणता देव आमच मंगल करणार आहे? कोणता देव संरक्षणासाठी धावून येणार आहे? हे आम्हांला माहित नाही.
    परंतु, बुद्धीपासून आणि मनापासून मला यज्ञ करायची इच्छा आहे . बुद्धीवान लोक दिव्यत्त्वाची इच्छा करतात. पण मी सामान्य मनुष्य आहे , मी माझी मनोकामना देवापुढे व्यक्त करण्याची इच्छा करतो. कारण, मी जाणतो की देवा तुझ्याशिवाय मला कोणी सुख देऊ शकणार नाही.

    ह्या स्तोत्राने यज्ञाला गुरुक्षेत्रम्‌मध्ये सुरुवात होणार आहे.ह्या सूक्ताच्याच पुढच्या ॠचेमध्ये सांगितले आहे की, वाईटातल्या वाईट मानवासाठीसुद्धा अग्नि, सूर्य, चंद्राच्या १६ कला, इंद्र, आदिमाता ह्यांचे पूजन तसेच यमाला control करणार्‍या श्रीगुरुंची उपासना, मानवा तुझ्यासाठी फलदायी आहे.
            गायत्रीचा जप आपण मागे तीन दिवस केला तेव्हा मी तुम्हांला भर्ग म्हणजे काय? ते सांगितले,भर्ग म्हणजे परमात्म्याचे पापदाहक तेज.ॠग्वेदातच पुढे उल्लेख आहे की, ‘ह्या परमात्म्याचे कल्याणकारक भर्गनामक तेज प्रसिद्ध आहे.’
   " भर्गनामक तेज व अग्नि हे एकच आहे, म्हणून हे वैश्वानर परमात्मा, आमची घृणा न करता आमची प्रार्थना ऐक."

    वेदांमध्ये कुठेही क्लिष्टता नाही, अतिशय स्पष्ट व सुंदरपणे वर्णन आहे.  ऋग्वेदातील ७ व्या मंडलात १२२ ऋचेमध्ये सांगितले आहे की, ‘हा वैश्वानर परमात्मा यज्ञात अग्निरुपाने प्रगटतो, तेव्हा मनुष्यासाठी सर्वात जवळचा असतो प्रकाश देणारा हा अग्नि शरीर, मन व वातावरण ह्यांतील दूषित गोष्टींचा नाश करुन मनुष्याला तेजस्वी बनवतो. म्हणून हा सदैव पूजनीय आहे.

    वेदांमध्ये विष्णुसच त्रिविक्रम म्हटले आहे.
    " हे त्या मूळ पुरुषाचा पुत्र असणार्‍या परमात्म्या, ह्या पार्थिव जगताचा तू स्वामी आहेस, म्हणून तू आम्हांला परमासिद्धी मिळवून देणारे ऐश्वर्य दे."  सिद्धि म्हणजे कुठलेही साधन वापरण्याची शक्ति.
    उदा.- बंगला हे सुख नाही तर सुखाचे साधन आहे. त्याच बंगल्याला जर आग लागली तर ते सुख होऊ शकत नाही.
    म्हणूनच, " हे परमात्म्या, अश्याप्रकारचे ऐश्वर्य आम्हांला दे की, जे घातक नाही. असे ऐश्वर्य आम्हांला नीटपणे वापरण्याची बुद्धी दे." असे ऐश्वर्य देणारी ती राधा, आल्हादिनी म्हणजेच आमच्या चांगल्या कार्याच्या आड जे काही येते त्यांचा नायनाट करण्याची शक्ति.
    हे परमात्म्या, असं ऐश्वर्य आम्हांला दे की, जे सुखकारक असेल, ज्याच्यामुळे आमच्यावर पाप चढणार नाही.
    ऋग्वेदातच १५ व्या सूक्तात माझा परमपूज्य बापू आवडता मंत्र आहे तो म्हणजे,
    ‘हे वैश्वानरा, परमात्म्या, माझा जो त्रिदेह आहे, त्याचे सामर्थ्य व ऊर्जा कमी न होऊ देणार्‍या तुला हव्य म्हणून वाहून नेण्यासाठी त्या आदिमातेने धारण केले आहे.म्हणून तू आमच्या सामर्थ्याचा र्‍हास होऊ देत नाहीस.’

    ‘एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरु ऐसा ’

    ह्याच सूक्तातात पुढे सांगितले आहे, की ‘हे परमात्म्या तू आम्हांला दिलेले धन, धान्य शक्ति कायम राहू दे व तुझ्याच इच्छेने त्यांचा वापर होईल. ह्याची काळजी घे, आम्हांला सुरक्षित ठेव.’
    ‘जे कोणी आपले प्रेम ह्या यज्ञाग्नीत अर्पण करतील त्या प्रत्येकाला तू संरक्षित ठेव’, ही आदिमातेला केलेली प्रार्थना आहे.
    " इथे प्रेमाने बसून जे स्तोत्र ऐकतील, त्यांना तू सुशक्ति कर. तू तुझ्या सर्व आयुधाने माझ्या संघाचे कल्याण कर."
    ह्याच्या पुढच्या ऋचेत सांगितले आहे की, ‘ह्या यज्ञामध्ये परमात्मा व त्याच्यावरचे किरातरुद्रीय स्वरुप त्यांचे सामर्थ्य देत राहोत.’
    इथे विश्वामित्र स्पष्ट शब्दात सांगतात की, " यज्ञाबद्दल माहित असूनही जो देव स्तुती करणार नाही, तो सृष्टीच्या रचनेचे पालन करणार्‍या देवांकडून कुठे जाईल, हे सांगता येत नाही. म्हणून हे परमात्म्या, आमचा बुद्धीभेद करणार्‍यांपासून आमचे संरक्षण कर."
    ‘जो यज्ञ करत नाही, पुण्य कर्मे करत नाही परमात्म्याची पूजा करत नाही, त्याला दुर्गति प्राप्त होऊ शकते.’
    भयगंडामुळे नेहमी चांगली माणसेसुद्धा जास्त मनाने खचतात. पूर्ण शुद्ध कोण आहे? मला सांगा एवढं पाप केलेल्या वाल्याकोळ्याचा वाल्मिकी होऊ शकतो, मग आम्ही का नाही सुधारणार? नक्कीच सुधारु शकतो. सुधारताना चूक झाली तरी आपण परत सुधारण्याचा प्रयत्न करु.

    फालतू गोष्टी मनात ठेवून स्वत:ला दोष देण्याची काहीच आवश्यकता नाही.समजा एक आडदांड मनुष्य हातात काठी घेऊन उभा आहे, आणि समोर एक अगदी लुकडा मनुष्य आहे पण त्याच्या हातात एके-४७ आहे,तर काय उपयोग त्या आडदांड मनुष्याच्या ताकदीचा ?

        हे कलियुग आहे. कुणी तुमच्या कानफटात मारली, तर दुसरा गाल पुढे करा हे सांगणारा मी नाही, ते माझं sicence नाही. उलट जर तुमच्यात ताकद असेल तर जरुर त्याच्या चार कानफटात मारा. उगाचच लाचार होऊ नका.

    जर कुणी तुमच्या बहिणीवर बलात्कार करायला आला तर हातात मिळेल त्या गोष्टीने तुम्ही त्याला प्रतिकार केलाच पाहिजे.

    अध्यात्म्यात आलो म्हणजे लोकांकडून फसून घ्यायचे असे बिल्कुल नाही. बावळटपणा मला (परमपूज्य बापू) आवडत नाही. मी एकच गोष्ट मानतो clean, clear and precise जगातील माणसं कशी आहेत, त्यानुसारच आपला व्यवहार हवा.
अध्यात्म म्हणजे चांगलं वागण्याचा प्रयास करायचा.आपण कुणाकडूनही फसवून घ्यायचं नाही. वाईट माणसांना फसवलं तर वाईट होत नाही.
    गुरुक्षेत्रम्‌मध्ये आपण यज्ञकुंड बनवणार आहोत. हा कुंडप्पाय यज्ञ आहे ह्याचे प्रत्येक मनुष्याने नुसतं दर्शन घेतलं तरी परमात्मा स्वत: त्यांच्यासाठी सूर्यकिरणांच्या सहाय्याने सहाय्यक पाठवतो पण ह्यात जे मन लावून भाग घेतात, त्यांच्यासाठीच.


    ह्या यज्ञाच्यावेळी सिद्ध कुंजीका स्तोत्र अर्चन म्हणून आपण घेणार आहोत. कुंजी म्हणजे किल्ली.
    केवळ ह्या कुंजिका स्तोत्राचा पाठ केल्याने सप्तशती पाठ केल्याचे पुण्य प्राप्त होतो. ह्या कुंजिका स्तोत्राचे श्रवण केल्याने जारण, मारण, अशा गोष्टींचे स्तंभन केले जाते. ह्यांचा प्रभाव होऊ शकत नाही.

    ह्यात विच्चेकार असणार्‍या चामुण्डेला आवाहन केले आहे. ह्यात सांगितले आहे की,
    ‘अखिल ब्रह्मांडाचे बीज रुप असणार्‍या आदिमाते, तुला नमस्कार असो. आमच्या जीवनात अभाव उत्पन्न करणार्‍या गोष्टींचा तू नाश कर. हे भैरवी, भद्रा भवानी तुला वारंवार नमस्कार असो. भैरवी भद्रा म्हणजे पाप-पुण्याचा विचार न करता केवळ प्रेमाने सहाय्य करणारी ती भैरवी.

    पर्ववती पार्वतीची जी अष्ट रुपे आहेत. त्यांच्या बीजांना ह्या कुंजिकास्तोत्रात आवाहन केले आहे.
    ‘हे भक्तमाते पार्वती, आमच्याकडे हे स्तोत्र म्हणण्याची ताकद नाही, म्हणून आमच्यावतीने तू गा.’
   
 अशा ह्या कुंजिकास्तोत्राने आपण हवन करणार आहोत. छांदोग्न्य उपनिषद व श्वेताश्वेत उपनिषद ह्यांच्या साहाय्याने हा यज्ञ संपन्न होईल.

             छांदोग्न्य उपनिषदातील पंचाग्नि विद्येच्या साहाय्याने यज्ञ होईल तर श्वेताश्वेत उपनिषदातील हंसविद्येच्या साहाय्याने तपश्चर्या संपन्न होईल.   

विश्वामित्रांनी रामाला दिक्षा देताना जो मंत्र दिला, तोच मंत्र ह्या तपश्चर्येतील आवाहन मंत्र असेल. ज्यात वर्णन आहे की,
   ‘स्वत:च्या तेजाने प्रकाशणार्‍या, भक्तांवर कृपा करणार्‍या, सत्कर्म असो की नसो तरीदेखील ज्याचे हृदय हळहळते, प्रत्येक मनुष्यामधील अंतराग्नी अधिकाअधिक प्रज्वलित करणार्‍या किरातरुद्रा, तुला आश्वासन देतो की, विश्वामित्राचे ब्रह्मगान भारतातील श्रद्धावानाचे रक्षण करेल.’
    ऋग्वेदातील तिसर्‍या ऋचेतील २९ व्या स्तोत्रात सांगितले आहे.
    ‘ज्याप्रमाणे आदिमाता प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील प्राणाग्नी प्रज्वलित ठेवते, त्याप्रमाणे श्रद्धावानांचे अग्नि विश्वामित्राचे ब्रह्मगान प्रज्वलित करतो.’

    मी (परमपूज्य बापू) डॉक्टर योगिन्द्र जोशींना विनंती करतो की, त्यांनी ह्या माहितीचे एक booklet तयार करावे. ह्या सहा महिन्याच्या काळात सहोपासना ज्यांना जमेल त्यांनी जास्तीतजास्त करावी व तुमची उपासना विश्वकल्याणासाठी अर्पण करा. जर मनापासून दुसर्‍याचं कल्याण व्हावं म्हणून प्रार्थना केलीत तर त्याच्या दसपट तुम्हांला फायदा मिळेल.

    मला (परमपूज्य बापू) विवेकानंदाची दोन वाक्य खूप आवडतात -
१)    स्वत:ची घृणा कधीच करु नका. परमात्मा तुझाच आहे व तो कधीच तुला टाकत नाही.

२)   भय हाच अभाव आहे. असर्मथता आहे. कमजोरी ही जगातल्या सर्व दु:खांचे, अपराधांचे मूळ कारण आहे.म्हणून जे काही तुम्हांला कमजोर बनविते ते विष म्हणून बाजूला ठेवा जर पूर्णपणे ते टाकू शकला नाहीत तर प्रमाण तरी कमी करा. भीती कधीच असता कामा नये. 

    आपण प्रसन्नोत्सवात अष्टादशभुजा महिषासुरमर्दिनी बघितली भीती वाटली का तिची? आई एकच आहे जी महाकाली, महालक्ष्मी तीच अनसूया.

    तुम्ही भक्तीमार्गावर असाल तर माझं (परमपूज्य बापू) आश्वासन आहे की, ही महाकाली उग्ररुपाने तुमची bodygaurd म्हणून असेल.

    ज्याप्रमाणे प्रेमाने प्रसन्नोत्सव केला त्याच प्रेमाने मी(परमपूज्य बापू) तपश्चर्या  करणार आहे. किती दिवस तपश्चर्या चालणार हे तुमच्यावर अवलंबून आहे. ह्या सहा महिन्याच्या काळात रस्त्यात कधी दिसलो आणि ‘हरि ॐ’ नाही म्हटलं तर रागवू नका. मी (परमपूज्य बापू) आतापर्यंत कधीच कुणाचा द्वेष केला नाही. मला पापाची घृणा वाटते, पापियाची नाही.
    ह्या अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते शुभकंरा नवरात्रीच्या नवव्या दिवसापर्यंत मी तपश्चर्या करणार आहे. ह्या काळात तुम्हांला सांगितलेल्या उपासना मनापासून प्रेमाने करा.

All The Best To You For Everything.

॥ हरि ॐ ॥

Saturday, September 17, 2011

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१५.०९.२०११)


!! हरि ॐ!!

