Subscribe:

Tuesday, May 29, 2012

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.०५.२०१२)

खराखुरा एकमेव सद्‍गुरु आहे तो ओळखायचा कसा? ...तो जोपर्यंत स्वत:ला कर्माच्या अटळ सिध्दांताशी बांधून घेत नाही तोपर्यंत मानवाला त्याच्याशी बांधून घेता येत नाही. 

जे डोळस असून त्याला समोर असूनही बघू शकत नाहीत ते खरे आंधळे. ज्या डोळ्यात गुरुची image नाही तो मांसाचा गोळाच आहे. गुरुकडे बघणे ही देखील एक सेवाच आहे, त्याच्याकडे बघता बघता प्रेम दाटून आले की त्याचे गुण आपोआप आठवू लागतात.

तो एकदा का अवतरीत झाला की त्याच्या अस्तित्वामुळे अख्खी पृथ्वीच गुरुक्षेत्रम्‌ होते. तुम्ही मग जगाच्या पाठीवर कुठेही असा तुम्ही त्याचे नाव घेत असाल तर तुम्ही गुरुक्षेत्रम्‌मध्येच असता.

गुरुक्षेत्रम्‌ म्हणजे काय? तुमची त्याच्याकडे पाहणारी एकमेव दृष्टी. तुम्ही त्याच्याकडे पाहणे हेच तुम्हांला सर्व समर्थं सर्वार्थसमर्थं बनवते. 



Read more on .... 


http://www.manasamarthyadata.com/thursday_excerpts.php?id=41&lang=4

0 comments:

Post a Comment