    ॐ मंत्राय नम: मध्ये श्रीगुरुक्षेत्रम्‌ मंत्र आपण बघत आहोत. ह्यात सर्वबाधाप्रशमनं म्हणजे काय ते बघितले. आता सर्व पापप्रशमनं व सर्वकोपप्रशमनं ही पुढची दोन पदे आहेत.
    पाप शद्ब आपण लहानपणापासून ऐकतो, ह्याची व्याख्या प्रत्येक ग्रंथात, पुस्तकात वेगवेगळी दिलेली आहे. आम्हांला पाप म्हणजे काय? हे कळत नाही, असं म्हणणारा मनुष्य नक्कीच खोटं बोलतो असे समजावे. कारण, मागे मी (परमपूज्य बापू) सांगितले होते की, ज्याला अन्न व मल ह्यातला फरक कळतो, त्याला पाप व पुण्यातला फरक नक्कीच कळतो. सर्वसामान्य मनुष्य पाप करण्याचा प्रयास कधी करत नाही, त्याची इच्छा असते नेहमी चांगलं करण्याची.
    मराठीत एक म्हण आहे, ‘वडाच्या पूजनाला निघाली आणी येड्याबरोबर पळाली’ म्हणजे काय? तर पतिव्रता बनायला गेली आणि व्यभिचारी झाली. असंच सामान्य माणसाचे होत असते. चांगल बनण्याचा प्रयास करताना नेमकं नको ते घडते.
    नको तेव्हा नको ते केलं असं घडल्यावर मनुष्य कितीही ज्ञानी असला तरी त्याच्या मनात गोंधळ तयार होतो. पूर्वी मुंबईच्या रस्त्यावर रात्री ९ नंतर फिरणारे कुणी नसायचे, आणि आता मुंबई रात्रीचीच जास्त जागी असते. आता तर पुण्यातसुद्धा हिच प्रथा सुरु झाली आहे. हे सगळे बदल कसे घडले?
    इथे बर्‍याच जणांना माहित असेल, ४ ऑक्टोबर १९९९ ला जुईनगरला जेव्हा भूमीपूजन केलं तेव्हा आजूबाजूला शेतं होती स्टेशनवरुन थेट आपली बिल्डिंग दिसायची. २००० च्या मे पासून हळूहळू चित्र बदलले, आता आजूबाजूला सगळ्याच बिल्डिंग झाल्या आहेत. हे झालेले बदल आपण सगळ्यांनी पचवले आपल्या जीवनातले देखील असेच अनेक बदल आपण पचवत असतो.
    हल्ली फास्ट फूडच्या नावाखाली चायनीज खाणार्‍यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, आमच्या मेडिकल बूक्समध्ये  चायनीज फुड सिड्रोम हा विषय आहे. चायनीज बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पदार्थांमध्ये मेंदूला irritate करणारी द्रव्ये असतात. तरी आम्ही ते आवडीने खातो. घरात पोळी भाजी करताना बायकोचे हात दुखतात. आज आम्हाला घरी जेवण बनवायला लाज वाटते.
    बर्‍याचशा पालकांची तक्रार असते की मुलं ऐकत नाहीत. पण ह्यात खरं तर आईबाबांची चूक असते. मुलांना हल्ली आई-वडिल कायम protection मध्ये वाढवतात. जे जे मागेल ते ते आणून देतात त्यामुळे मोठेपणी ह्या मुलांना कुठलीही जबाबदारी टाकली की ते संकट वाटते.
    लग्न ठरवताना मुलीची आई सांगते, ‘मुलीला जेवण बनवता येत नाही’ ह्यात त्या आईचीच चूक आहे. कारण तिने कधी मुलीला शिकवलेलेच नसते. स्त्री पुरुष कितीही समानता असली तरी स्त्रीने तिचे आईपण जपलेच पाहिजे.
    हल्लीच्या मुलांना घर साफ करणे, घरातल्या बिघडलेल्या गोष्टींची रिपेअरी करणे ही कामे माहितच नसतात. एखादा दिवस बायको आजारी असेल तर जेवण बनवायची नवर्‍यांना लाज वाटते.
    आई वडिल मुलांना लहानपणापासून मागेल ते देतात, त्यामुळे त्यांना ‘नाही’ ऐकायची सवय नसते म्हणून ही मुलं मोठेपणी agressive होतात. घरात मुलांसमोर जर नवरा-बायको भांडत असतील तर मुलांवर काय संस्कार होणार? भांडण असावं नवरा-बायकोमध्ये पण ते मुलांसमोर कधीच करु नका.
    घरात निर्णय घेताना आई-वडिलांनी एकमेकांशी विचार-विनिमय जरुर करावा. मुलांना आईच्या नजरेचा धाक असायलाच हवा तसेच ‘बाबांना सांगू का?’ असं म्हटल्यावर जी मुलं सळसळा कापतात, ती मुलं कधीच बिघडत नाहीत.
    स्त्रीने सासू-सासर्‍यांशी कितीही पटत नसेल तरी ते मुलांसमोर कधीही बोलू नका हल्ली स्त्रिया नवर्‍याला सगळ्यांसमोर काहीही बोलतात. हे ही पूर्णपणे चूक आहे.
    family prays together, stays together  जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते, ते नेहमी एकत्र राहते.दिवसातून एकदा तरी थोडावेळ का होईना सर्व कुटुंबाने एकत्र प्रार्थना करायला हवी. हल्ली privacy च्या नावाखाली सगळं हातच राखून असते.
    आजच्या काळात लग्नात बघा, जेवणाच्या वेळात सगळी मंडळी येतात. अक्षता टाकल्या की सगळे जेवणाकडे धुम ठोकतात. तसेच तिरडीवर ठेवताना पण हल्ली पाच माणसं पण येत नाहीत. एवढी आमची माणुसकी आज मेली आहे.
    स्त्रियांच्या झिम्मा-फुगडीच्या खेळात एक गाणं आहे, ‘गरे बाई गरे, फणसाचे गरे, खाईल त्याची म्हातारी मरे, मेली तर मेली कटकट गेली, उद्या मरायची ती आजच मरे’ बघा, खेळातल्या गाण्यात म्हातारीच्या मरणाची इच्छा असं का?
    कुटुंबात वयस्कर व्यक्ती असणं खूप आवश्यक असतं. भारताला एकत्र कुटुंबपद्धती मुळेच बळ प्राप्त झाले आहे. पूर्वी संस्थानांचे एकत्र विलिनीकरण केल्याने भारत तयार झाला. म्हणून ह्याला आधी भारतवर्ष (हिंदुस्थान) म्हटले जायचे. ह्याच मातीत तुम्ही जन्मल्यामुळे तेच भारतमातेचे genes तुमच्यात आहेत.
    म्हणून कितीही पापे तुमच्याकडून घडली तरी तुम्हांला मार्ग मिळू शकतो. तुम्ही टिकून राहू शकता बाकीच्यांचे मला माहित नाही. त्यामुळे बाकीच्यांची मी (परमपूज्य बापू) गॅरंटी देऊ शकत नाही.
    जो माझ्यावर (परमपूज्य बापू) प्रेम करतो, त्याची मी काळजी घेतो. भारताची जी ही २५०० वर्षाची genes आहेत ती तुम्हां प्रत्येकात आहेत व ही genes (गुणसुत्रे) तुमच्यात कशी वाढवायची हे arrange करणारा मी कॅटरर आहे. मी डॉक्टरकी करतो, रोगांवर उपचार करतो, म्हणजे मी डॉक्टर आहे, मी नवीन गोष्टी घडवतो, construction  घडवतो म्हणजे मी इंजिनीअरही आहे. कॅटररही आहे, तुम्ही केलेला कचरा मी साफ करतो म्हणजे मी भंगीही आहे. तुमची पापं धुण्याचं मी काम करतो म्हणजे मी धोबीपण आहे. मी बलविद्या शिकवतो म्हणजे मी शिक्षकही आहे. किर्तनरंगात मी नाटके, नृत्ये ह्यांचे दिग्दर्शन केले होते, म्हणजे मी डायरेक्टर पण आहे.
    ह्यासोबत मी सगळीकडे फिरत असतो. तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या घरात मी फिरतो, म्हणजे मी भटक्यापण आहे. म्हणजे मी (परमपूज्य बापू) किती धंदे करतो बघा!
    ह्यासोबत मी उत्तम शिकारसुद्धा करतो. मला शिकार करायची असेल तर मी फक्त मि.किरातरुद्रांना सांगतो, ते शिकारी आहेत. त्यांच्याकडून मीही शिकलो. माझा नेम अगदी अचूक आहे. आपल्याकडे म्हण आहे, १२ गावचं पाणी प्यायला आहे. पण मी (परमपूज्य बापू) १२ लाखं गावचं पाणी प्यायलो आहे.
    तुमच्या भौतिक, मनोमय देहाची मी काळजी घेतो. जर तुम्ही माझ्यावर खरोखर प्रेम करता, तर एकच कृपा करा, ते म्हणजे, ‘चिंता करायची सोडून द्या.’ तुम्ही एवढ्या कायम चिंता करता की, बापरे बाप!    ‘तुम्ही काळजी करायचं सोडून द्या, त्याऐवजी काळजी घ्या.’
    तुमच्या सततच्या चिंता करण्यामुळे ज्याची तुम्ही चिंता करता त्याची मूर्ती तुमच्या मनात कोरली जाते. त्यामुळे ‘भक्ति-भावापासून’ दूर जाता. म्हणून एवढचं कायम लक्षात ठेवा. ‘माझा बापू आहे....आहेच’.
    आजपासून एक वाक्य कायम मनात ठेवा, ‘‘आमचा बापू हळूहळू आमच्यासाठी सगळं काही नीट करत आहे.” हे नुसतं वाक्य नाही, हा बापूचा मंत्र आहे हे लक्षात ठेवा. ह्यातले हळूहळू म्हणजे जाच्यासाठी जो speed  आवश्यक आहे, तो speed.
    हे वाक्य आजपासून मनापासून चिंतन करा. तुमच्या सगळ्या चिंता आपोआप दूर होतील तुम्ही हे वाक्य विसरलात तर माझ्या (परमपूज्य बापू) डोक्याला चिंता वाढतात. 
    मला द्यायचं असेल तर तुमचं पाप द्या, त्याबदल्यात तुम्हांला कधीच दुप्पट पाप मिळणार नाही.

"एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरु ऐसा"

    माझं काम सोपं व्हावं म्हणून मी तुम्हांला सांगतोय. हे वाक्य (बापूमंत्र) प्रत्येकजण आपापल्या भाषेत म्हणू शकतात. पण माझ्यावर (परमपूज्य बापू) प्रेम करणार्‍या प्रत्येकाच्या मनात हे वाक्य (बापूमंत्र) रुजलं पाहिजे. हे वाक्य म्हणजे बीज आहे, ह्याचा मनात वृक्ष व्हायला पाहिजे.
    हे वाक्य म्हणजेच बापूंचा खरा मंत्र आहे. चण्डिकाकुलाची व्याख्या तुम्हांला प्रत्यक्षमधून सांगितली. गुरुक्षेत्रम्‌चा लाभ जास्तीत जास्त घ्या. तिथे दर्शन घ्या, अर्पण करा. गुरुक्षेत्रम्‌ ही अशी जागा आहे की कुठल्याही श्रद्धावानाने केलेली प्रार्थना ही त्या षटकोनात येते व त्या त्या भक्ताच्या प्रारब्धानुसार चण्डिकाकुल कार्यरत होते म्हणून गुरुक्षेत्रम्‌शी नातं जास्तीत जास्त जवळ घट्ट करा. हा बापूंचा मंत्र जास्तीत जास्त जवळ केला तर, तुमच्या चिंतेलाच चिंता करावी लागेल.

!! हरि ॐ !!
 प्रवचनानंतर परमपूज्य बापूंनी एक सूचना केली -
    आपण इथे ‘रामोराजमणि’ म्हणतो, त्यात बर्‍याच जणांकडून ‘भझे’ म्हटले जाते. ते ‘भझे’ नाही तर ‘भजे’ आहे. चुकून चूक झाली तर काही पाप लागत नाही पण ह्यापुढे म्हणताना लक्षात ठेवायचे ‘रामं रमेशं भजे’.
!! हरि ॐ!!

Wednesday, September 14, 2011

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०८.०९.२०११)


                                         !! हरि ॐ!!

    ‘ॐ मंत्राय नम:’ गुरुक्षेत्रम् मंत्राविषयी बघत आपण पुढे चाललो आहोत. १३ पदांचा हा मंत्र आहे. १३ हा अतिशय शुभ अंक आहे. माझा (परमपूज्य बापू) आणि नंदाचा विवाह १३ मे ह्याचदिवशी झाला. पौरसचा जन्म ही १३ एप्रिलचाच. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्रही १३ आकडी. १३ अंक हा कधीच अशुभ होऊ शकत नाही. श्रद्धावंतांसाठी अतिशय लकी आकडा आहे.

    गुरुक्षेत्रम्‌मंत्राच्या १३ पदांपैकी पहिले पद आपण बघितले, ‘सर्वबाधाप्रशमनं’ प्रत्यक्षच्या अग्रलेखांमधून चण्डिका कुल समजून घेतले, त्यांची स्कंदातील स्थाने बघितली.
    गुरुक्षेत्रम्‌ मंत्रातील पहिले पद ‘सर्वबाधाप्रशमनं’ व त्यापुढे ‘सर्वपापप्रशमनं’ व ‘सर्वकोपप्रशमनं’ ही पदे येतात. हे आधीच लक्षात ठेवून मी (परमपूज्य बापू) काही महिन्यांपूर्वीच कामाला लागलो व माझ्या १०८ मेकअपमनना पण कामाला लावले. माझे मेकअपमन कुठल्या रुपात तुमच्या समोर येतील तुम्हांला कळणारही नाही, त्यांनी मग सगळीकडे जाऊन बघितले कोण गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणतो, कोण दुसर्‍यांनी केलेल्या लड्या स्वत:च्या नावावर जमा करतो. हे सगळं बघितल्यावर माझ्या लक्षांत आलं की, माझ्यावर प्रेम करणा‍र्‍या श्रद्धावंताच्या उपासना नीट होत नाहीत. कायिक, वाचिक, मानसिक अनेक चुका त्यांच्याकडून घडत आहेत. मग मी (परमपूज्य बापू) विचार केला की, माझं ह्या गुरुमंत्रासोबत असणारे अभयवचन खरं ठरावं, ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्रिपुरारि पौर्णिमेला किरातरुद्र येणार आहे, मग त्यासाठी माझ्या बाळांची तयारी कितपत आहे, हे आवश्यक आहे.

    ह्यासाठी मी (परमपूज्य बापू) अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, प्रत्येकाने ‘श्रीराम’ म्हणा.
    ह्या अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते शुभंकरा नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच रामनवमीपर्यंत मी स्वत: माझ्या माय चण्डिकेची घोर तपश्चर्या करणार आहे.कारण, माझ्यावर प्रेम करणार्‍या श्रद्धावंताच्या चुका, पापे जास्तीत जास्त dilute  करुन, त्यांना क्षमा मिळावी, अशी माझी इच्छा आहे. यासाठी माझ्या आईची उपासना करुन गुरुक्षेत्रम्‌ मंत्राचे सामर्थ्य प्रत्येकाला प्राप्त होईल, अशी यंत्रणा निर्माण करणार आहे.

    ह्या सहा महिन्याच्या काळात मी गुरुवारी प्रवचन करेनच असे नाही, मला वाटले तर मी बोलेन, नाहीतर नाही बोलणार. कदाचित दर गुरुवारी येणारही नाही. पण मी गुरुक्षेत्रम्‌ मध्ये नक्की रोज खाली येईन. एकदा येईन की १० वेळा येईन मला (परमपूज्य बापू)  माहीत नाही.
    मी (परमपूज्य बापू) basically ह्या सहा महिन्याच्या काळात संपूर्ण procen मध्ये मुक्तावस्था स्विकारणार आहे. कारण मी माझ्या बाळांची परिस्थिती बघतोय. कुठे बॉम्बस्फोट होतोय, भूकंपही होतोय. प्रत्येकाच्या जीवनातही अनेक संकटे येतच आहेत, सगळीच गणितं बिघडत चालली आहेत.
    परव दिवशी घरात बोलत होतो, तेव्हा कळले की, मोदक ४०० रुपये किलो झाले आहेत.१९७० साली ८ ते १० रुपये साधे मोदक असायचे, आज तेच ४०० रुपये किलो झाले आहेत. आज आमची परिस्थिती काय होत चालली आहे? सकाळी घराबाहेर पडलो की परत घरी सुखरुप येईपर्यंत चिंता लागून असते. मुलगा-मुलगी कितीही चांगले असले तरी बाहेर जाऊन ते बिघडणार नाही ना? ही चिंता सतत पालकांना असते.

    ह्या सगळ्या गोष्टींना माझ्या परिवारात तरी आळा बसला पाहिजे. मी संत नाही, मी partial आहे. जे माझ्यावर प्रेम करतात, त्या प्रत्येकासाठी मी partial आहे. मला पापांची घृणा आहे पण पापियाची नाही. जोपर्यंत पापी सुधारायला बघतो, तोपर्यंत मी त्याच्यावर प्रेम करतो.
    आजच्या स्थितीत आपल्याला चांगल्या प्रकारे भक्ति व सेवा करता आली पाहिजे. 
    मला (परमपूज्य बापू) प्रत्येक बाळाला, तो कितीही दलदलीत रुतला असेल व त्याचं माझ्यावर प्रेम असेल तर मला तिथे येऊन हात देता आला पहिजे. यासाठीच मला माझ्या आई चण्डिकेची तपश्चर्या करायची आहे.

    ही तपश्चर्या प्रामुख्याने तीन प्रकारे होणार आहे -

१) आदिमाता चण्डिकेच्या ब्रह्मत्रिपुरसुंदरी स्वरुपाची उपासना

२) माझ्या (परमपूज्य बापू) गुरुंनी दिलेली बलातिबला उपासना
३) सावित्री उपनिषदानुसार सावित्री स्वरुपाची उपासना


    ही उपासना अश्विन शुद्ध नवरात्रीच्या अर्थात अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते चैत्र नवरात्रीच्या अर्थात शुंभकरा नवरात्रीच्या नवव्या दिवसापर्यंत म्हणजेच रामनवमीपर्यंत चालणार आहे. ह्या काळात मी स्वत:ला कुठलेही बंधन ठेवणार नाही पूर्णपणे उन्मुक्त अवस्थेत मी स्वत:ला ठेवेन.
    कारण मला माझ्या बाळांच्या घडणार्‍या चुका दिसतात, अशावेळी मी शांत बसू शकत नाही. मी माझ्या मार्गाने पुढे चालणारच आहे. तुम्ही म्हणाल, ‘अशावेळी बापू आम्ही काय करायचे?’ तर, जेवढे जमेल तेवढी उपासना करा. कमीतकमी दिवसातून १ वेळा विश्वाच्या कल्याणासाठी हनुमानचलिसा अर्पण करा. तेव्हा म्हणायच, ‘बापू, विश्वकल्याणासाठी ही हनुमानचलिसा समर्पित.’
    स्वत:ला घ्या काळात पापी समजून दोष देऊ नका, स्वत:ला कमी लेखू नका. कारण माझा बापू माझ्यासाठी बसला आहे. जो मला कधीच टाकणार नाही, ह्या गोष्टीवर ठाम विश्वास ठेवा.

    ह्या सहा महिन्याच्या काळात मी २४ x ७ तपश्चर्येत असणार आहे. मी आणि माज़ी आई बस एवढच नातं ह्या काळात असणार आहे. बाकी सगळे संभाळायला तिचे ज्येष्ठ पुत्र दत्तात्रेय व हनुमंत सिद्ध झालेले आहेत. सोबत तुमची नंदाई आणि सुचितमामाही सर्व समर्थपणे सांभाळायला आहेतच.
    ह्या तपश्चर्येतून दोन गोष्टी साधल्या जाणार आहेत त्या म्हणजे - 

१) सर्वांग ब्रह्मस्त्र व 
२)सर्वांग करुणाश्रय


    जे जे चुकीचे वाईट आहे, माझ्यावर प्रेम करणार्‍यांना त्रास देणारे आहे, त्यांच्यासाठी ब्रह्मस्त्र असेल तर जे माझ्यावर (परमपूज्य बापू) प्रेम करतात, भारतावर प्रेम करतात त्यांच्यासाठी सर्वांग करुणाश्रय असेल. ह्या दोन गोष्टी मी स्थिर करुन रामनवमीच्या दिवशी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये स्थापन करणार आहे.
    तिसर्‍या महायुद्धाचे पडघम वाजू लागले आहेत, असं मी मागे म्हटलं होते त्या डाकिणीचा संचार सुरु झाला आहे. आता मला उभं राहायलाच पाहिजे अतिशय शांतपणे.
     ‘सर्वपापप्रशमनं श्रीगुरुक्षेत्रम्‌’ सर्व पापांचा उद्धार ह्यातून होऊ शकतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी होऊ शकतो, मग आम्ही का नाही बदलू शकत? नक्कीच बदलू शकतो.

   खूप मोठी विकासाची संधी ह्या सहा महिन्याच्या काळात अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हांला मिळणार आहे, कारण इथे सोबत माझीही उपासना असेल. मानवी मर्यादा असल्याने तुम्हांला कायम उपासना करायला जमणार नाही, मला मान्य आहे पण माझ्यावर प्रेम करणार्‍या बाळांची ताकद नक्कीच मोठी आहे.
    ह्या काळात मी प्रवचनात बोलणार नाही, पण काही गोष्टी अशा आयोजित करणार आहे, की ज्यामुळे तुमची क्षमता व सामर्थ्य अधिकाअधिक वाढेल. तुम्हांला याचक बनावे लागू नये, यासाठी माझे प्रयास आहेत, हे उपकार नाहीत. आई-वडिल आपल्या बाळांसाठी करतात ते कधी उपकार नसतात.

    माझी theory साधी सोपी आहे, माझं घर पहिले, माझं घर म्हणजे हॅप्पी होम मधले सातव्या मजल्यावरचे घर नव्हे तर माझं घर म्हणजे माझ्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण.
      एखादी उपासना करताना जर उच्चार नीट जमत नसतील, तर ती जबाबदारी माझी, तुमची नाही. बापू समर्थ आहे, तुमचं ओझं बाळगायला.
    जोमदारपणे आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. रामनवमीनंतर परत आधीप्रमाणेच प्रवचन regular सुरु होईल. किंवा त्यात काही changes  असतील तर ते तेव्हा ठरतील.
    निर्धास्त रहा, confident  व्हा आणि सुखाने जगा, एवढीच माझी इच्छा आहे. आज आपण गुरुक्षेत्रम्‌ मंत्र ५ वेळा म्हणणार आहोत.

                                                           !! हरि ॐ!!

Monday, August 29, 2011

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२५.०८.२०११)

!! हरि ॐ!!


     माझ्या (परमपूज्य बापू) सर्व मित्रांना घरच्या गणपतीचे आग्रहाचे आमंत्रण. आपल्या घरच्या गणपतीची आगमनाची मिरवणूक अमरसन्स, बांद्रा येथून ३१, ऑगस्ट ला सांयकाळी ५.०० वाजता निघेल. दुसर्‍या दिवशी १ सप्टेंबर सकाळी पूजन झाल्यावर सर्वांना दर्शन घेता येईल. रात्री महाआरती असेल. ३ सप्टेंबर ला पुर्नमिलाप मिरवणूक दुपारी ४.०० वाजता हॅपीहोम मधून निघेल.

     गेल्या वर्षापासून आपण संकल्प सुपारी सुरु केली आहे. हा संकल्प किंवा नवस फक्त गणेशोत्सवाच्या वेळीच करता येईल. नवस पूर्ण झाला, तर तो घरच्या गणेशोत्सवाच्या वेळीच फेडता येईल.

     संकल्प सुपारीला कुठलीही किंमत नाही, जर तुम्हांला कधीही कुणी म्हणत असेल की, "बापुंना भेटायचे असेल, तर ५००/-, १०००/- रुपये द्या, मी भेट घडवतो.” तर अशा व्यक्तीला लगेच तुम्ही चप्पला काढून मारु शकता आपल्याकडे अशा कुठल्याही गोष्टी घडत नाहीत.

     बापूंसोबत असलेले फोटो दाखवून जर कुणी व्यक्ती, आपण बापूंच्या खूप जवळचे आहोत असे भासवत असेल, तर असे काहीही नसते, हे लक्षात ठेवा. कुणी ५ कोटी रुपये दिले तरी माझी भेट घडेलच असे नाही, कारण हे पूर्णपणे माझ्या मनावर असते. कुणी ५ पैसे जरी दिले तरी त्याला पाच पट मी देऊ शकतो. त्यामुळे जास्त पैसे असले तर बापूंची भेट घडेल, असा प्रकार आपल्याकडे नसतो.

     गणेशोत्सवात संकल्प सुपारी वाहायची किंवा नवस फेडायची व्यवस्था तिथेच केलेली असेल. गेल्या वर्षापर्यंत गणपतीच्या समोर एकेक जण दर्शनासाठी यायचे. त्यामुळे दर्शन घेताना खूप घाई व्हायची. म्हणून ह्या वर्षापासून वेगळी दर्शन व्यवस्था केली आहे, ज्यात ५-५ जण एकाचवेळी दर्शन घेऊ शकतील. त्यामुळे एकाच वेळेस ५-६ जणांना जास्त वेळ मनोसोक्त दर्शन घेता येईल.

     दुसरी एक सूचना म्हणजे बलवर्गाची ५ वी व ६वी बॅच आता सुरु होणार आहे. तेव्हा १८ ते ४० वयोगटातील पुरुषांनी हे फ्रेश फॉर्म भरायचे आहेत. हे फॉर्मस गेट नंबर ३ वर आजपासून (तीन गुरुवार) मिळतील. त्यातून निवड करुन सिलेक्शन केले जाईल.


     आपण वमन बाधा बघत होतो. किती बाधा झाल्या आतापर्यंत? इथे बसलेल्या मंडळींपैकी कितीजण मी (परमपूज्य बापू) लिहीलेले "प्रत्यक्ष" मधले अग्रलेख वाचतात? खूपच कमी हात वर आहेत.

     ह्या अग्रलेखांमधून गुरुक्षेत्रम्‌ म्हणजे काय? स्कंदचिन्ह म्हणजे काय? ते कळेल. ह्या स्कंदचिन्हातील मधला भाग म्हणजे गुरुक्षेत्रम्‌, हा मधला भाग म्हणजेच नामाकाश. प्रत्येक श्रद्धावानाने केलेली प्रार्थना पोचल्यावर ह्या नामाकाशाच्या बाजूने असणारे चण्डिका कुलातील सहाजण मग त्यांच्या कार्याला लागतात.

     मनापासून तुम्ही जेव्हा गुरुक्षेत्रम्‌मध्ये येऊन प्रार्थना करता मग ती प्रार्थना दत्तगुरुंची असो, चण्डिकेची असो, की परमात्म्याची असो ती पोहचते ह्या नामाकाशातच. मग त्या प्रार्थनेला प्रतिसाद कोण देणार, हे चण्डिका कुल ठरवते. श्रद्धावानांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देण्याची जबाबदारी चण्डिकाकुल स्वत:वर घेते.

     समजा  R म्हणजे रामनाम मानले व S म्हणजे शिवनाम मानले तर रामभक्तासाठी त्याची प्रार्थना रामनामामुळे आधी R पद्धतीने कार्य करते मग S पद्धतीने कार्य करते. तसेच शिवभक्तासाठी शिवनाम आधी S पद्धतीने कार्य करते मग R पद्धतीने म्हणजे R व S एकच पण कार्य जशी प्रार्थना असेल त्यानुसार ठरते.

     ह्याचे भौतिक उदाहरण द्यायचे झाले तर पेशंटला ताप असेल तर तो स्वत: वेगवेगळी औषधे घेऊनही त्याचा ताप जात नाही. पण तेच तो डॉक्टरकडे गेल्यावर, डॉक्टर त्या पेशंटचा ताप कश्यामुळे आला आहे हे लक्षणांवरुन ओळखून समजा मलेरियाचा ताप असेल तर त्यानुसार औषध देतो, त्यामुळे पूर्णपणे ताप जातो.

     जेव्हा तुम्ही एखादं नामस्मरण करता, समजा रामनाम किंवा कोणी शिवनाम घेत असेल, तर जरी राम व शिव ह्या दोन्ही बीजांचे कार्य विरुद्ध असेल तरी जर तुम्ही रामनाम घेत असाल व शिव म्हणून हाक मारली तर शिव रामाला सोबत घेऊन मदतीला धावून येतो.

     गुरुक्षेत्रम्‌ हेच सगळ्यात पवित्र तीर्थक्षेत्र का? कारण, इथे आमच्या मागील जन्माची पापे बघितली जात नाहीत. इथे श्रद्धावानाला सजा नाही, फक्त क्षमा आहे, म्हणूनच गुरुक्षेत्रम्‌ हे सर्वात जेष्ठ व श्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे. तुम्ही म्हणाल जेष्ठ कसे काय? हे आता ३ वर्षापूर्वीच तर झाले. इथे ३ वर्ष हा स्थल रुपातील काळ आहे. मुळात गुरुक्षेत्रम्‌ म्हणजे साक्षात स्कंदचिन्ह, हे नामाकाशरुपाने सूक्ष्म रुपात यापूर्वीही अस्तित्त्वात होतेच, तेच आता स्थूल रुपात आणले आहे.

     पूर्वी जवळून बापूंचे दर्शन घेता यायचे पण आता ४-५ लाईन लावूनही  घाईतच दर्शन घ्यावे लागते. असच गुरुक्षेत्रम्‌च्या बाबतीतही होणार आहे, त्यामुळे आत्ताच जागे व्हा.

     कारण, आज जी आपण १० वी वमनबाधा बघणार आहोत ती म्हणजे आळस. आपण जेव्हा आळस देतो म्हणजे शिथिलत्व जाते कारण muslce contract होतात. आळस देणे म्हणजे शिथिलत्व टाकणे. म्हणून आळस देणे नसणे, त्यागणे नसणे, हीच वमन बाधा आहे. आळस झटकून टाकण्याची तुमच्याकडे capacity नसणे ही वमन बाधा आहे.

     आळस कधी आपण झटकतो? समजा तुम्ही आळस येऊन पडलात आणि तेव्हाच तुम्हांला शेजारी साप दिसला तर तुम्ही तसेच राहणार का? नाही. पळत सुटणार ना. कारण मनात भीती निर्माण झाली.

     तसेच समजा आपली प्रिय व्यक्ती I Love You म्हणायला आली, तर तुम्ही आळस देऊन पडून राहणार का? नाही, त्या व्यक्तीसोबत आनंदाने चालत जाणार बरोबर.

     म्हणजेच आळस झटकण्यासाठी आनंद, भीती व संयम किंवा शिस्त ह्यांची आवश्यकता असते. ज्यांच्या आयुष्यात आळसाचे वमन करण्याची क्रिया शिस्तीमुळे असते, त्यांच्या आयुष्यात कधीही भीतीमुळे आळस  झटकण्याची वेळ येत नाही.

     आमच्या आयुष्यात भीती किंवा आनंदामुळे नाही तर शिस्तीमुळे आम्ही आळस टाकू, त्यामुळे आपोआपच उत्साह व आनंद येणारच.

     आळस न टाकणे ही वमन बाधा मनुष्याच्या जीवनात सर्वांत महत्त्वाचा रोल बजावते. मग बघू, थोड्या वेळाने बघू ह्यात पूर्ण आयुष्य निघून जाते. हा आळस कसा टाकायचा? तर,

     सकाळी उठल्यावर डोळे उघडता उघडता समोर तुमच्या लाडक्या देवाच्या फोटोचे दर्शन घ्यायचे, त्याचे नामस्मरण करताना त्यासोबत एकच वाक्य म्हणायचे I Love You. ही गोष्ट सकाळीच का करायची?

     कारण, प्रत्येक मानवाच्या शरीरात Hinstamine नावाचे द्रव्य असते. रात्रीच्या वेळी मानवाच्या शरीरातील Hinstamine चे प्रमाण कमी होते व serotanin ची लेव्हल वाढते, म्हणून झोप लागते. जेव्हा ह्या दोन द्रव्यांच्या प्रमाणात गडबड होते तेव्हा झोप लागत नाही. सूर्य उगवल्यावर Hinstamine चे प्रमाण वाढते व serotanin चे प्रमाण कमी होते.

     म्हणून Hinstamine ला awakening Harmone तुम्हांला जागं करणारा अंगीरस म्हणतात. तुम्ही रात्री झोपताना तुमच्या मनात कसे विचार असतात, त्यावर ह्या दोन द्रव्यांचे नाते ठरत असते. रात्री झोपतानाचा क्षण व सकाळी उठण्याचा क्षण ह्या दोन क्षणांवर आपली Health अवलंबून असते.

     सकाळी उठल्यावर जर चांगले पवित्र विचार असतील तर त्या दिवसाचा balance नीट राहतो.

     त्याचप्रमाणे, जर रात्रीच्या वेळी देखील पवित्र विचार मनात असतील तर रात्रीचाही balance नीट होतो.

     काही जण आपण बघतो, बसल्या जागी झोप काढतात, काहीजण चालताना पण झोपतात म्हणजे चालत असतात पण मनात मात्र त्यांच्या वेगळेच नानाविध विचार चालू असतात. विचार एक सुरु होतो व वेगळ्याच ठिकाणी येऊन संपतो. सचिन तेंडूलकर ९० वर आऊट झाला की, इंडियाच्या टिमचे असेच असते पासून मनात विचार सुरु होतो, तो वेगवेगळ्या गोष्टी आठवत राहत, touch screen mobile पर्यंत येऊन थांबतो. म्हणजेच आपलं मन हे बेवड्यासारखं विचार करत राहते, ज्यात कश्याचाही  कश्याशी ही संबंध नसतो. ह्यामुळे मनाची शक्ती क्षीण होत जाते.

     जर Hinstamine व serotanin चे प्रमाण  imbalance झाले तर मन कायम अशांत राहते. नेहमी चांगल्या जास्त करुन वाईट गोष्टी आठवत राहतात. ह्या सगळ्याच्या वर आपण उठायला हवे. म्हणजे काय? झोपताना एखादे नाम, अभंग, स्तोत्र म्हणायचे. निद्रास्थितीत जर ह्या नामासोबत शिरलात तर नाम निद्रेमध्ये पण कार्य करते.

     रात्री झोपतांना सगळ्या गोष्टी आटोपल्यावर शांतपणे परमात्म्याचे नामस्मरण करीत झोपायला लागा.  तुमच्या शरीरातील Hinstamine चे प्रमाण नॉर्मलला येते. झोपही गाढ लागते. सकाळी उठल्यावर देवाचे नाव घेतले तर दिवसभरही फ्रेश राहायला होते. म्हणूनच आळसाचे वमन करण्यासाठी भुगृ ऋषींनी दोन गोष्टी सांगितल्या आहेत त्या म्हणजे -

१) सकाळी उठल्याबरोबर इष्ट देवतेचे स्मरण करायचे व  I Love You  म्हणायचे.

२) रात्री झॊपताना देखील परमेश्वराचे स्मरण करत स्तोत्र म्हणायचे.


     आपल्या मेंदूतील reward, punishment अश्या एकूण ८१ केंद्रांशी निगडीत Hinstamine ची केंद्रे संबंधित असतात. ह्या सगळ्या केंद्रांना balance ठेवण्यासाठी भगवंताने योजना केली आहे त्याला hypothalamus म्हणतात.

     तुमची इच्छा असो वा नसो हा भाग पूर्णपणे त्या प्रजापती, महाविष्णु ह्यांच्या ताब्यात असतो. हा भाग असा असतो की, हा कुठल्याही मेंदूच्या केंद्राला विरुद्ध टोकाला जाऊन कार्य करायला भाग पाडतो. म्हणजे जर भीतीचे केंद्र असेल तर त्या केंद्राला शौर्याचे कार्य करायला भाग पाडतो. पण हे कधी? तर जेवढ्या प्रमाणात  तुमची श्रद्धा तेवढ्या प्रमाणातच.

     hypothalamus हा प्राणमय, मनोमय, भौतिक देह ह्या तिघांना जोडण्याचे काम स्थूल, सूक्ष्म व तरल पातळीवर करतो. सहस्त्रार चक्रात स्थिर परमात्म्याचे चरण म्हणजे hypothalamus. ह्रदय म्हणजे heart नव्हे तर अंत:करण. हे hypothalamus मध्ये असते. ह्याचा स्वामी परमात्मा असेल तर कधीच कुठे problem येत नाही.

     आपल्याला प्रत्येकाला वाटते मी सुखी व्हावं. समजा घरामागे विहिर आहे, पण ती भरेल कधी भरपूर पाऊस पडेल तेव्हाच, भरपूर त्या विहिरीला झरे असतील तरच ती विहीर भरलेली राहील.

     आम्ही काय करतो? तात्पुरती गरज पडेल तेव्हाच भक्ती करतो, त्यामुळे विहीरीत पाणी शिल्लक नसते. शुद्ध स्वधर्म हा मनाचा, प्राणाचा असायला हवा, हा  नित्य व नैमित्तिक हवा. ह्यामुळे तुमचा hypothalamus अशी विहीर बनते की, ज्यात पावसाचे पाणी पण जमते व झरे पण लागतात.

     आता बघूया ही बाधा कश्यामुळे होते? आळस कश्यामुळे येतो? हा येतो फक्त एकाच गोष्टीमुळे. आळस हा शरीराला किंवा बुद्धीला येत  नाही तर मनाला येतो. मनाला खरीखुरी विश्रांती मिळत नाही म्हणून मनाला आळस येतो. मन सतत कल्पनांमध्ये रमते, वास्तवात जगत नाही, सतत मनात कल्पना असतात. कल्पना करण्याऐवजी चांगले होऊ दे, म्हणून प्रार्थना करा, planning करा.

     ही बाधा कुठून येते? तर कल्पनांमधून. सामान्य मनुष्याला कळत नाही, तो नानाविध मनोराज्य करत राहतो. कल्पना केली की त्याच्या विरुध्द घडते. कल्पना म्हणजे माणसाला छळणारी माया.

     "कल्पना हेचि मूळ माया"

     आजची वमन  बाधा ही १० वी होती. आता एकच बाधा उरली. ह्यावरुन गुरुमंत्राचे महत्त्व त्याचं मनावरचं, जीवनातलं भूतकाळावरचं कार्य लक्षात घ्या.

     गुरुक्षेत्रम्‌ मंत्र गेल्या २ जन्मांचे पाप कमी करतो, पण त्याआधीच्या जन्मातीलही पापे कमी करतो. त्यामुळे गुरुक्षेत्रम्‌ मध्ये येणारे श्रद्धावान ह्यापुढे पुण्य घेऊनच जन्माला येणार, पाप घेऊन यावं लागणार नाही.

     गेल्या जन्मीचे पाप घेऊन जन्माला येणे, हीच ११ वी बाधा. ह्यासाठी भूतकाळातचं जाऊन ही बाधा दूर व्हावी म्हणून औषध प्यायला हवं. आणि हे औषध म्हणजे गुरुक्षेत्रम्‌ मंत्र.

     प्रत्येक दिवस हा नवीन जन्मच आहे. कारण प्रत्येक रात्र हे मृत्युचेच स्वरुप आहे.
     पण जिवंत असताना मृत्युच्या प्रेमात पडू नका. श्रद्धावान असाल आणि जर तुम्ही आत्महत्या केलीत तर तिथे उभा असलेला जो कुणी आहे तो फोडून काढेल तुम्हांला तुमचे जन्म-मृत्यु हे कोणाच्या बापाच्या हातात नसते, हे फक्त त्याच्या हातात असते. त्याने सही केली की कुणीही थांबू शकत नाही.

     प्रत्येक दिवस हा श्रद्धावानांसाठी पुनर्जन्म आहे. आज मी उठलो म्हणजे मागच्या दोन दिवसांचे पाप घेऊनच उठलो. इतकी सोपी गोष्ट आहे.
"सर्वबाधाप्रशमनं श्रीगुरुक्षेत्रम्‌"


     आज पासून दर गुरुवारी प्रवचन संपल्यावर एक वेळा आपण इथे गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणणार आहोत.

!! हरि ॐ !!

Tuesday, August 2, 2011

सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२८/०७/२०११)


सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२८/०७/२०११)
हरि ॐ
‘ॐ मंत्राय नम:’ ह्या नामामध्ये ‘ॐ ऐं‍‌‍ ‌र्‍हीं क्लीं चामुण्डायै सर्व बाधाप्रशमनं श्रीगुरुक्षेत्रम्‌’ ह्यातील वम बाधा आपण बघत आहोत. आतापर्यंत चार वमन बाधा बघितल्या आज पाचवी बाधा बघायची आहे. आजची जी बाधा आहे ती actually  मला झालेली बाधा आहे. प्रत्येकाला वाटत असतं की, ह्या बापूला काहीही कळत नाही. बापूचा guidance हवा असतो, मदत हवी असते, पण एक खात्री असते की, ह्याला काहीही कळत नाही. ही प्रत्येकाच्या मनातली भावना हीच मला (परमपूज्य बापू) झालेली बाधा. बापूला काही कळत नाही, हा जो प्रत्येक मनातला भाव आहे, तसेच बापू शेवटी कुठे कुठे लक्ष घालणार, इथे एवढी माणसं आहेत, त्यात प्रत्येकाच्या मनात काय चाललंय, हे बापूला कसं समजणारं. हा मनातला भाव माणसाच्या मनातच राहतो, त्याचे वमन तो करत नाही. त्यामुळे ही बाधा मला (परमपूज्य बापू) होते, कारण त्या माणसासाठी  मला जे करायचे आहे, त्याच्या आड ही बाधा येते.
 
मी कुठलाही चमत्कार करत नाही आणि कधीच करणारही नाही, मला उडता येत नाही, मला काही तीन डोळे किंवा चार हात नाहीत. पण माझ्या कामात ह्या बाधेमुळे अडचण निर्माण होते. ज्याप्रमाणात बापूला काही कळत नाही हा भाव मोठा त्याप्रमाणात मला (परमपूज्य बापू) झालेली बाधा मोठी.
ज्याप्रमाणात बापूला सगळं कळतं हा भाव त्या प्रमाणात माझ्यासाठी (परमपूज्य बापू) प्रश्न सोपा. माणसाच्या मनात प्रथम काय विचार येतो? की, जर काही चुकून बोललो आणि आपल्याला हाकलून काढलं तर, असा विचार हीच बाधा आहे. ज्या गोष्टीमुळे तुम्हांला वाटतं की, तुमचं नुकसान होईल actually त्याच गोष्टीमुळे तुमचं नुकसान व्हायचं टळतं. पण, त्यासाठी तुम्हांला त्याचं वमन करायला पाहिजे, ते उलटी करुन बाहेर काढायला पाहिजे.
 ही वमन बाधा म्हणजे एक चिकित्साच (treatment) आहे. इथे बाधा माझी (परमपूज्य बापू) व औषध तुम्हांला घ्यायला हवे. उलटी होण्यासाठी omitic drug  उलटी होण्यासाठी औषध द्यावे लागते, ते माझ्याकडे तयार असते. तुम्ही म्हणाल, बापू आम्हांला आधीच भरपूर ताप आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी मजेत रहा, आम्ही आमच्या घरी मजेत राहतो, हो ना? (सगळे नाही म्हणतात) ‘नाही’ हे उत्तर चांगले आहे. पूर्वी घरातील मोठी मंडळी पोट साफ होण्यासाठी एरंडेल किंआ वमन द्रव्ये दयायची, अनेकांनी इथे घेतली असतील. मी (परमपूज्य बापू) कधीही असे वमनासाठी औषध घेतली नाही, कारण माझ्यात वमन करण्यासारखं काहीही नाही. ह्याला माझा अहंकार म्हणा की, आणि काही म्हणा. मी परमेश्वर नाही, तरी माझेच म्हणणे मी खरं करतो. 
 माझं मन हे चित्तरुपाने कायम (मी कुठेही असलो तरी) माझ्या (परमपूज्य बापू) आई चण्डिकेच्या गर्भातच असते. त्यामुळे तिचे नियम आपोआप मलाही लागू होतात. तुम्हांला प्रत्येकाला काही मिळविण्यासाठी प्रयास करावे लागतात पण मला असे प्रयास करावे लागत नाहीत. मी (परमपूज्य बापू) किती आळशी आहे ते माझ्या आई चण्डिकेला माहित आहे. त्यामुळे तिने कायम मला तिच्या गर्भातच ठेवले आहे. म्हणून आपोआप तिचे जे जे नियम आहेत, ते नियम मलाही लागू होतात.
 
 जोपर्यंत तुमच्याकडून वमन घडत नाही. तोपर्यंत वारंवार मी तुमच्यासमोर औषध घेऊन येत असतो. उलटी होण्यासाठी काय करावे लागते? समजा चूकून पाल खाल्ली गेली तर आपण काय करतो? मिठाचे पाणी पितो, त्यामुळे उलटी होते हेच मीठ जर अन्नात कमी असले तरी मळमळते, म्हणजे उलटी होत आहे, असे वाटते.
 
 मीठ हे basically समुद्रात बनणारे आहे. पृथ्वीचा ७०% भाग समुद्र आहे. आपण बघतो पाऊस पडतो ते पाणी गोड असते, नदयांचे पाणी मोठं गोडं असते. हे सगळॆ गोडं पाणी शेवटी समुद्रात जाते. असे किती वर्षे चालू आहे? २००० वर्षे, तर शालिवाहन शकेनुसार ४००० वर्षे. इतकी वर्षे एवढं गोडं पाणी समुद्रात जाऊनही शेवटी समुद्र खारा तो खाराच. पूर्वी मुंबईत ठिकठिकाणी मिठागरे दिसायची. आता क्वचित दिसतात. मग आज आम्हांला मीठ कुठून मिळते? आज आम्ही जे मीठ खातो ते सामुद्री मीठ  नसते. आज आपण chemical sythetic मीठ रोज वापरतो.
 
मीठ हे अन्नाचा तसेच औषधाचाही अपरिहार्य भाग आहे. हेच मीठ पोटातली अन्नाची घाण बाहेर काढण्यासाठी देखील. म्हणजेच वमनासाठी उपयोगी आहे. ह्याच मीठाशी आपला ‘इमान’ जोडलेला असतो. म्हणून आपण म्हणतो ‘तो माझ्या मिठाला जागला नाही’ किंवा ‘तो नमकहराम’ निघाला.
जेव्हा मनुष्याच्या मनात सद्‌गुरुंना काही कळत नाही, असा भाव येतो, तेव्हा तो सद्‌गुरुंच्या फोटोसमोर ५०% फक्त खरं बोलतो. तुम्हांला काय वाटतं, त्या फोटोला काही ऐकू येत नाही, फोटोला काहीही दिसतं नाही. आता म्हणाल असे असेल तर बापू फोटो घरात न ठेवलेला बरा.
 
समजा तुम्ही घरातले सगळे फोटो जरी बुडविले तरीदेखील तुमचा सद्‌गुरु जर खरा असेल तर त्याने तुमच्या मेंदूत एक केंद्र बनवलेलं असतं. जर तुमचा गुरु ढोंगी असेल तर तो तुमच्या मेंदूत केंद्र बनवू शकत नाही. ढोंगी गुरु हे कलिचे दूत असतात हे आपण मातृवात्स्यल्यविन्दानम्‌ मध्ये वाचतो. जर तुम्ही चांगल्या गुरुकडे गेलात, तर तो सद्‌गुरु त्याच्या फोटोतूनही तुमच्याकडे पाहतो. तुमच्या मनात तुमच्या गुरुप्रती थोडा जरी भाव असेल तरी तो तुमच्या मनात त्याचं केंद्र तयार करतो.
 
तुम्ही म्हणाल मग बापू, सद्‌गुरु मानतच नाही त्यांच काय? तर जे त्याला सद्‌गुरु मानतात त्यांच्या मनात तो आपलं केंद्र निर्माण करतो, तर जे मानत नाहीत त्यांच्या बुद्धीत तो केंद्र निर्माण करतो. मानवात बुद्धीपेक्षा मन मोठे असते. शरीरातून जेव्हा लिंग देह बाहेर तेव्हा त्यासोबत प्राण व मन असते, बुद्धी नाही. बुद्धी ही कर्मस्वातंत्र्यासाठी मानवाला दिली आहे.
 
जेव्हा गुरुची काय गरज? गुरु काय करणार आहे? असे जेव्हा मनुष्य बोलतो, तेव्हा तो फक्त बुद्धीचा वापर करतो. बुद्धीने प्रेम करता येत नाही. 
कुठलीही गुढ भाषा मला कळत नाही, मला (परमपूज्य बापू) फक्त प्रेमाची भाषा कळते. द्वेषाची भाषा मला येतच नाही. 
 
मनाने प्रेम केल्याशिवाय बुद्धीने भक्ती करता येत नाही सबुरी ठेवता येत नाही. हे मनामधलं प्रेम टिकून राहिलं पाहिजे, म्हणून फक्त श्रद्धावानांच्या मनात सद्‌गुरु त्यांचे केंद्र निर्माण करतो. मग त्या श्रद्धावानांच्या मनात तो तीन पावलं टाकत चालतो व कायम चालत राहतो, असे करता करता तो मनाचा भाग चित्तात रुपांतर करतो. मग बुद्धीचा रोलच कुठे उरत नाही. बुद्धीत तो कधीही तीन पावले टाकत नाही.
 
बुद्धी म्हणजे (reflex) प्रतिक्षिप्त क्रियेचा वर जाऊन विचार करण्याची शक्ती.
बघा, एखाद्या वेळेस गरम पाणी किंवा तेल हातावर पडले तर आपण लगेच हात मागे घेतो. पण समजा निरांजनात दिप लावलेला असताना ते खाली पडत असेल आणि एका आईचा हात खाली असेल, त्या हाताखाली तिचे बाळ असेल, तर निरांजनातले गरम तेल हातावर पडले तरी त्या आईचा हात बाजूला जाणार नाही, ती ते गरम तेल स्वत:च्या हातात धरेल, बाळाला इजा होऊ नये म्हणून. 
 
म्हणजेच कुठलीही क्रिया घडताना नेहमी आधी प्रेमाची जाणीव बुद्धीला होते व त्यानुसार क्रिया घडते.
 
तुम्ही सद्‌गुरुला माना अथवा मानू नका, फक्त त्याला सगळं कळतं हा भाव तुमच्या मनामध्ये जेव्हा कायम असतो तेव्हा तो तुम्हांला उलटी करायला भाग पाडतो. तुमचा सद्‌गुरुप्रती भाव बुद्धीपुरता मर्यादित असेल तर तो उलटी करायला भाग पाडत नाही.
 
बघा, चूक एखादी करता करता पटकन मनात सद्‌गुरुचे वाक्य आठवतं, चूक घडल्यावर त्याचा फोटो दिसतो, मग नकळत (हात जोडून) sorry म्हटले जाते. ही चुकीची कबुली देणे, त्याला सगळं कळतं हा विश्वास ठेवून sorry म्हणणे म्हणजे उलटी करणं.
 
रात्री भयग्रस्त स्वप्न पडतात. का? तर सद्‌गुरुंची कृपा तुमच्या जीवनात येते म्हणून. जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटायला हवी. तेव्हा तुमच्या व्यावहारिक जीवनात घडणारी वाईट गोष्ट स्वप्नात देऊन सद्‌गुरु वमन घडवून आणतो. श्रद्धावानांच्या मनात उभा राहून तो वमन क्रिया घडवून आणतो.
 
तुम्ही म्हणाल, बापू मग आम्हांला त्याचा त्रास होतो का? तर - १)जे त्याला सद्‌गुरु मानत नाहीत, त्यांना काहीही त्रास होत नाही व २)जे त्याला सद्‌गुरु मानतात पण मनात मात्र त्यास काही कळत नाही अशी भावना असते, त्यांना तो वारंवार उलट्या करायला लावतो. जेवढे विष (वाईट भाग) तुम्ही पेलू शकता, तेवढेच विष तो तुमच्या देहात ठेवतो, बाकीचे ओकायला भाग पाडतो. म्हणून त्याला कळत नाही असे काहीच नाही हा विश्वास आपला असला पाहिजे. उरलेले देहातले विष ओकून काढणे हा मनुष्याचा स्वत:चा पुरुषार्थ असतो.
 
फार वर्षापूर्वी मी म्हणजे डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणून अनुभवलेली एक गोष्ट सांगतो. कॉलेज चालू असतानाच्या काळात एकदा मी (परमपूज्य बापू) 
मित्रमंडळीं बरोबर जंगलात फिरायला गेलो होतो. तिथे एका गावात संध्याकाळी एका घरी थांबलो. आम्ही जिथे होतो तिथे येऊन त्या घरातल्या पुरुषाने आम्हांला सांगितले, "आमचे वारकरी बुवा इथे येणार आहेत, त्यांच्यासाठी ही जागा सारवून ठेवली आहे. आम्ही मग उठून दुसरीकडे बसलो. ह्या घरातील मनुष्य अतिशय साधा, भोळा भाविक होता. थोड्या वेळाने वारकरी बुवा आले. ते ही असेच साधे-भोळे होते, ह्या बुवांना हा मनुष्य गुरु मानायचा, पण बुवा त्यावर म्हणायचे, "मी काही सद्‌गुरु नाही, आपला सद्‌गुरु एकच ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज” इथे गुरुने स्पष्टपणे सांगितले की, आपला खरा सद्‌गुरु कोण? त्या बुवांनी कुठलाही मोठेपणा स्वत:कडे घेतला नाही. म्हणूनच, त्या मनुष्याने ह्या बुवांना प्रेमाने केलेला नमस्कार पोहचतो कोणाला? तर त्या ज्ञानेश्वर महाराजांनाच!! वारकरी बुवा निघताना हा मनुष्य त्यांना सोडायला जातो, कुंपणापर्यंत आल्यावर त्यांना आठवते, आपली हिरवी पिशवी सोबत नाही, तेव्हा शोधत असताना तो मनुष्य म्हणतो, इथे नाही चिमणाबाईच्या घरी भजनाला गेला होता तिथे राहिली असेल. घरात येऊन बुवा बघतात तर घरात एक चिमणीचे घरटे होते, तिथेच खुंटीवर त्यांना त्यांची हिरवी पिशवी सापडते. ह्यात कागद असतो, ज्यावर लिहिलेले असते मुक्काम पोस्ट अमुक, क्षेत्र -आळंदी. आळंदी म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांचे स्थान. इथे गुरु साधा व भक्तही साधा. त्यामुळे त्यांचा भाव पोहचतो तो खर्‍या सद्‌गुरु तत्त्वाला म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांना.
 
अशीच एक स्वामी समर्थांची गोष्ट. ज्यांनी इथे स्वामी समर्थांची बखर वाचली असेल त्यांना माहिती असेल की ते किती solid जहाल होते.
 
एकदा ह्यांच्या शेजारी राहणारा एक मनुष्य स्वामींची किर्ती ऐकून स्वामींकडे जायला निघाला. ह्या मनुष्याच्या मनात प्रचंड भीती असायची. म्हणून मनात एकच भावना घेऊन श्रद्धेने हा मनुष्य स्वामींकडे आला. मनातली भीती थोडी जरी कमी झाली तरी बरे होईल, हा एकच विचार त्यामागे होता.
 
स्वामींना त्याने पाहिले, तेव्हा ते होते दिगंबर अवस्थेत, उकीरड्यावर खायला बसले होते, मध्येच आपल्या ताटातले कुत्र्याला खाऊ घालत. असे त्यांचे रुप बघून ह्या मनुष्यास वाटले हे काय आपली भीती घालवणार? तेवढ्यात एक कुत्रा आला, तेव्हा स्वामी म्हणाले, "चोळ्या पळ, माझा स्वभाव आधीच भित्रा.”
हे दृश्य पाहून तो मनुष्य परत गंगाधरपंतांकडे आला व त्याने सांगितले, ‘तुमचे गुरु असे कसे?’ गंगाधरपंतांनी सर्व ऐकून घेतल्यावर म्हणाले, ‘इथे स्वामींकडे फक्त निखळ सत्य आहे. जे तुझ्या मनात तेच सद्‌गुरु म्हणतो की माझ्या मनात आहे.’
साईसच्चरितात अमीर शक्करच्या कथेत बाबा काय म्हणतात? ‘जे भक्तांच्या उशाशी तेच माझ्या उशाशी’ तुझ जे जीवन भितीने भरलेलं होते ते स्वामीनीं ओढून घेतले स्वत:कडे असे गंगाधरपंत त्या मनुष्यास सांगतात.
 
ह्या मनुष्याला ही गोष्ट पटत नाही. तो टांगा करुन परत अक्कलकोटला जायला निघतो, मध्येच दत्ताच्या मूळ स्थानी गाणगापूरला जाण्याचा विचार मनात येतो पण टांगावाला तयार होत नाही, म्हणून त्या टांगेवाल्याच्या कृपेने ह्या मनुष्यास परत अक्कलकोटास यावे लागते. तिथे रात्री एका घरात मुक्कामाला थांबतो, तेव्हा घरातला मुख्य पुरुष त्यास सांगतो आमची मावळ (आत्या) वारली आहे, त्यामुळे आम्ही सगळे तिथे जातोय, तुम्ही इथे निवांतपणे आराम करा. त्याची सर्व योग्य व्यवस्था करुन त्या घरातील सर्व मंडळी निघून जातात. घरात कुणी नाही, रात्रीची वेळ हा मनुष्य एकटा तरीही हा शांतपणे विडी फुंकतो. पाणी पितो, तेवढ्यात आवाज येतो, म्हणून बघायला जातो तर मांजराच्या धक्क्याने मडकी पडलेली असतात, काळे मांजर तिथून जाताना दिसते, तेवढ्यात जवळच त्याला साप दिसतो, तो काठीने त्या सापावर प्रहार करुन मारतो. तेव्हा त्याच्या मनात अचानक विचार येतात, हे मी काय केले? मी रात्री एकटा राहिलो, काळी मांजर आली, साप दिसला त्याला मारले! असे कसे झाले? माझी भीती गेली कुठे?
 
तेव्हा त्याला गंगाधरपंतांचे वाक्य आठवते. तो धावत येऊन गंगाधरपंतांचे पाय धरतो. गंगाधरपंतांकडे स्वामींविषयी मनात आलेल्या चुकीच्या घाणेरड्या गोष्टींविषयी कबुली त्याने दिली. म्हणजेच त्याने वमन केले कोणाकडे? तर गुरुकडे आणणार्‍या व्यक्तीकडे. तेव्हा त्याला शब्द ऐकू येतात, ‘हात्‌ रांडेच्या’ मागे वळून बघतो तर स्वामी उभे असतात त्या मनुष्याच्या मनात प्रेमभाव दाटून येतो. तो स्वामींचे पाय धरतो स्वामी म्हणतात, ‘हटाव इसको’ असे बोलून त्याला लाथ मारतात. तरी हा पाय सोडत नाही. स्वामी लाथ मारतात तरी परत परत हा त्यांचे पाय घट्ट पकडायला बघतो, असेच हे रस्त्याने चालत जातात. स्वामी पुढे हा मनुष्य पाय धरतो, आणि स्वामी लाथ मारतात. ह्या दोघांच्या मागे गंगाधरपंत धावत असतात, स्वामींना विनंती करतात,"त्या मनुष्यास क्षमा करा” स्वामी तरीही थांबत नाही. एव्हाना एवढा आवाज ऐकून गावातली कुत्री मागे लागतात. स्वामींचे सेवेकरी मागे त्यांच्या धावू लागतात. तरी ते थांबत नाहीत. त्याच गावात एक कानफाट्या म्हणून माणूस राहत असतो, हा कुणी ओरडायला लागले की त्याच्या डोक्यात काठी घालायचा हा सगळा आवाज ऐकून तो कानफाट्या ह्यांच्या मागे धावत येतो, सर्वांत पाठी गंगाधरपंत ‘स्वामी’ म्हणत ओरडत जात असतात, त्यांच्या डोक्यात हा कानफाट्या काठी मारणार, एवढ्यात तो मनुष्य स्वामींचे पाय सोडून गंगाधरपंतांवर आडवा होतो त्या काठीचा घाव झेलण्यासाठी तेवढ्यात काठीही थांबते, स्वामीही थांबतात. त्या मनुष्यास म्हणतात, "माझे पाय पाहिजे ना हवे तेवढे घे” हे ऐकल्यावर तो मनुष्य स्वामींच्या पायांचे मनोसोक्त चुंबन घेतो व पुढे त्यांचा निस्सिम भक्त बनतो.
 
म्हणूनच आम्हांला माझ्या सद्‍गुरुंना काही कळत नाही, ह्या बाधेचे वमन करायला शिकले पाहिजे. सद्‌गुरुतत्त्वाविषयीची ही भावना (त्याला काही कळत नाही) ही तुमच्या आयुष्यातील सर्वांत मोठी बाधा असते, म्हणून ह्याचे वमन होणे आवश्यक असते.
 
यासाठीच, इथे त्रिविक्रमासमोर सदैव मोकळे रहा, तुम्ही जसे आहात तसे. नाहीतर गैरसमज होतो त्या माणसासारखा. त्या व्यक्तिचे उद्‌गार "हा तर माझ्यासारखाच वेडा, भित्रा” म्हणजे नदीपाशी जायचे आणि तिला मृगजळ समजून परत वाळवंटापशी यायचे हीच सर्वांत मोठी बाधा आहे. ही बाधा दूर करायची असेल तर, ‘त्याला सगळं माहितच असतं’ ही एकच दृढ धारणा असायला हवी.
 
आज तुम्हांला एक गोष्ट मनापासून सांगतो. मला (परमपूज्य बापू) दुष्ट म्हणा. राक्षस म्हणा मला चालेल पण सद्‌गुरु ह्या शब्दाविषयी मनात प्रचंड श्रद्धा, प्रेम ठेवा. अगदी वाटेमधल्या दगडाला जरी मनापासून तुम्ही श्रद्धेने गुरु मानले तरी तो दगडसुद्धा तुमच्या मूळ सद्‌गुरुतत्त्वाची window बनलेला असेल.
एकदा का खात्री झाली गुरुची की परत उलटे फिरु नका. ह्या मनुष्याची एवढे सगळे स्वामींविषयी अनुभव ऐकूनही बुद्धी भ्रष्ट झाली. तशी होऊ देऊ नका.
एकच प्रार्थना करा "मी कधीही नदीला मृगजळ समजणार नाही, की तुमचे सगळॆ प्रश्न सुटले! हे मी तुम्हाला सांगू शकतो, कारण मी हे जन्मोजन्मी अनुभवले आहे. तो एकमेव अमर्यादित आहे. ते तत्त्व निर्गुण, निराकार पूर्ण चैत्यन्यमय आहे. त्याच्याएवढे कुणीच प्रेम करु शकत नाही. 
 
गुरुपौर्णिमा नुकतीच झाली आता श्रावण महिना येईल. ज्यांना घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठणासाठी दादरला जाणे जमत नाही, त्यांनी घरी म्हणा. किती वेळ लागतो १०८ वेळा म्हणायला? जास्तीत जास्त २ १/२ तास. ह्यात एकदा जरी मनापासून म्हटलं तरी ते दत्तगुरुपर्यंत पोहचतो. नुसता वाचिक जप झाला तरी चालेल पण एकदा तरी करा.
 
त्या महाचण्डिकेने डाव्या कानाकडे शंख लावला आहे परशुरामाची हाक ऐकण्यासाठी, त्याच्यावर प्रेम करणार्‍या भक्तांची हाक ऐकण्यासाठी.
श्रावणात पुरुष प्रपत्ती करणार आहोत. चार पैकी एक जरी सोमवार केला तरी चालेल, चारही केले तर उत्तमच.
 
स्त्रियांनी प्रपत्तीच्या वेळी एवढे प्रश्न विचारुन मला हैराण केले होते, पण स्त्रियांनी ज्या भावाने प्रपत्ती केली होती त्यामुळे त्यांना ९०% मार्कस्‌ मिळाले तर पुरुषांनी ५० ते ७५ % मार्कस्‌ मिळवले.
 
पुरुषांनी सगळ्यांनी श्रीराम म्हणा कारण ह्यापुढे आता १००% मार्क मिळाले पाहिजेत.
लक्षात ठेवा, माझ्याकडे भरपूर मेकअप-मन आहेत, मी कुठलेही रुप घेऊन त्यामुळे फिरतो. त्यामुळे विचार करा ही आपत्ती (मी परमपूज्य बापू) हवी की प्रपत्ती हवी. आपत्ती मधली ‘ति’ पहिली असेल तर काय असते, त्याचा अर्थ शोधा.
 
ह्या शनिवारी काय आहे? दीप  अमवास्या, तुमच्या आईचा वाढदिवस. अतिशय पवित्र तिथी आहे. अनेकांनी प्रश्न विचारले होते, "बापू आम्ही काय करु शकतो, ह्या दिवशी?
 
तर ह्या दिवशी रात्री १० नंतर घरामध्ये पणती पासून समईपर्यंत कुठलाही एक दिवा प्रज्वलित करा, घरात आरास करा, रांगोळी काढा. जशी इच्छा असेल तसे सजवा. शांतपणे त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघत रहा. त्या ज्योतीकडे बघत आई, आई, आई (३ वेळा) म्हणा.
एरव्ही आपण फुलाने दिवा शांत करतो. पण हा दिवा शांत करायचा नाही. ही ज्योत म्हणजे तुमच्या आईचे आगमन असेल, ह्याची खात्री मी देतो त्या दिव्याकडे बघता बघता म्हणायचे, Happy Birthday To You..... कुठल्याही भाषेत म्हणा जेव्हा आई, आई.... म्हणाल, तेव्हा आई आलेलीच असेल नक्की.
 
 
!! हरि ॐ!!

Tuesday, July 12, 2011

Excerpts from Thursday Discourse dated 7 July 2011

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०७.०७.२०११)
    "ॐ मंत्राय नम:" सर्वबाधाप्रशमनं मध्ये आपण वमन बाधा बघतोय. किती झाल्या आतापर्यंत दोन! आज आपल्याला तिसरी व चौथी वमन बाधा बघायची आहे. ह्या नेहमी जोडीने फिरत असतात. एक असली की दुसरी असतेच. दोन्ही नेहमी एकत्रच राहतात व एकत्रच बाहेर पडतात. पण ह्याचा अर्थ एक बाधा टाकली तर दुसरीसुद्धा बाहेर जाईल असे होत नाही.
    ह्यातली एक बाधा जर बाहेर टाकली व दुसरी आत असेल तर बाहेर गेलेली बाधा परत आत येणार. कारण दोन्ही नेहमी एकत्र असतात. पण आतली बाधा बाहेर जात नाही. म्हणजेच दोघींपैकी एक बाधा बाहेर टाकली तर उरलेली आतली दुसरी बाधा बाहेर जात नाही. का? कारण, ह्या अश्या बाधा आहेत की, ह्यांच्यामुळे मनुष्याला जी गोष्ट हवी असते ती मिळत  नाही.
    काय हवे असते मनुष्याला? समाधान. ह्या समाधानाच्या आड येणार्‍या ह्या दोन बाधा आहेत. म्हणून ह्या दोघींना एकदम बाहेर टाकले पाहिजे. ह्या दोन्ही बाधांची नावेसुद्धा self explanatory आहेत. ह्यातली पहिली जी आहे ती असमा बाधा व दुसरी आहे ती अधान बाधा.
    असमा बाधा म्हणजे काय? तर मनुष्याला आपल्यासारखे दुसरे कुणी असू नये, असे वाटणारी जी वृत्ती, ती म्हणजे असमा.
    अनेकजण बोलतात की, "आमच्यासारखे दु:ख कोणाला नसू दे” पण असं बोलताना मनात खरोखर तसा भाव असतो का? नाही. एखादी व्यक्ती परिक्षेला जात असताना प्रत्येकजण त्याला Best of luck देतो, पण मनात मात्र worst of luck हा विचार असतो, असं का? कारण असमा बाधा. असमा म्हणजे "मी ज्या परिस्थितीमध्ये आहे, त्या परिस्थितीमध्ये माझ्यापेक्षा वरचढ कुणीही असता कामा नये.” उदाहरणार्थ, मी जर १०,००० कमावतो व ह्या कमाईमध्ये मी ज्या standard ने राहतो, त्यापेक्षा १०,००० कमाई असणार्‍यांमध्ये कुणीही (माझ्यापेक्षा)श्रेष्ठ असता कामा नये.   
    मनुष्य स्वत:ची level ठरवताना एकच निकष (criteria) लावतो तो म्हणजे स्वत:च्या सोयीचा. असा सोयीचा निकष लावणे म्हणजे अधान बाधा. माझ्यापेक्षा मोठं कुणीच असता कामा नये, असा प्रत्येक ठिकाणी आपल्या सोयीप्रमाणे मनुष्य निकष लावत असतो.
    एकच स्त्री पण ती सासूच्या भूमिकेत असेल तर सूनेसाठी वेगळा निकष लावते व आईच्या भूमिकेत असेल तर मुलीसाठी तिचा वेगळा निकष असतो. एखाद्या मुलाला त्याला आवडणारी मुलगी पटवायची आहे, आणि त्या मुलीच्या आजीच्या होकारावर त्यांचे लग्न अवलंबून असेल तर तो मुलगा त्या मुलीच्या आजीसाठी वाट्टेल ते करायला तयार होतो.
      म्हणजेच परिस्थितीनुसार, स्वत:च्या सोयीनुसार मनुष्य निकष बदलत असतो.
    १९९३ मध्ये मार्डच्या (MARD) डॉक्टर्सनी संप केला होता. तेव्हा एक गृहस्थ Private Medical College असता कामा नये म्हणून तावातावाने बोलत होते. आर्थिक स्थिती उत्तम असलेल्या ह्या गृहस्थांच्या मोठ्या मुलांना चांगले मार्कस्‌ मिळून गर्व्हमेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यामुळे Private College त्यांना चुकीचे वाटत होती. हेच गृहस्थ काही वर्षानंतर परत भेटले, तेव्हा Private College काढणे किती आवश्यक आहे, ह्याविषयी बोलू लागले. त्यांच्या बोलण्यातून समजले की, त्यांच्या धाकट्या मुलाला मार्कस्‌ कमी होते, म्हणून त्यांना त्याच्या   admission साठी Private डोनेशन घेणार्‍या कॉलेजची आवश्यकता वाटू लागली होती.
    नंतर काही वर्षांनी परत हेच गृहस्थ भेटले पुन्हा ते Private कॉलेजना दोष देऊ लागले. कारण, ह्यावेळी त्यांची मोठी मुलं त्यांना सोडून परदेशी गेली होती. त्यांच्या नातवाला चांगले मार्कस्‌ मिळाले होते पण आता ह्यांची आर्थिक स्थिती खालावली होती.
    म्हणजे, जेव्हा पहिल्यांदा पैसा होता, मुलांकडे मार्कस होते तेव्हा Private College त्यांच्यासाठी चुकीचे होते. दुसर्‍यांदा पैसा होता,  मुलांकडे मार्कस्‌ कमी  होते, तेव्हा Private College   त्यांच्यासाठी योग्य होते. तिसर्‍यांच्दा जेव्ह पैसा कमी व नातवाकडे मार्कस्‌ आहेत, तेव्हा पुन्हा Private College चुकीचे ठरवले गेले. म्हणजे निकष कश्याच्या आधारे लावला तर स्वत:च्या सोयीनुसार.
    बापूंनी हनुमान चलिसा म्हणायला सांगितली, एका दिवसात १०८ वेळा म्हणायला सांगितल्यावर एवढ्या स्पीड ने म्हटली जाते की हनुमानजी घाबरले. माझ्याकडे येऊन हनुमानजी म्हणाले की, ह्या तुझ्या भक्तांचा एवढा स्पीड आहे म्हणण्याचा की, तिथे माझा स्पीड पण कमी पडतो. सरस्वती देवी, जी वाग्देवता आहे, ती पण येऊन म्हणाली की, तुझ्या भक्तांचे उच्चार कळत नाहीत. दोघेही माझ्याकडे (परमपूज्य बापू) तक्रार घेऊन आले. म्हणून मग मी (परमपूज्य बापू) ऐकू लागलो, तर मला काहीच ऐकू आले  नाही. असे करु नका राजानों.
    १०८ वेळा हनुमानचलिसा म्हणणे ही उरकण्यासारखी गोष्ट नाहे. तुमचे उच्चार तुम्हाला नीट कळले पाहिजेत. सावकाश म्हटले तरी ५१/२ ते ६ तास पुरतात. काही जणांचे इथे ३ तासांत संपते, हे योग्य आहे का?   
    समजा तुम्ही शौचास बसलात आणि तेव्हाच नेमके तुम्हाला कुणी उठवले तर कसे वाटेल? कठीणच वाटेल ना. तसेच बुद्धीकडून एकदा आज्ञा निघाली की, त्यास आवर घालणे कठीण असते.
    प्रत्येक गोष्टीला आपल्या सोयीनुसार निकष लावणे, व आपल्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही, ह्या गोष्टी जेवढ्या कमी करता येतील, तेवढ्या कमी करा. जेव्हा तुम्ही दोन्ही बाधा टाकण्यासाठी प्रयास करता तेव्हा जर त्यातल्या एका बाधेसाठी तुमचे प्रयास कमी पडत असतील तर तिथे कमी पडणारे प्रयास हनुमंत भरुन काढेल. पण जर दोन्हीपैकी फक्त एकच बाधा काढायला बघाल, तर तसे होणार नाही.
    मी "याँव” केले "ताँव” केले असे मनुष्य नेहमी म्हणत असतो, हे "मी याँव” म्हणजे काय? तर मांजराची वृत्ती, अप्रामाणिकपणा. मांजर जसे जिथे सोय तिथे धाव घेते, मग तीथे योग्य की अयोग्य बघितले जात नाही.
    नेहमी बघा, कुत्रा कधीही घरातल्या व्यक्तीखेरीज इतर कुणीही काहीही दिले तरी तिकडे ढुंकुनही बघत नाही. मांजराचे तसे नसते, ते जिथे त्याला खायला मिळेल तिथे धावते.
    असमा बाधा मनुष्याला मांजराप्रमाणे बनवते मांजर स्वत:च्याच घरात चोरुन खात असते. हे आपल्याच घरात चोरुन खाणे म्हणजे जे आपल्यावर उपकार करतात त्यांच्याशी कृतघ्न्तपणे वागणे. जे आपणहून द्यायला तयार आहेत, त्यांच्याकडून चोरुन घेणे इथे शब्दश: चोरणे असा अर्थ होत नाही.
    आपण स्वत:च स्वत:शी कसे वाईट वागत असतो बघा. आपले घुडगे wight barring  joints आहेत, ज्यांच्यामुळे आपण धावू शकतो. जे जॉईंट्स आम्हांला धावण्यासाठी, जिने चढण्यासाठी आवश्यक असतात, त्या जॉईंट्सना हवा असणारा व्यायाम आपण देतो का? घरात आपण खाली बसतो का? आम्हांला जेवताना  dinning table च लागते. मग ३०-४० वयामध्येच गुडघे दुखू लागतात. त्यात एवढे वजन वाढते. मग मला (परमपूज्य बापू) म्हणतात, "बापूराया, हे गुडघे दुखणे थांबव.
    आयुष्यभर खाली बसणे टाळले, गुडघ्यासाठी आवश्यक व्यायाम टाळले की मग डायनिंग टेबल, कमोड वापरण्याची वेळ येते.
    गुडघ्याच्या वरती जे  muscles असतात. त्यांना Quadriceps म्हणतात. ह्यांची ताकद जेवढी strong तेवढे गुडघे strong असतात. ही ताकद व्यायामामधूनच वाढते. आमचे जिभेचे, हाताचे (खाण्याचे) व्यायाम पुष्कळ असतात. पण गुडघ्याचे होतात का? वाढलेल्या वजनामुळे कित्येकांना जरा बसल्यावर पायाला मुंग्या येतात.
    बर्‍याचवेळा मनुष्य मी एवढं कमी खातो तरी माझं वजन जास्तच आणि दुसरा एवढं जास्त खातो तरी वजन कमीच अशी तुलना करत राहतो. पण कुठलीही स्त्री माझ्या शेजारणीचा नवरा चार लफडी करतो पण माझा नवरा करत नाही, अशी तुलना करते का? नाही. पुरुषसुद्धा दुसर्‍याची बायको बाहेर लफडी करते, पण माझी बायको करत नाही, अशी तुलना कधीच करत नाही.
    म्हणजे, माणसाला कुठे तुलना करायची नाही, हे चांगल्या प्रकारे माहित असते. तुलनेमधूनच सोय बघितली जाते व सोय बघण्यासाठीच तुलना केली जाते.
    दुसर्‍याकडे पैसा जास्त म्हणून मग मनुष्य आपली सोय बघून (टेबलाखालून) पैसा कमवतो. लक्षात ठेवा तुमचे निकष बदलले की, त्या परमेश्वराचेही निकष बदलतात. १०,००० रुपये महिना प्रामाणिकपणे मिळवणार्‍यांच्या रांगेऐवजी तुम्ही अप्रामाणिकपणे कमवणार्‍यांच्या रांगेत जाता.
    पण, तो परमात्मा तुमच्यासारखी तुलना करत नाही. तो काय सांगतो, "प्रत्येकाची रांग वेगळी!” त्याने जर स्वत:ची सोय बघितली तर कल्पना करा काय होईल? तुमच्या गाडीचा ब्रेक तुटला आहे. गाडी दरीत कोसळणार आहे. तुम्ही त्याला हाक मारताय, आणि त्याने म्हटले आता जरा आळस आला आहे, मग जातो, तर ते चालेल का? नाही. त्याने तेव्हाच आले पाहिजे  "तेव्हाच” हे महत्त्वाचे असते.
    म्हणून सद्गुरुंची तुलना कधी करु नका. जर खरोखरचा सद्गुरु असेल तर तो माझ्याशी समा व धान वागणार आहे म्हणजेच समाधान देणार आहे.
    सद्गुरुनां कश्यामुळे समाधान मिळते?
१)सद्गुरुंची तुलना इतर कुणाशीही केली नाही
२)तो सांगेल तोच निकष मानला, त्याच्या सांगण्याची तुलना इतर कश्यासोबत केली नाही.
    ह्या गोष्टी पाळल्या तर सद्गुरुस समाधान मिळते.
    आयुष्यात मनुष्याला समाधान मिळवायचे असेल तर त्याला सद्गुरुंशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही.
    समजा, तुम्ही हातात फावडे घेतले व खड्डा खणून स्वत:ला त्यात पुरुन घेतले. म्हणजे चूक कोणी केली? तुम्ही.
    आणि मग असाच खड्डा तुम्ही सद्गुरुंसाठी खणला, त्यात त्यांना पुरुन त्यांच्यावर माती टाकली, आणि नंतर जर तुमच्या हाताला फावडे लागले किंवा तुम्हांला काही जखम झाली तर तेव्हा तुम्ही जे त्याच्याशी वागलात त्याचा कुठलाही राग न मानता तुमचा सद्गुरु तुमच्या जखमेवर फुंकर घालायला, तुम्हांला मलमपट्टी बांधायला तुमच्या मागे उभा असतो.
    जेव्हा मनुष्य सद्गुरुंशी ह्या दोन बाधा टाळून वागतो, त्याच्या चरणांशी ह्या बाधा ठेवतो. तेव्हा ह्य अबाधा त्या मनुष्याच्या आयुष्यात उरतच नाहीत. कारण सद्गुरुंमध्ये व तुमच्यामध्ये दुसरे कुणीही नसते.
    "जिस जिस पथपर भक्त साई का, वहाँ खडा है साई”
    कुणाला वाटते, सद्गुरु व माझ्यामध्ये अनेक जण आहेत कुणासाठी बायको, मुलं जवळची असतात तर कुणासाठी अन्य व्यक्ती. पण खरं सांगू का? ह्यातलम कुणीही तुमचे नसते. तुमचा असतो तो एकच तुमचा सद्गुरु.
    एक उदा. सांगतो एक मनुष्य स्वत:चे घर किती शांत ठिकाणी आहे, जवळ कुठलीही दुकाने नाहीत, म्हणून नेहमी तक्रार करत असे देवाने एक स्तोत्र दिले. ह्यामुळे त्याने नवीन जागा घेतली, एक महिना आनंदाने गेल्यावर परत ह्या मनुष्याच्या त्याच्या सद्गुरुकडे तक्रारी सुरु झाल्या, नवीन जागेत काहीच शांतता नाही म्हणून, मग परत त्याला नवीन स्तोत्र दिले व देवाने कंटाळून त्याला पहिल्या व दुसर्‍या जागेच्या मध्ये म्हणजे जिथे शांतीही नाही व जास्त अशांतीही नाही अशा ठिकाणी जागा दिली व नवीन उपासना दिली तिथे एक महिना आनंदात गेल्यावर परत ह्या मनुष्याच्या तक्रारी सुरु झाल्या, कारण माणसं असून त्या बिल्डिंगमध्ये कुणी एकमेकांशी बोलत नव्हते. परत देवाने मग चौथी उपासना दिली.
    इथे हा मनुष्य प्रार्थना सद्गुरुंची करत होता पण सद्गुरुंच्या शब्दांवर मात्र त्याचा विश्वास नव्हता. ह्या व्यक्तीसाठी त्याचा देव हा फक्त त्याच्या सोयीसाठी होता.
    कुणी माझ्यापुढे जाता कामा नये व स्वत:च्या सोयीनुसार निकष लावणे ह्या गोष्टी सद्गुरुंसमोर थांबवल्या पाहिजेत.
    गुरुपौर्णिमेच्या, त्रिपुरारीपौर्णिमेच्या दिवशी आरामात ९ नंतर खाऊन-पिऊन बरेचजण सोयीनुसार दर्शनाला येतात. त्यासाठी मग लाईनच ९ नंतर थांबवावी लागली. अशी वेळ का येते?
    इथे एक दिवस स्टेजवर बसून बघा आणि सगळ्या गर्दीकडे बघत हात वर करत रहा, १ तास सुद्धा तुम्ही बसू शकणार नाही. तेव्हा तुमच्या लक्षात येईल किती कठीण असते ते.
    देवाकडे स्वत:ची सोय बघणे थांबवा हे कसे थांबवायचे? तर यासाठी सद्गुरुकडे प्रथम सामान्य मनुष्य म्हणून पहा.
    समाधान सेवा म्हणजे गुरुचरणसेवा. ही तीन पातळींवर करता येते -
१)भौतिक पातळी :- म्हणजे स्थूल पातळीवर सद्गुरु मनुष्य रुपात आला आहे म्हणून त्यांची मनुष्य समजून जी सेवा करायची आहे अशी देहिक सेवा, तसेच त्याने जे सांगितले आहे ते आचरणात आणणे.
२)सूक्ष्म सेवा :- म्हणजे त्याच्या मनाची सेवा मानसिक सेवा त्याने (सद्गुरुंनी) सांगितलेली उपासना प्रेमपूर्वक करणे.
३)तरल पातळी :- प्रज्ञेची पातळी. सद्गुरुंचे चिंतन, त्याच्या विचारांचे चिंतन करणे.
४)तुर्या पातळी (अवस्था) :- ही कुठलाही मानव करु शकत नाही.
    संपूर्ण प्राणाने सद्गुरुंची सेवा करायची. सद्गुरुंच्या मूळ अस्तित्त्वाची, त्रिगुणातीत अस्तित्त्वाची स्वत:च्या प्राणाने सेवा करायची.
    आमचं शरीर, मन, बुद्धी एकत्र करुन सेवा करायची, ही आपण करु शकत नाही, कारण तोच (सद्गुरु) अशी आमची सेवा करत असतो. तो सदेह येतो ते ह्या तुर्यावस्थेसाठी तो देहातीत असतो, तेव्हा दिसू शकत नसल्याने मर्यादा येतात. म्हणून मग तो अवतार धारण करतो ते भक्तांच्या सेवेसाठी.
    तुमची सेवा हे त्याच्यासाठी (सद्गुरुंसाठी) अध्यात्म असते. मानवाची सेवा करण्यांसाठी प्रत्येक मानवात असणार्‍या परमेश्वराच्या अस्तित्त्वाची सेवा करण्यासाठीच तो येतो.
    ह्यातील पहिल्या ३ सेवा आपल्याला नीट करता आल्या पाहिजेत. ज्या क्षणाला मी सद्गुरुंना आपले मानतो, त्या क्षणापासून तो तुमची सेवा (तुर्यावस्था) करतोच. म्हणून त्याच्याकडे निकष लावू नका. नंबर लावत बसू नका.
    तुम्ही नंबर लावले की माझ्या डोक्याला ताप होतो. त्यामुळे इतरांचे किंवा स्वत:चेही सद्गुरुंकडे नंबर लावत बसू नका.   
    आजपासून आपण निश्चय करुया की, आपल्याला समाधान सेवा करायची आहे. पहिल्या तीन सेवा आपल्याला करायच्या आहेत. चौथी सेवा तोच आपली करत असतो. ह्या सेवा जेवढया अधिक प्रमाणात वाढतील, त्याप्रमाणात असमा व अधान बाधा नाहीश्या होतील व आयुष्यात समाधान येईल. सद्गुरुसेवा म्हणजेच समाधान सेवा. सद्गुरुस जरी तुम्ही खड्डयात पुरले तरी तो तुमच्या जखमेवर फुंकर कशी घालतो, हे आज आपण बघितले ही गोष्ट चिरकालीन सत्य आहे.
    साईबाबांच्या काळात बघा, काहीजण आम्ही शिरडीत कुठे राहतो? बाबांची सेवा कशी करणार? असा विचार करत बसले. ते शेवटपर्यंत कोरडेच राहिले.
    आम्हांला असं आमचं जीवन फुकट घालावयाचे आहे का? आज माझा (परमपूज्य बापू) तुम्हां प्रत्येकाला एक प्रश्न आहे. तुम्हाला तुमचं जीवन सफलपणे जगण्याची इच्छा आहे की नाही? (सगळे हो म्हणतात)
    मग ह्याच्यासाठीच मी इथे आलो आहे, इथे बसलो आहे. ह्या त्रिपुरारी पौर्णिमेला स्वत:चे जीवन समर्थपणे जगण्यासाठी समर्थशक्ती देणारे. किरातरुद्र सूक्त तुमच्यासाठी येणार आहे. हे सूक्त कलियुगासाठी अत्यंत आवश्यक आहे.
    आज ज्यांनी ज्यांनी उत्तर "हो” दिले आहे, तसेच आज जे इथे नाहीत पण ते तुमच्यावर मनापासून प्रेम करतात, त्यांचे उत्तरही मी "हो” मानले आहे. आणि जे मुंबईत नाही, त्यांची काळजी तुम्ही करु नका. मी(परमपूज्य बापू) फक्त मुंबईचा नाही. खरं तर मी कुणाचाच नाही आणि मी सगळ्यांचाच आहे. मी जसा भारत , इतर देशांचा तसा पाकिस्तानचा पण आहे. पाकिस्तान मला फार हवाहवासा वाटतो.
    किरातरुद्र मधून मी तुम्हांला सगळं शिकवणार आहे. नुकताच संपन्न झालेला प्रसन्नोत्सव असो,  अंजनामाता वही असो कि, किरातरुद्र असो. ह्या सर्वांचे basis काय? तर सद्गुरु सेवा, सद्गुरुप्रती समर्पणाचा भाव.
    ह्यापुढे आम्ही तुलना करणार नाही. तर आम्ही समाधान सेवा करणार व त्यालाही (सद्गुरुस) समाधान देणार.
    गुरुपौर्णिमेला प्रत्येकाला काहीतरी सद्गुरुस द्यावेसे वाटते. जर काही द्यायची इच्छा असेल तर फक्त समाधान सेवा द्या. मग देणार का समाधान सेवा?(सगळे हो म्हणतात) नक्की? (सगळे परत हो म्हणतात)
    "हरि ॐ” ह्या "हरि ॐ” चा एक अर्थ "असेच होवो” असाही आहे.

हरि ॐ

Monday, June 27, 2011

Excerpts from Thursday Discourse dated 23 June 2011


 सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (२३ -०६-२०११)
                                                                         हरी ॐ
आता आपण दहावी वमनबाधा याचा दुसरा प्रकार बघणार आहोत. ते म्हणजे तीच चूक परत परत करणे. त्यावेळी आपण त्या चुकीच्या मागील कारणाला ओळखले पाहिजे. त्याचे वमन आपल्याला करता आले पाहिजे. जर करु शकत नसू तर वमनबाधा होते.  मलेरिया, टी.बी. असे आजार/रोग होतात. त्यावेळी जर नीट उपचार करुन त्याचे विषाणू दूर केले नाहीत तर तो आजार आपल्याला परत परत होतो. त्याचप्रमाणे चूक देखील परत परत होते. हीचा व्यय नाही असा कोणी नाही. आणि असेल तर तो ‘संत’ आहे. जर आपल्याकडून झालेली चूक एकदाच घडली परत कधीच त्याने ती चूक केली नाही तर ती व्यक्ति ‘संत’ असते की ज्याच्याकडून कधीच कोणतीच चूक घडतच नाही.
यातही दोन प्रकार आहेत एक म्हणजे ज्याला ती चूक केल्यामुळे पश्चात्ताप होतो/आहे आणि दुसरा म्हणजे ज्याला पश्चात्ताप नाही.


ज्या व्यक्तिला पश्चात्ताप होत नाही तो वमनबाधेत मोडत नाही आणि अशावेळी श्रीगुरुक्षेत्रमंत्रदेखील त्याच्या मदतीला धावून येत नाही. कारण ‘ज्याला बदलण्याची इच्छा नाही त्याला देवपण बदलू शकत नाही.’’ अगदी उपासना करुन जादूटोणा करुन देखील नाही. मनुष्य जर स्वेच्छेने एखादी चूक वारंवार करत असेल तर ती चूकच आहे आणि त्याला त्या बाबतीत त्याला पश्चात्ताप नसेल तर ती बाधा नव्हे पाप आहे.


याउलट जर चुकीचा/चुकीबद्दल पश्चात्ताप असेल तर बाधाप्रशमन श्रीगुरुक्षेत्रमंत्र त्या गोष्टीला (चुकीच्या) दूर करतो. पाप दूर करतो. पण जर पश्चात्ताप असेल तरच श्रीगुरुक्षेत्रमंत्र काम करतो.
माझ्याकडून जे घडतंय ते चुकीचे आहे आणि मी त्यातून बाहेर पडायचा ‘प्रयास’ करतो, अशा वेळी गुरुक्षेत्रमंत्र धावून येतो. (आपल्या मदतीला) तो आपले मन बदलतो, गोष्टी  अशा काही घडवून आणतो की आपण तीच चूक परत करणार नाही. पण ज्यांना पश्चात्ताप आहे, आपली चूक आहे हे मान्य आहे त्यांच्याविषयी /बाबतीच हे घडते.
बापू सांगतात, माझ्या क्लिनिक मध्ये माझ्या टेबलवर माझ्या डाव्या हाताला एक बेल ठेवली होती. एक पेशंट गेल्यावर दुसर्‍या पेशंटला बोलवताना बापू ती बेल वाजवून बोलवायचे. ती बेल काही कारणास्तव खराब झाली  आणि नवीन बेल बसवताना ती उजव्या हाताला बसवली. नवी बेल उजव्या हाताला आहे हे माहित असूनसुद्धा पुढचे काही दिवस नवीन पेशंटला बोलवताना हात पहिले डाव्या बेल वर जायचा ती वाजली नाही की मग दुसर्‍या बेल वर. म्हणजे काय ? तर हात आणि बेलची जागा यांचे कंडिशनिंग झाले होते.


‘कंडिशनिंग’ जेव्हा ‘अ’ नावाची घटना/गोष्ट आणि ‘ब’ नावाची घटना किंवा गोष्ट या सतत एकत्र घडतात, त्यावेळी  मेंदूमध्ये एक वेगळे नवीन सेंटर बनते की ज्यामध्ये ‘अ’ आणि ‘ब’ चा परस्पर संबंध असतो. आपल्या जीवनामध्ये जेव्हा २-४ गोष्टी सतत एकत्र घडत राहतात तेव्हा त्यांचे मेंदूमध्ये एक समीकरण तयार होते यालाच कंडिशनिंग  म्हणतात.


एका सायंटिस्टने एक कुत्रा ठेवला आणि एका ठराविक वेळेला एक विशिष्ट /वेगळा बझर लावून तो त्याला त्याचे आवडते खाद्य देत असे. काही दिवसांनी तो फक्त बझर वाजवत असे आणि रिकामी डिश त्याच्यासमोर सरकवत असे त्यावेळी देखील फक्त बझर ऐकून त्या कुत्र्याच्या तोंडात लाळ येत असे, नंतर त्याने डिश सरकवणे सुद्धा बंद केले तो फक्त बझर वाजवत असे आणि तेव्हासुद्धा त्या कुत्र्याची लाळ गळत असे. यावरुनच कंडिशनिंग इफेक्ट लक्षात येतो.


आपल्या मनाचे कंडिशनिंग हे आपणच करतो. काही बाबतीत आपले आईवडिल , संस्कार करणे ही गोष्ट चांगली की वाईट, दिवा लावला की नमस्कार करायचा ही सवय. माझ्या देवासमोर दिवा लागला की हात जोडला जातो ही सवय असते.
कंडिशनिंग जे आहे ते स्थळ, काळ, दिशा, वेळ आजूबाजूची परिस्थिती यावर अवलंबून नसते. आणि सवय जर आजूबाजूची परिस्थिती अनुकूल असेल तरच प्रकटते. समजा एखादा मुलगा सिगरेट पित असेल आणि त्याचे आईवडिल त्याच्यासमोर असतील, तर ती त्याची सवय असेल तर तो आईवडिलांसमोर पिणार नाही आणि जर का ते कंडिशनिंग असेल तर मात्र तो बिनधास्त ती सिगारेट त्यांच्यासमोर पण ओढेल.


‘‘सवयीपेक्षा कंडिशनिंग’ तीव्र असते. कंडिशनिंग मनुष्याला निर्लज्ज बनवते. त्याला स्थळ, काळ, वेळ बघायची गरजच भासत नाही. सवय आपण बंद करु शकतो.
तर बापू हे कसं काय ?


जर एखादा मनुष्य दारु पितो, दररोज एक पेग- त्याचा संबंध दुःख किंवा आनंदाशी नाही तर सवय.
पण ज्याक्षणी तो डोक्याला शांती मिळते, दुःख विसरल जातं, आनंद व्यक्त करता येतो म्हणून पितो ते कंडिशनिंग - त्यामुळे व्यसन लागते. सुटणारी ती सवय आणि न सुटणारी- कंडिशनिंग / व्यसन आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट सुधारायची किंवा नाही ‘इट डिपेंडस ऑन कंडिशनिंग’.


मोठ्यातला मोठा कंडिशनिंग मधून बाहेर यायला कंडिशनिंग च मदत करते.
निगेटिव्ह कंडिशनिंग चुकीचे. पॉझीटिव्ह कंडिशनिंग चांगले. की जे वाईटातून बाहेर पडायला मदत करते.
जर व्यक्ती दुःख विसरण्यासाठी किंवा चांगली ऍक्टिंग करतो म्हणून दारु/सिगरेट पित असेल त्यावर डिपेंडंट राहत असेल म्हणजे व्यसनी बनत असेल आणि जर त्याला त्यातून बाहेर पडायचे असेल तर त्याचे ऍक्टिंग दुसर्‍या गोष्टीबरोबर जोडले पाहिजे. दारु पिण्याने माझी ऍक्टिंग चांगली होते तर त्याने दारु प्यावी पण त्याबरोबर स्वतःच्या मनाने एखादे स्तोत्र म्हणावे की हा अमुक स्तोत्र बोलल्यावर माझी ऍक्टिंग चांगली होते. हळूहळू ती व्यक्ति पाच पेग दारु ऐवजी चार पेग आणि एकदा स्तोत्र पठण, तीन  पेग आणि दोन वेळा स्तोत्र पठण असे करत करत स्तोत्रांची संख्या वाढवत न्यायची  आणि पेगची संख्या कमी करत न्यायची. असे केल्याने त्याच्या मेंदूमध्ये पठणाचे नवीन केंद्र तयार होईल आणि त्याचे ऍक्टिंग चे केंद्र स्तोत्र पठण केंद्राशी जोडले जाईल. दारुच्या केंद्राची सत्ता कमकुवत होईल व पठणाच्या केंद्राची सत्ता वाढेल.
कंडिशनिंग वाईट किंवा चांगले हे आपल्यावरून ठरते. ती गोष्ट आणि माझे रिलॅक्सेशन (निवांतपणा) आपल्या नकळत चूक आणि रिलॅक्स होणं यांचं कंडिशनिंग होते.


आपण जेव्हा एखादी चूक करतो तेव्हा त्याचे ३ टप्पे असतात,
जेव्हा चूक घडत असते ती वेळ,  चूक करायच्या आधीची वेळ, आणि चूक केल्यानंतर,  हे ते तीन टप्पे.
त्यामध्ये पहिले चूक होऊ नये म्हणून आपण टेन्शन घेतो (चूक करायच्या आधीची वेळ).
चूक करताना रिलॅक्स असतो (चूक घडत असते ती वेळ).
आणि चूक केल्यानंतर पुन्हा आपण टेन्शन घेतो.


समजा १२ तास आपण उदाहरणादाखल घेतले व ह्याचे ३ टप्पे केले (४तास + ४ तास +  ४ तास)


त्यामध्ये पहिला आणि शेवटचा पिरिअड टेन्शन असते (४ तास + ४ तास) आणि चूक करताना रिलॅक्स पिरियड असतो (४ तास). रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले जागृत मन झोपते पण अंतर्मन मात्र विचार करत असते ते जागृत असते.
आणि अशा या अंतर्मनाला रिलॅक्सेशन आवडतं आणि ते तेच धरुन ठेवते.  अंतर्मनाच्या दृष्टीने आपण एकाच गोष्टीमुळे आठ तास टेन्शन आणि चार तास रिलॅक्स झालेलो असतो. अशावेळी अंतर्मन जेवा आपण रिलॅक्स (निवांत) झालेलो ते ४ तास धरून ठेवते व त्याचे केंद्र वाढवते (म्हणजेच चुकीचे केंद्र) आणि ते ‘चुकीच्या’ केंद्राशी जोडले जाते.
तसेच चूक घडण्याआधी व चूक घडल्यावर आपल्याला जो पश्च्त्ताप होतो व टेन्शन येते (४ + ४ = ८ तास) ह्या वेळात आपण निवांत नसतो, म्हणून अंतर्मन ह्या केंद्राला (चूक ना करण्याच्या केंद्राला) कमी ताकद पुरवते म्हणजेच हे केंद्र लहान बनते.
आणि मग साहजिकच चूक न करणार्या केंद्राची ताकद कमी झाल्याने  चुकीचे केंद्र (चूक करण्याचे केंद्र)  आपल्या बाह्या मनाला भारी पडते, आणि परत परत चुका होतच राहतात.




तर अशी वेळी काय करावे?


चूक घडण्याआधीचे ४ तास टेन्शन घेण्याऐवजी स्थळ बदला, देवळात जा, ते नसेल करायचं तर पिक्चरला जा, सार्वजनिक ठिकाणी जा, मोहाच्या ठिकाणी राहू नका.
समजा तुम्ही ऑफिस मध्ये आहात. एकच रुम आहे आणि तुम्ही दोघंच आहात, बाहेर पडू शकत नाही तर अशा वेळी  ती चूक केल्यामुळे आपल्या पत्नीला किती वाईट वाटेल याचा विचार करा  म्हणजे चूक केल्यानंतरचे चार तास उगाळा. आणि जर का चूक घडली (त्यातूनपण) तर पहिले चार आणि नंतरचे चार तास अशी डबल केंद्रं मनामध्ये तयार होतात. आणि त्यामुळे अंतर्मनात चूक केल्यामुळे टेन्शन निर्माण होते.




चांगली माणसे चूक घडू नये म्हणून प्रयत्न करत असतात पण त्यांचे अंतर्मन त्यांना दुर्बल करते.    
मी चूक केली हे कुणाला कळलं नसलं तरी माझ्या देवाला ते कळतं.
चूक करण्याआधीचे चार तास तो माझ्यावर रागवला होता.
मी चूक करत असताना तो संतापलेला आणि त्याला दुःखही होत होतं आणि चूक झाल्यानंतर त्याला माझ्याविषयी सहानुभूती देखील असते.


चूक करताना सद्गुरुचे नामस्मरण करा. माझं (प.पू.  बापूंचे) नाव घ्या.तुमची चूक करण्याची वृत्ती कमी होईल आणि चांगली वृत्ती दहा पट वाढेल. तोच माझा (बापूंचा) धंदा आहे. प्रेमाने मला जे मान्य आहे ते बोलतो. ‘‘तुम्ही सामान्य माणसे आहात, तीच चूक वारंवार करत असताना, घडत असतांना, ती ओझी वाहताना मला सोबत घ्या.’’
अंतर्मन त्या सद्गुरुच्या ताब्यात द्या.
चूक करताना जेव्हा आपण ‘साई , साई’ असे म्हणतो त्यावेळी आपल्या मनामध्ये ‘साई’ नावाचे केंद्र तयार होते आणि दारु पिण्याची इच्छा होत नाही.
पण सद्गुरुतत्त्वाचेच नाव घ्या त्याच्या दुसर्‍या रुपाचे नाव घेऊ नका. रुप जरी त्याचे असले तरी त्यांची कार्य वेगळी आहेत.
‘जिस जिस पथ पर भक्त साई का, वहॉं खडा हैं साई’
तुम्ही कुठेही जाता तिथ तिथे तुमचा सद्गुरु आधी उभा असतो. तुम्ही जेव्हा पाप करताना देवाचे नाव घ्याल तेव्हा सद्गुरुतत्त्वाचेच नाव घ्या. त्याच्या दुसर्‍या रुपाचे नाव घेऊ नका कारण त्या रुपाकडे तेवढ्या प्रमाणात क्षमा नसेल. अकारण कारुण्य जेवढे सत्गुरुंकडे असतं तेव्हढ दुसर्या कुणाकडेही नसतं.


आम्ही पाप केले तर आमच्या सद्गुरुला दुःख होतं आणि जर पाप करताना त्याचे नाव घेतले तर त्याला दुःख होत नाही. ‘माझ लेकरु सुधरतयं मलाही जरा प्रयत्न करु देत’ असे त्याला वाटते.
ज्यावेळी आपल्या मनाला पश्चात्ताप होतो त्यावेळी आपला वाईट कंडिशनिंगशी संबंध संपतो.
चांगल्या माणसावर वाईट कंडिशनिंग लवकर होते तर चांगले कंडिशनिंग उशीरा होते. वाईट माणसाला कंडिशनिंग होत नाही ते सर्व दिखावे असतात.


आपल्या अंतर्मनावर जर (अंतर्मनात) परमात्मा असेल (नाम) असेल तर आपले बाह्यमन कंट्रोल मध्ये रहाते.
आपण जेव्हा प्रार्थना-आमंत्रण करतो, त्यावेळीच तो परमशिव आपल्या मनामध्ये येतो ते ही आपले आमंत्रण आहे तेवढ्यापुरतेच आणि तोपर्यंतच राहतो. त्याला पूर्णपणे शरणागत जा, तो कायमचा तुमच्या मनात राहतो.


श्रीसाईसच्चरितामध्ये एका कथेत सांगितल्याप्रमाणे एक म्हातारी साईबाबांकडे गुरुमंत्र द्या म्हणून उपोषण करते. बाबा तिला म्हणतात,‘‘काय गं आई? माझ्या गुरुने माझे कान फुंकले नाहीत तर मी काय फुंकू? तु माझ्याकडे अनन्य भावाने बघ, मी तुझ्याकडे बघेन त्याच भावाने.’’


सद्गुरुकडे प्रेमाने बघा, तुम्ही ज्या भावाने बघाल, तो त्या भावाने तुम्हाला बघेल. जर वाईट दृष्टीने बघितलं तर तो डोळे बंद करुन घेतो. त्याला काही फरक पडत नाही.
बघण्याचे प्राबल्य त्यालाच आहे ज्याचे तुमच्यावर प्रेम आहे.


आदिमाता परमात्म्याला सृष्टीचक्र आणि संहारचक्र घेऊन अवतार घ्यायला लावते.
१) राम - १०८% सृष्टीचक्र घेऊन आला आणि आवश्यकतेपुरते संहारचक्र वापरले. म्हणजेच सृष्टीचक्र प्रधान आणि संहारचक्र गौण  (उपांग)
२) परशुराम - संहारचक्र (प्रथम कालखंड) आणि सृष्टीचक्र (नंतरचा कालखंड)
३) कृष्ण - संहारचक्र (प्रधान) आणि सृष्टीचक्र (उपांग)


पण तोच परमात्मा जेव्हा सद्गुरुच्या (साई) रुपात अवतरित होतो तेव्हा ती आदिमाता त्याला दोन्ही चक्रांच्या सहीत पाठवते म्हणजेच ..........
त्याच्या उजव्या हातात सृष्टीचक्र तर डाव्या हातात संहारचक्र
उजव्या पायात संहारचक्र तर डाव्या पायात सृष्टीचक्र.
म्हणजेच त्याला पाहिजे आणि हवे तसे ‘तो’ (सद्गुरु) काळानुसार घटनेनुसार त्याचा वापर करतो. त्याच्या प्रत्येक वागण्यात, चालण्यात, हातवार्‍यांमध्ये भाव असतो आणि त्याचे कारण वेगवेगळे असते. त्याच्याकडील सृष्टीचक्र हे त्याच्यावर प्रेम करण्यांसाठी चांगल्याची निर्मिती करते, तर संहारचक्र वाईट गोष्टींचा नाश करते.


म्हणूनच सद्गुरुच्या पादुका नेहमी पूज्य असतात. त्याचे पादुकापूजन आपण करतो. त्याला आमंत्रण देतो.
तो आपल्या डाव्या पायाने चांगल्याची निर्मिती करतो तर उजव्या पायाने वाईटाचा नाश करतो.
आदिमाता परमात्म्याला का पाठवते? (सद्गुरु रुपात)
कारण - परत परत तीच चूक करणे हा परमात्म्याचा गुणधर्म आहे म्हणूनच युगानुयुगे लोटली तरी वाईट माणूस सुधारेल म्हणून तो क्षमा करतो आणि त्याचे परिमार्जन ते सर्व दुरुस्त करण्यासाठी- ती आदिमाता सद्गुरुतत्त्वाची निर्मिती करते. 



तो क्षमा करत राहतो म्हणून आई सद्गुरुतत्त्वास दोन्ही चक्रे घेऊन पाठवते. जो सद्गरुतत्त्वाचा आश्रय घेतो. त्याच्या  आयुष्यात सद्गुरु नेहमी हात व पाय यांसहित कार्य सुरु करतो. हे करण्यासाठीच .......
बाबा सांगतात,‘‘तू माझ्याकडे बघ, मी तुझ्याकडे बघेन  .......................
परमात्मा चूक करतो पण भल्यासाठी.
आईच्या आज्ञेच्या बाहेर जाऊन तो क्षमा करतो म्हणून त्याला परत परत यावं लागतं.
‘‘परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम्’’
म्हणूनच आम्हाला घट्टपणे सद्गुरुतत्त्वाचे चरण, हात , नितांत श्रद्धा आणि प्रेमाने धरुन ठेवले पाहिजेत.
हरी ॐ